शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रासायनिक खतांचे ४२ नमुने अप्रमाणित

By admin | Updated: April 19, 2017 00:12 IST

कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खतांचे ४४९ नमुने घेण्यात आले.

चार प्रकरणांत ताकीदपत्र : ३८ प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रियाअमरावती : कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खतांचे ४४९ नमुने घेण्यात आले. यापैकी ४२ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यापैकी चार प्रकरणांत ताकिद देण्यात आली, तर ३८ प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यात सर्व पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तीन विभागीय कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, मोहीम अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक असे एकूण ४० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. या सर्व पथकाला यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्व कृषी केंद्राच्या तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके मिळण्याकरिता तालुकास्तरावर १४, जिल्हास्तरावर एक, असे एकूण १५ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच १ मे पूर्वी सर्व भरारी पथके कार्यरत होऊन जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्रुटी व अनियमितता आढळल्यास हंगामापूर्वीच कार्यवाही करण्याबाबत सर्व गुणनियंत्रण निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत.सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खताची एक पोलीस केस दाखल करण्यात येऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राघवेंद्र फर्टीलायझर प्रा. लि. कोल्हापूर यांचे सेंद्रीय खताचे नावाखाली ग्रेड व घटक छपाई नसलेल्या १४३ बॅग किंमत एक लाख ४३ हजार २५० रुपयांचा साठा आढळून आला होता. तसेच खरीप हंगामात बीटी कपाशीच्या ३ व इतर बियाण्यांच्या ७६ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व प्रकरणात पंचनामे करून संबंधित शेतकऱ्याला अहवाल देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)अप्रमाणित नमुन्यांवर कार्यवाहीजिल्ह्यात ४२ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यामध्ये ४ प्रकरणात ताकिदपात्र, ३८ मध्ये न्यायालयीन कारवाई सुरू आहे. कीटकनाशकाचे ११ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले, तर बियाण्यांचे ३४ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यामध्ये १२ नमुने ताकिदपात्र व २२ नमुने कोर्टकेस पात्र आहे. तक्रारीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधाजिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोईकरिता व तक्रार निवारण करण्यासाठी १८००२३३४००० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मागील हंगामात या क्रमांकावर फक्त आठ तक्रारी प्राप्त झाल्यात त्या सर्व शेतकऱ्यांचे शंका निरसन करण्यात आले. या क्रमांकावर शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन केले आहे.