शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांचे ४२ नमुने अप्रमाणित

By admin | Updated: April 19, 2017 00:12 IST

कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खतांचे ४४९ नमुने घेण्यात आले.

चार प्रकरणांत ताकीदपत्र : ३८ प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रियाअमरावती : कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खतांचे ४४९ नमुने घेण्यात आले. यापैकी ४२ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यापैकी चार प्रकरणांत ताकिद देण्यात आली, तर ३८ प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यात सर्व पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तीन विभागीय कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, मोहीम अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक असे एकूण ४० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. या सर्व पथकाला यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्व कृषी केंद्राच्या तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके मिळण्याकरिता तालुकास्तरावर १४, जिल्हास्तरावर एक, असे एकूण १५ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच १ मे पूर्वी सर्व भरारी पथके कार्यरत होऊन जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्रुटी व अनियमितता आढळल्यास हंगामापूर्वीच कार्यवाही करण्याबाबत सर्व गुणनियंत्रण निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत.सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खताची एक पोलीस केस दाखल करण्यात येऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राघवेंद्र फर्टीलायझर प्रा. लि. कोल्हापूर यांचे सेंद्रीय खताचे नावाखाली ग्रेड व घटक छपाई नसलेल्या १४३ बॅग किंमत एक लाख ४३ हजार २५० रुपयांचा साठा आढळून आला होता. तसेच खरीप हंगामात बीटी कपाशीच्या ३ व इतर बियाण्यांच्या ७६ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व प्रकरणात पंचनामे करून संबंधित शेतकऱ्याला अहवाल देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)अप्रमाणित नमुन्यांवर कार्यवाहीजिल्ह्यात ४२ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यामध्ये ४ प्रकरणात ताकिदपात्र, ३८ मध्ये न्यायालयीन कारवाई सुरू आहे. कीटकनाशकाचे ११ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले, तर बियाण्यांचे ३४ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यामध्ये १२ नमुने ताकिदपात्र व २२ नमुने कोर्टकेस पात्र आहे. तक्रारीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधाजिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोईकरिता व तक्रार निवारण करण्यासाठी १८००२३३४००० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मागील हंगामात या क्रमांकावर फक्त आठ तक्रारी प्राप्त झाल्यात त्या सर्व शेतकऱ्यांचे शंका निरसन करण्यात आले. या क्रमांकावर शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन केले आहे.