शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

रासायनिक खतांचे ४२ नमुने अप्रमाणित

By admin | Updated: April 19, 2017 00:12 IST

कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खतांचे ४४९ नमुने घेण्यात आले.

चार प्रकरणांत ताकीदपत्र : ३८ प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रियाअमरावती : कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खतांचे ४४९ नमुने घेण्यात आले. यापैकी ४२ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यापैकी चार प्रकरणांत ताकिद देण्यात आली, तर ३८ प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यात सर्व पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तीन विभागीय कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, मोहीम अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक असे एकूण ४० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. या सर्व पथकाला यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्व कृषी केंद्राच्या तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके मिळण्याकरिता तालुकास्तरावर १४, जिल्हास्तरावर एक, असे एकूण १५ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच १ मे पूर्वी सर्व भरारी पथके कार्यरत होऊन जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्रुटी व अनियमितता आढळल्यास हंगामापूर्वीच कार्यवाही करण्याबाबत सर्व गुणनियंत्रण निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत.सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खताची एक पोलीस केस दाखल करण्यात येऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राघवेंद्र फर्टीलायझर प्रा. लि. कोल्हापूर यांचे सेंद्रीय खताचे नावाखाली ग्रेड व घटक छपाई नसलेल्या १४३ बॅग किंमत एक लाख ४३ हजार २५० रुपयांचा साठा आढळून आला होता. तसेच खरीप हंगामात बीटी कपाशीच्या ३ व इतर बियाण्यांच्या ७६ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व प्रकरणात पंचनामे करून संबंधित शेतकऱ्याला अहवाल देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)अप्रमाणित नमुन्यांवर कार्यवाहीजिल्ह्यात ४२ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यामध्ये ४ प्रकरणात ताकिदपात्र, ३८ मध्ये न्यायालयीन कारवाई सुरू आहे. कीटकनाशकाचे ११ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले, तर बियाण्यांचे ३४ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यामध्ये १२ नमुने ताकिदपात्र व २२ नमुने कोर्टकेस पात्र आहे. तक्रारीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधाजिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोईकरिता व तक्रार निवारण करण्यासाठी १८००२३३४००० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मागील हंगामात या क्रमांकावर फक्त आठ तक्रारी प्राप्त झाल्यात त्या सर्व शेतकऱ्यांचे शंका निरसन करण्यात आले. या क्रमांकावर शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन केले आहे.