शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

जिल्ह्यात दहावीच्या ४०,६६३ विद्यार्थ्यांची ढकलगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST

अमरावती : काेविड १९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ...

अमरावती : काेविड १९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात दहावीचे ४०,६६३ विद्यार्थी थेट पुढील वर्गात प्रवेश घेणार आहे. शिक्षण मंडळामार्फत अंतर्गत मूल्यमापनाद्धारे उत्तीर्ण करण्यात येणार आहे.

केंद्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे गुणांच्या समाणिकरणासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे हुशार विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पण, ‘ढ’ विद्यार्थ्यांनी ही नामी संधी ठरली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे याबाबत लवकरच गाईडलाईन जारी करण्यात येणार आहे. मात्र, परीक्षेच्या तयारीसाठी रात्रंदिवस ६ ते ८ तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

--------------------

कोट

यंदा दहावीची परीक्षा होणार असल्याने मुलीने बरीच तयारी केली होती. ऑनलाईन शिक्षणाव्यतिरिक्त खासगी शिकवणीतून अभ्यासाची तयारी पूर्ण झाली. आता परीक्षाच रद्द केल्याने वर्षभर अभ्यासासाठी घेतलेले श्रम वाया गेले.

- राजकन्या मराठे, पालक.

---------------

कोट

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. लॉकडाऊनच्या काळात ऑफलाईन परीक्षा होणार असल्याने मुलाने अभ्यासासाठी बऱ्यापैकी तयारी केली. प्रश्नसंच सोडवून बघितले. मात्र, ही सर्व मेहनत पाण्यात गेली. परीक्षा न घेता उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळेल.

राजेश सपकाळे, पालक.