शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४० हजार हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST

सार्वजनिक जागा, गायरान घेतले ताब्यात, लालफीतशाहीचा हातभार मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : ब्रिटिश काळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या जागांना अतिक्रमणाचे ग्रहण ...

सार्वजनिक जागा, गायरान घेतले ताब्यात, लालफीतशाहीचा हातभार

मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : ब्रिटिश काळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या जागांना अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. १४ तालुक्यातील जवळपास ४० हजार हेक्टर जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. या जागा व गायरानावर कब्जाच्या गंभीर प्रकारात महसूल विभागातील लालफीतशाहीचा अधिक हातभार लागला असल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रत्येक गावात सार्वजनिक उत्सवासाठी जागा आरक्षित असते तसेच स्मशानभूमी, मंदिरे, पाणीपुरवठा, दवाखाना, शाळा बांधकाम आदी सार्वजनिक कामांकरिता ग्रामपंचायतीकडे जागेची नोंद असते. या जागेचे संरक्षण ग्रामपंचायतीकडे असताना त्यांच्याकडूनच अतिक्रमिकाला ८-अ ला नोंदणी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत़ अनेक गावांमधील पुढाऱ्यांनी बांधकाम करून अशा जागा आपल्या नावाने केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

गायरान फस्त, जनावरे चारायची कुठे?

गावातील गायरान तलाठ्यांना हातात घेऊन स्वत:च्या नावाने करण्यात आले आहेत. भोगवटदार वर्ग २ चे भोगवटदार वर्ग १ अशी नोंद करून त्यांची विक्री करण्याचे व्यवहार युद्धस्तरावर सुरू आहे. आताजनावरे चारायची कशी, असा सवाल गावागावांतील गुराख्यांपुढे उपस्थित होत आहे.

देवस्थानांच्या जमिनीचा गैरवापर

प्रत्येक गावातील देवस्थानांकरिता देखभालीच्या खर्चाची तजवीज करण्याकरिता जमिनी राखीव ठेवण्यात आल्या आहेत़ त्या ९९ वर्षांच्या कराराने परस्पर बळकावल्याचे समोर आले आहे.

शाळांच्या जमिनीवर लक्ष देण्याची गरज

प्रत्येक गावात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या जमिनी आहेत़ दरवर्षी त्यांचा पिके काढण्यासाठी लिलाव केला जातो. अशा जमिनीवर अतिक्रमण केल्याचे शिक्षण विभागाच्या गावीही नाही. धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यांतील शाळांच्या जमिनीचे धुरे नजीकच्या शेतकऱ्यांनी काढून आपल्या ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. शिक्षण व महसूल प्रशासनाचे या बाबीकडे दुर्लक्ष आहे.

मृत व्यक्तींच्या जमिनी गेल्या कुठे?

गावातील मृत व्यक्तीचे वारस नसल्यामुळे अशा जमिनींवर दलालांनी ताबा दाखविला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खोट्या खरेदी खत करून या जमिनी दलालांनी मागील पाच वर्षांत बळकावल्या आहेत. गावातील तलाठ्यांनी कोणताही जाहीरनामा काढण्याऐवजी तथा या जमिनी सरकारजमा न करता अशा शेतजमिनीच्या सातबारावर दलालाचे नाव चढविले आहे.

-----------------

उपविभागातील ई-क्लास, शाळेच्या तथा मृत व्यक्तीच्या जमिनीबाबत हेराफेरी झाली असल्यास संबंधितांनी थेट लेखी तक्रार करावी. यात चौकशीनंतर प्रशासनातील जो दोषी आढळेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

- इब्राहिम चौधरी, उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे