शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

जिल्ह्यातील ४० हजार हेक्टर शासकीय जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST

सार्वजनिक जागा, गायरान घेतले ताब्यात, लालफीतशाहीचा हातभार मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : ब्रिटिश काळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या जागांना अतिक्रमणाचे ग्रहण ...

सार्वजनिक जागा, गायरान घेतले ताब्यात, लालफीतशाहीचा हातभार

मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : ब्रिटिश काळापासून सार्वजनिक मालमत्ता असलेल्या जागांना अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. १४ तालुक्यातील जवळपास ४० हजार हेक्टर जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहे. या जागा व गायरानावर कब्जाच्या गंभीर प्रकारात महसूल विभागातील लालफीतशाहीचा अधिक हातभार लागला असल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रत्येक गावात सार्वजनिक उत्सवासाठी जागा आरक्षित असते तसेच स्मशानभूमी, मंदिरे, पाणीपुरवठा, दवाखाना, शाळा बांधकाम आदी सार्वजनिक कामांकरिता ग्रामपंचायतीकडे जागेची नोंद असते. या जागेचे संरक्षण ग्रामपंचायतीकडे असताना त्यांच्याकडूनच अतिक्रमिकाला ८-अ ला नोंदणी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहेत़ अनेक गावांमधील पुढाऱ्यांनी बांधकाम करून अशा जागा आपल्या नावाने केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

गायरान फस्त, जनावरे चारायची कुठे?

गावातील गायरान तलाठ्यांना हातात घेऊन स्वत:च्या नावाने करण्यात आले आहेत. भोगवटदार वर्ग २ चे भोगवटदार वर्ग १ अशी नोंद करून त्यांची विक्री करण्याचे व्यवहार युद्धस्तरावर सुरू आहे. आताजनावरे चारायची कशी, असा सवाल गावागावांतील गुराख्यांपुढे उपस्थित होत आहे.

देवस्थानांच्या जमिनीचा गैरवापर

प्रत्येक गावातील देवस्थानांकरिता देखभालीच्या खर्चाची तजवीज करण्याकरिता जमिनी राखीव ठेवण्यात आल्या आहेत़ त्या ९९ वर्षांच्या कराराने परस्पर बळकावल्याचे समोर आले आहे.

शाळांच्या जमिनीवर लक्ष देण्याची गरज

प्रत्येक गावात जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या जमिनी आहेत़ दरवर्षी त्यांचा पिके काढण्यासाठी लिलाव केला जातो. अशा जमिनीवर अतिक्रमण केल्याचे शिक्षण विभागाच्या गावीही नाही. धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यांतील शाळांच्या जमिनीचे धुरे नजीकच्या शेतकऱ्यांनी काढून आपल्या ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. शिक्षण व महसूल प्रशासनाचे या बाबीकडे दुर्लक्ष आहे.

मृत व्यक्तींच्या जमिनी गेल्या कुठे?

गावातील मृत व्यक्तीचे वारस नसल्यामुळे अशा जमिनींवर दलालांनी ताबा दाखविला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खोट्या खरेदी खत करून या जमिनी दलालांनी मागील पाच वर्षांत बळकावल्या आहेत. गावातील तलाठ्यांनी कोणताही जाहीरनामा काढण्याऐवजी तथा या जमिनी सरकारजमा न करता अशा शेतजमिनीच्या सातबारावर दलालाचे नाव चढविले आहे.

-----------------

उपविभागातील ई-क्लास, शाळेच्या तथा मृत व्यक्तीच्या जमिनीबाबत हेराफेरी झाली असल्यास संबंधितांनी थेट लेखी तक्रार करावी. यात चौकशीनंतर प्रशासनातील जो दोषी आढळेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

- इब्राहिम चौधरी, उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे