शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

स्वच्छ अमरावती जिल्ह्यासाठी ४० हजार गृहभेटी अभियान

By admin | Updated: August 22, 2016 00:04 IST

जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हाभरात सोमवार २२ आॅगस्टपासून सुमारे ४० हजार गुहभेटी अभियान राबविण्यात येणार आहे.

कार्यशाळा : सोमवारपासून राबविणार अभियान अमरावती : जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हाभरात सोमवार २२ आॅगस्टपासून सुमारे ४० हजार गुहभेटी अभियान राबविण्यात येणार आहे. याविषयावर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, सीईओ के.एच. कुलकर्णी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय इंगळे, सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे आदींच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)या राष्ट्रीय कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. सन २०१६-१७ मधील वार्षिक कृती आराखड्यांतर्गत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतींमधील वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांत २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत राज्यव्यापी गृहभेटी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावनिहाय गृहभेटी घेतल्या जाणार आहेत. यात संबंधित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग भेटीत राहणार आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांची भेट घेऊन कुटुंब प्रमुखाला शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. या अभियानाच्या कालावधीत सुमारे ४० हजार गृहभेटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअनुषंगाने जिल्हाभरातील जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त करावे, नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांनी केले आहे. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेला प्रदीप बद्रे, दिनेश गाडगे यांनी मोलाचे मागदर्शन केले. याप्रसंगी खातेप्रमुख, पदाधिकारी गटविकास अधिकारी नोडल आॅफिसर बीआरसी कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी प्रदीप बद्रे, दिनेश गाडगे, बर्डे, दर्शना गौतम, धनंजय तिरमारे, नीलेश नागपूरकर, बाळासाहेब बोर्डे, अजिंक्य काळे, भरत वानखडे आदींचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)