शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ अमरावती जिल्ह्यासाठी ४० हजार गृहभेटी अभियान

By admin | Updated: August 22, 2016 00:04 IST

जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हाभरात सोमवार २२ आॅगस्टपासून सुमारे ४० हजार गुहभेटी अभियान राबविण्यात येणार आहे.

कार्यशाळा : सोमवारपासून राबविणार अभियान अमरावती : जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हाभरात सोमवार २२ आॅगस्टपासून सुमारे ४० हजार गुहभेटी अभियान राबविण्यात येणार आहे. याविषयावर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, सीईओ के.एच. कुलकर्णी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय इंगळे, सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे आदींच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)या राष्ट्रीय कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. सन २०१६-१७ मधील वार्षिक कृती आराखड्यांतर्गत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतींमधील वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांत २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत राज्यव्यापी गृहभेटी अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावनिहाय गृहभेटी घेतल्या जाणार आहेत. यात संबंधित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग भेटीत राहणार आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांची भेट घेऊन कुटुंब प्रमुखाला शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. या अभियानाच्या कालावधीत सुमारे ४० हजार गृहभेटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याअनुषंगाने जिल्हाभरातील जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त करावे, नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांनी केले आहे. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेला प्रदीप बद्रे, दिनेश गाडगे यांनी मोलाचे मागदर्शन केले. याप्रसंगी खातेप्रमुख, पदाधिकारी गटविकास अधिकारी नोडल आॅफिसर बीआरसी कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी प्रदीप बद्रे, दिनेश गाडगे, बर्डे, दर्शना गौतम, धनंजय तिरमारे, नीलेश नागपूरकर, बाळासाहेब बोर्डे, अजिंक्य काळे, भरत वानखडे आदींचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)