शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

40 टक्के एसटी बस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

नोव्हेंबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. सुरुवातीला या संपाची धार तीव्र होती. संपातील काही कर्मचारी पुन्हा सेवेत विलीनीकरणाशिवाय कामावर येण्यास इच्छुक नव्हते. मात्र काही कर्मचाऱ्यावर निलंबन,सेवा समाप्ती, बडतर्फी अशा कारवाई सुरू झाल्यानंतर कारवाईच्या धास्तीने अनेक कर्मचारी कामावर हजर होऊ लागले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुसऱ्या बाजूला महामंडळातर्फे रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही चालूच आहे. परिणामी जिल्ह्यात ६० टक्के वाहतूक अद्यापही बंद आहे. तर ४० टक्के  वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. अमरावतीसह जिल्ह्यातील ८ आगारांमध्ये ३६३ पैकी आजघडीला १२७  गाड्या ४१४  फेऱ्या मारत आहेत.नोव्हेंबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. सुरुवातीला या संपाची धार तीव्र होती. संपातील काही कर्मचारी पुन्हा सेवेत विलीनीकरणाशिवाय कामावर येण्यास इच्छुक नव्हते. मात्र काही कर्मचाऱ्यावर निलंबन,सेवा समाप्ती, बडतर्फी अशा कारवाई सुरू झाल्यानंतर कारवाईच्या धास्तीने अनेक कर्मचारी कामावर हजर होऊ लागले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुसऱ्या बाजूला महामंडळातर्फे रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ लागली. अमरावती आगारातून सध्या ३३, बडनेरा १२, परतवाडा १५, वरूड १६, चांदूर रेल्वे १७, दर्यापूर १०, मोर्शी १७, चांदूर बाजार ०८, अशा एकूण १२७  गाड्या  धावू लागल्या आहेत. दररोज या गाड्यांची सुमारे २९ हजार ७७१   किलोमीटरचा प्रवास करीत आहे.  त्यामध्ये सरासरी दररोज २२ हजार ६६० प्रवासी प्रवास करीत आहेत. यापूर्वी दररोज सरासरी ३५ लाखांचे उत्पन्न सध्या २० लाखावर आले आहे. त्यामुळे नेहमी तोट्यातच असणारी एसटीचा पुन्हा तोट्यातच चाके आहेत.   कामगार हजर न झाल्याने एसटी प्रशासनाकडून आतापर्यंत ४५० निलंबन कारवाई करण्यात आली आहे. निलंबितांपैकी  काही जण कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे   त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.  विशेष म्हणजे १३००  कर्मचारी आजही आपल्या मागणीवर ठाम असून ते कामावर रुजू झाले नाहीत.  त्यामुळे खासगी चालक कंत्राटी  पद्धतीने घेऊन बसेस चालविलेल्या जात  आहेत. 

खासगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणीजिल्ह्यात अद्यापही पूर्ण क्षमतेने एसटी वाहतूक सुरू झाली नाही.  त्याचा फायदा खासगी वाहतूकदार घेत आहेत. काही भागात ऑटो रिक्षा, टॅक्सीचालक,टॅव्हल्सचालक मनमानी  दराने भाडे घेऊन प्रवाशांची लूट करीत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढणे प्रवाशांसाठी आवश्यक आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप