शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

40 टक्के एसटी बस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

नोव्हेंबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. सुरुवातीला या संपाची धार तीव्र होती. संपातील काही कर्मचारी पुन्हा सेवेत विलीनीकरणाशिवाय कामावर येण्यास इच्छुक नव्हते. मात्र काही कर्मचाऱ्यावर निलंबन,सेवा समाप्ती, बडतर्फी अशा कारवाई सुरू झाल्यानंतर कारवाईच्या धास्तीने अनेक कर्मचारी कामावर हजर होऊ लागले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुसऱ्या बाजूला महामंडळातर्फे रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही चालूच आहे. परिणामी जिल्ह्यात ६० टक्के वाहतूक अद्यापही बंद आहे. तर ४० टक्के  वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. अमरावतीसह जिल्ह्यातील ८ आगारांमध्ये ३६३ पैकी आजघडीला १२७  गाड्या ४१४  फेऱ्या मारत आहेत.नोव्हेंबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. सुरुवातीला या संपाची धार तीव्र होती. संपातील काही कर्मचारी पुन्हा सेवेत विलीनीकरणाशिवाय कामावर येण्यास इच्छुक नव्हते. मात्र काही कर्मचाऱ्यावर निलंबन,सेवा समाप्ती, बडतर्फी अशा कारवाई सुरू झाल्यानंतर कारवाईच्या धास्तीने अनेक कर्मचारी कामावर हजर होऊ लागले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुसऱ्या बाजूला महामंडळातर्फे रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ लागली. अमरावती आगारातून सध्या ३३, बडनेरा १२, परतवाडा १५, वरूड १६, चांदूर रेल्वे १७, दर्यापूर १०, मोर्शी १७, चांदूर बाजार ०८, अशा एकूण १२७  गाड्या  धावू लागल्या आहेत. दररोज या गाड्यांची सुमारे २९ हजार ७७१   किलोमीटरचा प्रवास करीत आहे.  त्यामध्ये सरासरी दररोज २२ हजार ६६० प्रवासी प्रवास करीत आहेत. यापूर्वी दररोज सरासरी ३५ लाखांचे उत्पन्न सध्या २० लाखावर आले आहे. त्यामुळे नेहमी तोट्यातच असणारी एसटीचा पुन्हा तोट्यातच चाके आहेत.   कामगार हजर न झाल्याने एसटी प्रशासनाकडून आतापर्यंत ४५० निलंबन कारवाई करण्यात आली आहे. निलंबितांपैकी  काही जण कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे   त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.  विशेष म्हणजे १३००  कर्मचारी आजही आपल्या मागणीवर ठाम असून ते कामावर रुजू झाले नाहीत.  त्यामुळे खासगी चालक कंत्राटी  पद्धतीने घेऊन बसेस चालविलेल्या जात  आहेत. 

खासगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणीजिल्ह्यात अद्यापही पूर्ण क्षमतेने एसटी वाहतूक सुरू झाली नाही.  त्याचा फायदा खासगी वाहतूकदार घेत आहेत. काही भागात ऑटो रिक्षा, टॅक्सीचालक,टॅव्हल्सचालक मनमानी  दराने भाडे घेऊन प्रवाशांची लूट करीत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढणे प्रवाशांसाठी आवश्यक आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप