शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

गेल्या सहा वर्षांत केली ४० ग्रामसेवकांनी आत्महत्या

By admin | Updated: January 13, 2015 22:53 IST

ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेला ग्रामसेवक राजकीय पुढाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि १२० योजनांच्या अधिभाराने माणसीक तणावात आहे. मागील सहा वर्षात विदर्भातील ४० ग्रामसेवकांनी

मोहन राऊ त - धामणगाव रेल्वेग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेला ग्रामसेवक राजकीय पुढाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि १२० योजनांच्या अधिभाराने माणसीक तणावात आहे. मागील सहा वर्षात विदर्भातील ४० ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्यानंतर ४८ जनांवर केवळ आकसापोटी प्रााणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती आहे़ नवीन सरकारकडून न्याय मिळण्याची अपेक्षा या ग्रामसेवकांनी व्यक्त केली आहे़अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या पाच जिल्ह्यात ३ हजार १३० तर नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यात ४ हजार २२४ ग्रामसेवक कार्यरत आहे़ या विदर्भातील गावाच्या विकासात ग्रामसेवकांचा मोठा मोलाचा वाटा असतो. घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यापासून तर गावातील स्वच्छता, आरोग्य, ग्रामसभा घेणे असे विविध कामे ग्रामसेवकांना सांभाळावी लागतात. मात्र, एकाच ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतीचा अधीभार असल्यामुळे या ग्रामसेवकाला अधीक मानसिक व शारीरिक ताण दररोज सहन करावा लागतो़ पूर्वी गावातील मोजकी कामे या ग्रामसेवकाकडे होती़ आता तब्बल केंद्र व राज्य शासनाच्या १२० योजनांची ग्रामीण स्तरावरील योजनांची माहिती तसेच पाठपुरावा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर आली आहेत़ दररोज मंत्रालयातून निघालेला शासकीय अध्यादेश जि़प़ व पंचायत समितीपर्यंत पोहोचताच त्याच दिवशी माहिती मागण्याचे कार्य वरिष्ठ स्तरावरून होत असल्याने ग्रामसेवकांना अडचणीला सामोरे जावे लागते़ ग्रामसेवक तांत्रिक दृष्टीने नसताना त्यांच्याकडून ग्रामस्तरावर बांधकाम करून घेतल्या जाते़ पूर्वी ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीत कामाचा ठराव घेऊन वरिष्ठ विभागाला पाठविण्याचे काम होते़ परंतु आता थेट महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसारख्या कामाची जबाबदारी ग्रामसेवकावर आली आहे़ एकीकडे गावात दोन गटात निर्माण होणारे तंटे तर दुसरीकडे बांधकाम सारखा विभाग ग्रामसेवकाकडे दिल्याने ग्रामस्थांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याची आपली कैफियत ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलाकर वनवे व तालुकाध्यक्ष नरेंद्र चौधरी तसेच जयंत खैर यांनी मांडली़जिल्ह्यातील १८ ग्रामसेवक सेवा निवृत्त होऊनही त्यांना निवृत्ती वेतन अद्यापही मिळत नाही़ जिल्हा परिषद हा विभाग ग्रामसेवक ज्या गावातून सेवा निवृत्त झाला त्या गावातील कामाचे नाहरकत प्रमाणपत्र मागते़ सदर प्रमाणपत्र देण्यास पंचायत समिती अनेक महिने लावत असल्यामुळे या सेवा निवृत्त ग्रामसेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येत असल्याचे युनियनचे विभागीय उपाध्यक्ष बबन कोल्हे यांनी सांगीतले़ दरवेळी शासनाकडे अनेक मागण्या ठेवल्या असता केवळ एकच मागणी पूर्ण करण्यात येते़ ग्रामविकासासाठी कोणताही भेदभाव न करता आपले कार्य जोमाने करणारा ग्रामसेवकाला कोणतेही संरक्षण नाही़ गावातील राजकीय पुढाऱ्यांनी खोटी तक्रार केली तरी वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात येते़ कोणताही ठोस पुरावा नसताना ग्रामसेवकाला निलंबित करण्यात येत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे़ असे जिल्हा युनियनचे विलास बिरे यांनी आपले मत व्यक्त केले़ एक ते दोन हजार लोकसंख्येच्या मागे एका ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते़ १५ हजार लोकसंख्येच्या गावासाठी ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात येत।. आज प्रत्येक शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती सोबत वेतन श्रेणी मिळते, परंतु राज्यातील एकमेव ग्रामविस्तार अधिकाऱ्यांचे हे पद आहे़ ११० ग्रामविकास अधिकारी आजही वेतन श्रेणीपासून वंचित आहे़