शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

३९ गावे नळांविना!

By admin | Updated: December 14, 2015 00:19 IST

तालुक्यातील ३८ गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या गावांना हातपंपाने पाणीपुरवठा सुरू आहे. हातपंपाने होणारा पाणीपुरवठ्यात शुद्धीकरण्याची कुठलीही यंत्रणा नसल्याने येथील...

अचलपूर तालुक्यातील प्रकार : १४५ गावांना नळयोजनेतून पाणीपुरवठासुनील देशपांडे अचलपूरतालुक्यातील ३८ गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या गावांना हातपंपाने पाणीपुरवठा सुरू आहे. हातपंपाने होणारा पाणीपुरवठ्यात शुद्धीकरण्याची कुठलीही यंत्रणा नसल्याने येथील नागरिकांना जलजन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात एकूण १८४ गावे आहेत. त्यापैकी ४८ गावे उजाड आहेत. सध्या १३६ गावे आबाद आहेत. बहुतांश गावांत रस्ते, स्वच्छता, सांडपाण्याची समस्या आहे. पंचायत समितीअंतर्गत ७० ग्रामपंचायती येतात. गावातील पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. १४५ गावांना नळयोजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातील ३५ गावांमध्ये विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यात पाणीसाठा विपुल असला तरी ग्रामीण भागात वारंवार होणारा खंडित विद्युत पुरवठा व लोकप्रतिनिधींचे ग्रामीण भागांकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ३८ गावांना बाराही महिने हातपंपाद्वारे पिण्याच्या पाण्याची तहान भागवावी लागत आहे. तालुक्यात जलशुद्धीकरण यंत्र नसल्याने क्षारयुक्त पाणी ग्रामस्थांना प्यावे लागते. उन्हाळ्यात तालुक्यात पाणीप्रश्न अधिक जटील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.उन्हाळयात भीषण पाणीटंचाईपाणीसाठा मुबलक असला तरी उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात असल्याने काही गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. काही वेळा हातपंपांना पाणी येणे बंद होते. खोल पाणी उपसले जात असल्याने हातपंपात बिघात होऊन ते बंद पडतात. परिणामी पाणीटंचाई निर्माण होते. याचा सर्वाधिक त्रास महिला वर्गाला सहन करावा लागतो. सौर ऊर्जेवरील हातपंपअचलपूर पंचायत समितीअंतर्गत जलालपूर व कुंभी उडाण या दोन गावांतील हातपंपामधील पाणी काढण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. पावसाळ्यात सूर्यनारायणाने दर्शन देणे बंद केले की, समस्या निर्माण होते. तालुक्यात हातपंपांची संख्या ४२७ असून खानापूर, चांदुरा, जहागीर, औरंगापूर उडाण, जवळापूर, शेकापूर, वडुरा, जलालपूर, शंकरपूर, शहापूर यांसह ११ गावांत दुहेरी हातपंप आहेत. ११० गावांत कायमस्वरुपी पाणीपुरवठ्याची नळयोजना असल्याचा दावा पंचायत समितीतर्फे केला जात आहे.