शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
4
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
5
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
6
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
7
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
8
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
9
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
10
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
11
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
12
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
13
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
14
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
15
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
16
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
17
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
18
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
19
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
20
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

३९ लघु प्रकल्पांत फक्त ‘मृतसाठा’

By admin | Updated: May 6, 2016 00:13 IST

सलग दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील १ मुख्य, ४ मध्यम व ७५ लघुप्रकल्पांची स्थिती बिकट आहे.

पाणीबाणी : २४ प्रकल्प कोरडे, उर्ध्व वर्धातही ४० टक्के ‘डेड वॉटर’ गजानन मोहोड अमरावतीसलग दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील १ मुख्य, ४ मध्यम व ७५ लघुप्रकल्पांची स्थिती बिकट आहे. सद्यस्थितीत २४ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे झाले असून ३९ लघु प्रकल्पांत केवळ मृतसाठा शिल्लक आहे. ४ मध्यम प्रकल्पातही सद्या ९.०४ दलघमी व उर्ध्व वर्धा प्रकल्पातही सध्या असणाऱ्या १४४.१० दलघमी साठ्यामध्ये ११४.२२ दलघमी मृतसाठा आहे. प्रकल्पात असणाऱ्या एकूण साठ्यापैकी रोज १ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पावसाळा माघारल्यास जिल्ह्याची तहान भागणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात एकमेव असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणात सद्यास्थितीत ५६४.०५ जीवंत साठ्याच्या तुलनेत १४४.१० दलघमी साठा शिल्लक आहे व यामध्ये ही ११४.२२ मृतसाठा असल्याने प्रत्यक्षतात २९.१० दलघमी जलसाठा असल्याची जलसंपदा विभागाची माहिती आहे. जिल्ह्यातील ४ प्रकल्पांपैकी शहानूर प्रकल्पात सद्यस्थितीत २०.५२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे व यामध्ये ही १.८१ दलघमी मृतसाठा आहे. चंद्रभागा धरणात आज १५.४१ दलघमी जलसाठा आहे. यापैकी ०.१८ दलघमी मृतसाठा आहे. पूर्णा प्रकल्पात सद्या १४.५५ दलघमी जलसाठ्यामध्ये ८.१६ दलघमी मृतसाठा आहे व सपण प्रकल्पात सद्यास्थितीत असणाऱ्या १८.५४ दलघमी जलसाठ्या मध्ये ०.६६ दलघमी मृतसाठा आहे. एकूण चार मध्यम प्रकल्पात १६१.२६ जिवंत जलसाठ्यापैकी सद्यस्थितीत ७१.२७ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. यामध्येही ९.०४ दलघमी मृतसाठा आहे. जिल्ह्यात ७५ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये ८९२.७७ जलसाठ्याच्या तुलनेत सद्यास्थितीत ३७७.९१ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये २३६.३१ दलघमी मृतसाठा असल्याने या लघुप्रकल्पात फक्त १४१.६० दलघमी पाण्याचा साठा शिाल्लक आहे. यंदा जर पावसाळा माघारल्यास मृतसाठ्यावर तहान भागवावी लागेल.पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन मृग नक्षत्रात वेळेवर झाले तरीही मान्सून नियमित व्हायला जूनचा दुसरा आठवडा लागतो. त्यानंतर कोरड्या पडलेल्या जलप्रकल्पात पाण्याचा संचय होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सर्वच घटक यंदा मान्सून लवकर यावा असी प्रतीक्षा करीत आहे. एक दलघमी म्हणजे १०० कोटी लिटर एक दलघमी म्हणजे १०० कोटी लीटर पाणी जिल्ह्यात एकमेव मुख्य असणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सद्यास्थिीत १४४.१० दलघमी म्हणजे १४४ कोटी लिटर पाण्याचा साठा शिल्लक आहे. पाणी पुरवठा योजना , शेती व औद्योगिक क्षेत्रासाठी दररोज या पाण्याचा वापर होत आहे व सद्यास्थितीत असणाऱ्या जलसाठ्यापैकी १०० कोणी लिटर पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे.