शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

३८४ महाविद्यालये परवानगीच्या प्रतीक्षेत, विद्यापीठाचे विभागीय आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:12 IST

अमरावती : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ...

अमरावती : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने संलग्न ३८४ महाविद्यालयांसाठी विभागीय आयुक्तांना शनिवारी पत्र पाठवून परवानगी मागितली आहे.

अकृषि विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये शिक्षण सुरू करण्याचे धाेरण राबविले जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू होतील. अंतिम वर्ष, अंतिम सत्रातील शिकवणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता, विद्यार्थी, प्राध्यापकांची सुरक्षितता जाेपासली जाणार आहे. महाविद्यालयात गर्दी होणार नाही. मास्कचा वापर, दाेन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे शारीरिक अंतर, थर्मल गनद्वारे तापमानाची तपासणी आदी नियमावलींचे पालन करावे लागणार आहे.

तत्पूर्वी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात येणार आहे. कोविड-१९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन काटेकारेपणे करावे लागणार आहे. ताप, खोकला किंवा सर्दी असल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश असणार नाही, ही बाब प्रशासनाने स्पष्ट केली. ५ नोव्हेंबर २०२० रोजी यूजीसीच्या नियमांचे पालन करणे शिक्षण संस्थाचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

-----------------

विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतरच निर्णय

अमरावती विभागात कोरोना संसर्गाचा वेग वाढतो आहे. त्यामुळे जिल्हानिहाय कोरोना संसर्गाचे रुग्ण आणि स्थानिक परिस्थितीचा वेध घेऊन महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडून गाईडलाईन आल्यानंतरच महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कुलसचिव तुषार देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.