शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मार्चपश्चात ३७३ गावांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:13 IST

गजानन मोहोड अमरावती : पावसाळापश्चात आलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याची खैर राखली आहे. भूजलस्थिती काठावरच असल्याने अर्ध्याअधिक गावांना यंदाचा उन्हाळा ...

गजानन मोहोड

अमरावती : पावसाळापश्चात आलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याची खैर राखली आहे. भूजलस्थिती काठावरच असल्याने अर्ध्याअधिक गावांना यंदाचा उन्हाळा जड जाणार नाही. मात्र, ३७३ गावांना मार्चपश्चात कोरड राहणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ३७३ उपाययोजना प्रस्तावित केल्या. यावर किमान ६.४६ कोटींचा खर्च होणार आहे.

पाच वर्षांचा आढावा घेता जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलीच नाही. मात्र, त्या तुलनेत यंदा मेळघाट वगळता ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण झाल्याने भूजलस्थिती भातकुली, चांदूर रेल्वे व चांदूरबाजार तालुक्यात दीड मीटरपर्यंत वाढली, तर उर्वरित ११ तालुक्यांत मात्र, सरासरी इतकीच आहे. त्यामुळे जलस्त्रोत सध्या कोरडे पडले नसले तरी, मार्च महिन्यापश्चात ४५ अंशाच्या तापमानात त्यांना बुड लागण्याची शक्यता आहे. यंदा प्रकल्पांमध्ये शतप्रतिशत साठा असल्याने रबी पिकांना कालव्याचे पाणी मिळाले व विहिरीद्वारे होणारा अमऱ्याद उपसा काहीसा थांबल्याचा असर भूजलस्तराच्या वाढीवर झालेला आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जरा उशिराच जाग आलेली आहे. साधारणपणे डिसेंबर महिन्यात तयार करण्यात येणारा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा चक्क मार्च महिन्यात तयार झालेला आहे. आता यासाठीही कोरोना संसर्गाचे कारण देणार काय, असा प्रश्न उभा ठाकला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईने पावसाळा लागला तरी पाणीपुरवठ्याचे कामे सुरूच राहत असल्याची उदाहरणे आहेत. निविदा प्रक्रियेला उशीर होतो व यासह अनेक कामेही बारगळल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

खासगी २२६ विहिरींचे अधिग्रहण करणार

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीत २२६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे व यात अमरावती तालुक्यात ३१, नांदगाव खंडेश्वर २८, भातकुली १२, मोर्शी ४९, वरूड ३९, चांदूर रेल्वे ३०, धामणगाव रेल्वे २४, चांदूर बाजार व अंजनगाव सुर्जी ३ व चिखलदरा तालुक्यात सात विहिरींचे अधिग्रहण केल्या जाणार आहे.

बॉक्स

१५ टँकरसह ८८ नळ योजनांची विशेष दुरुस्ती

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी यंदा १५ टँकरचे नियोजन आहे. याशिवाय ८८ नळयोजनांची विशेष दुरुस्ती केली जाईल. यात अमरावती तालुक्यात ६, नांदगाव खंडेश्वर १३, तिवसा ४, मोर्शी १३, वरूड ९, चांदूर रेल्वे ११, धामणगाव २६, चिखलदरा ४, चांदूरबाजार व अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रत्येकी १ नळयोजनेची दुरुस्ती केली जाईल.

बॉक्स

२३ तात्पुरत्या योजना, ३५ विंधन विहिरी

तात्पुरत्या २३ पूरक नळयोजना तयार करण्यात येतील. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यात १२, चिखलदरा ४, अचलपूर ५ व अमरावती आणि मोर्शी तालुक्यात प्रत्येकी १ राहणार आहे. याशिवाय ३५ विंधनविहिरी तयार करण्यात येतील. यात धामणगाव ११, चांदूर बाजार व नांदगाव खंडेश्वर ६, तिवसा २ व अचलपूर, चिखलदरा तालुक्यात प्रत्येकी एक राहणार आहे.

बॉक्स

एप्रिल ते जूनसाठी ४४१ उपाययोजना प्रस्तावित

यंदा उन्हाची प्रखरता असणाऱ्या एप्रिल ते जून या कालावधीत ४४१ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यात अमरावती तालुक्यात ४४, नांदगाव ५०, तिवसा २१, मोर्शी ६३, वरूड ५२, चांदूर रेल्वे ५४, धामणगाव ६२, अचलपूर ६, चांदूरबाजार २३, अंजनगाव २, चिखलदरा तालुक्यासाठी २४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत.

बॉक्स

असा लागणार तालुकानिहाय निधी

२८१ गावांमधील ४४१ उपाययोजनांसाठी ६.४६ कोटींचा खर्च येणार आहे. यात अमरावती तालुक्यात ४४.२४ लाख, नांदगाव ५८.६२ लाख, तिवसा २१.९८ लाख, मोर्शी ९१.४६ लाख, वरूड ५६.५६ लाख, चांदूर रेल्वे ४४.२० लाख, धामणगाव १.५१ कोटी, अचलपूर २८ लाख, चांदूरबाजार ७५.६२, लाख, अंजनगाव ४.६२ लाख व चिखलदरा तालुक्यात ६९.५३ लाखांचा खर्च प्रस्तावित आहे. भातकुली तालुका निरंक आहे.

पाईंटर

एप्रिल ते जून कालावधी

पाणीटंचाईची एकूण गावे : ३८३

एकूण उपायोजना प्रस्तावित : ४०१

१३ तालुक्यांसाठी खर्च : ६.४६ कोटी