शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

११ लाख पशुधनाला ३६ हजार मे.टन वैरणची तूट; रोज ३४६२ मे.टन चाऱ्याची गरज

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 10, 2024 23:38 IST

रखरखत्या उन्हाळ्याचे दोन महिने कठीणच

गजानन मोहोड, अमरावती: गतवर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत. सध्या दर महिन्याला १८ हजार मे.टन वैरणीचा तुटवडा पडत असल्याने पशुपालकांवर चांगलाच ताण आलेला आहे. प्रशासनाने उशिरा घेतलेल्या आढाव्याशिवाय फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. शिवाय चाऱ्याचे मागणी अर्ज प्राप्त नसल्याचे सांगत पशुसंवर्धन विभागाने हात झटकले आहेत.

जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण १०,१७,८१७ पशुधन जिल्ह्यात आहे. यावर्षी सोयानीन, हरभरा, तुरीच्या कुटाराची कमतरता आहे. या पशुधनाला दरदिवशी किमान ३४६२ मे.टन चाऱ्याची गरज आहे. सोबतच हिरवा चारा देखील आवश्यक आहे. मात्र, सर्वत्र रखरखते असल्याने रानावनात चारा नाही. शिवाय साठवणूक केलेली वैरण संपल्यात जमा आहे. काही शेतकऱ्यांनी थोडीफार चाऱ्याची साठवणूक पेरणी काळात बैलजोडीसाठी केलेली आहे. नवीन चारा तयार व्हायला किमान दोन ते अडीच महिन्यांचा अवधी आहे. या कालावधीत पशुधन कशी जगवावी, हा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. 

असा लागतो रोजचा चारा!

जिल्ह्यात पशुधनाला रोज ३४६१.८४ मे.टन चारा लागतो. यामध्ये अमरावती २७८.५७ मे. टन, अंजनगाव सुर्जी १७८.८०, अचलपूर ३९५.३७, भातकुली १४४.१२, चांदूर बाजार २१४.५४, चांदूर रेल्वे १८५.७६, धामणगाव २२२.९८,धारणी ३७१.३७, दर्यापूर २११.५७, चिखलदरा ३६९.६७, मोर्शी २५१.३९, तिवसा १७७.१४, वरुड २५०.२८ व नांदगाव तालुक्यात २१०.२१ मे. टन चारा लागतो.

टॅग्स :Amravatiअमरावती