शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

११ लाख पशुधनाला ३६ हजार मे.टन वैरणची तूट; रोज ३४६२ मे.टन चाऱ्याची गरज

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 10, 2024 23:38 IST

रखरखत्या उन्हाळ्याचे दोन महिने कठीणच

गजानन मोहोड, अमरावती: गतवर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत. सध्या दर महिन्याला १८ हजार मे.टन वैरणीचा तुटवडा पडत असल्याने पशुपालकांवर चांगलाच ताण आलेला आहे. प्रशासनाने उशिरा घेतलेल्या आढाव्याशिवाय फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. शिवाय चाऱ्याचे मागणी अर्ज प्राप्त नसल्याचे सांगत पशुसंवर्धन विभागाने हात झटकले आहेत.

जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण १०,१७,८१७ पशुधन जिल्ह्यात आहे. यावर्षी सोयानीन, हरभरा, तुरीच्या कुटाराची कमतरता आहे. या पशुधनाला दरदिवशी किमान ३४६२ मे.टन चाऱ्याची गरज आहे. सोबतच हिरवा चारा देखील आवश्यक आहे. मात्र, सर्वत्र रखरखते असल्याने रानावनात चारा नाही. शिवाय साठवणूक केलेली वैरण संपल्यात जमा आहे. काही शेतकऱ्यांनी थोडीफार चाऱ्याची साठवणूक पेरणी काळात बैलजोडीसाठी केलेली आहे. नवीन चारा तयार व्हायला किमान दोन ते अडीच महिन्यांचा अवधी आहे. या कालावधीत पशुधन कशी जगवावी, हा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. 

असा लागतो रोजचा चारा!

जिल्ह्यात पशुधनाला रोज ३४६१.८४ मे.टन चारा लागतो. यामध्ये अमरावती २७८.५७ मे. टन, अंजनगाव सुर्जी १७८.८०, अचलपूर ३९५.३७, भातकुली १४४.१२, चांदूर बाजार २१४.५४, चांदूर रेल्वे १८५.७६, धामणगाव २२२.९८,धारणी ३७१.३७, दर्यापूर २११.५७, चिखलदरा ३६९.६७, मोर्शी २५१.३९, तिवसा १७७.१४, वरुड २५०.२८ व नांदगाव तालुक्यात २१०.२१ मे. टन चारा लागतो.

टॅग्स :Amravatiअमरावती