शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी ३६ टेबल वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:11 IST

लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले होते. मात्र, उमेदवार २४ असल्यामुळे निकालास विलंब होणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता २० टेबलचे नियोजन करण्यात आले व याबाबत निवडणूक आयोगाला परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप ही परवानगी मिळालेली नाही.

ठळक मुद्देआयोगाला प्रस्ताव : सहा विधानसभा मतदारसंघांत राहणार १२० टेबल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले होते. मात्र, उमेदवार २४ असल्यामुळे निकालास विलंब होणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता २० टेबलचे नियोजन करण्यात आले व याबाबत निवडणूक आयोगाला परवानगी मागितली आहे. मात्र, अद्याप ही परवानगी मिळालेली नाही.जिल्हा निवडणूक विभागाच्या नियोजनानुसार नेमानी गोडाऊनमध्ये सहा गोदामांत सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबल मतमोजणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. मात्र यावेळी लोकसभेसाठी २४ उमेदवार व नोटा असे २५ उमेदवार असल्याने मतमोजणीला साहाजिकच विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाद्वारा प्रत्येक मतदारसंघात २० असे एकूण १२० टेबलांचे नियोजन केलेले आहे. म्हणजेच मतमोजणीसाठी ३६ टेबल वाढणार आहे व यामुळे किमान तीन तास तरी अगोदर निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यानुसार वाढीव टेबलांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. लवकरच आयोगाची मान्यता मिळेल, अन्यथा पूर्वीच्याच नियोजनाप्रमाणे मतमोजणी होईल, असे निवडणूक विभागाने सांगितले.मतमोजणीचे टेबल वाढल्यास मनुष्बळदेखील वाढणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर व दोन सहायक राहणार आहे. त्यामुळे सहा मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला ३६० कर्मचारी लागतील. याव्यतिरिक्त अन्य १०० असे एकूण ४६० ते ५०० मनुष्यबळाचे नियोजन तयार आहे. यासाठी आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा केली जात आहे. दोन हजार केंद्रांवरुन इव्हीएम नेमाणी गोडाऊनमध्ये सील करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.मतमोजणी प्रतिनिधीसाठी उमेदवारांची कसरतएका विधानसभा मतदारसंघात २० टेबल गृहीत धरल्यास प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे २४ उमेदवारांचे २४ प्रतिनिधी राहतील, म्हणजेच एका मतदारसंघात २० टेबलवर ४८० उमेदवारांचे प्रतिनिधी राहतील. असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असल्याने २,८८० प्रतिनिधी उपस्थित ठेवण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे. मात्र, प्रमुख राजकीय पक्ष वगळता अन्य उमेदवारांसाठी ही परीक्षाच ठरणार आहे.उमेदवारांची संख्या जास्त असल्याने फेरीदेखील जास्त होणार आहे. त्यामुळे १४ ऐवजी २० टेबलांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. अद्याप मंजुरी मिळालेली नाही. प्रस्ताव मान्य झाल्यास दोन ते तीन तास अगोदर निकाल लागेल.- शरद पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी