शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

३५४ गावांत प्रकाशाच्या वाटा खडतर !

By admin | Updated: September 30, 2015 00:22 IST

एकीकडे सिंचनाचा अनुशेष वाढत असताना महावितरणने जिल्ह्यातील वीज जोडणीतही अनुशेष कायम ठेवला आहे

तांत्रिकतेत अडकल्या वीज जोडण्या : लोकमत विशेषप्रदीप भाकरे अमरावतीएकीकडे सिंचनाचा अनुशेष वाढत असताना महावितरणने जिल्ह्यातील वीज जोडणीतही अनुशेष कायम ठेवला आहे. संपूर्ण संगणकीकरण आणि ‘डिजिटल व्हिलेज’ची संकल्पना आकाराला येत असताना जिल्ह्यातील ३५४ गावांत अद्यापही प्रकाश पोहोचलेला नाही. कधी वनविभागाच्या जाचक अटींमुळे तर कधी अन्य तांत्रिक कारणांमुळे या गावांच्या ‘प्रकाशवाटा’ खडतर बनल्या आहेत. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या सन २०११ च्या आकडेवारीनुसार १९९७ गावे आहेत. यात ४१५ स्वतंत्र ग्रामपंचायती व ४२८ गावे आहेत. यात ४१५ स्वतंत्र ग्रामपंचायती व ४२८ गट ग्रामपंचायती आहेत. १९९७ पैकी १६४३ गावांमध्ये वीजजोडणी पोहोचली आहे. ही आकडेवारी सन २०१३-१४ ची असून यंदा त्यात काही अंशी सुधारणा झाली असावी. मात्र, तब्बल ३५४ गावांचे विद्युतीकरण न झाल्याने या गावातील लोक अद्यापही संगणक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तुंपासून कोसो दूर आहेत. विद्युतीकरण नसल्याने सिंचनासाठी आवश्यक व्यवस्था कार्यान्वित झाली नाही. मोटरपंप चालविण्यासाठी वीजच नसल्याने येथील शेतकरी प्रगत आणि उपयोगी व्यवस्थेपासून अजूनही लांब आहेत. आकडेवारी खरी कुणाची ? अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे प्रसिध्द जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचनामध्ये प्रकाशित आकडेवारीवरुन जिल्ह्यातील ३५४ गावांत विद्युतीकरण झाले नाही, हे स्पष्ट होते. मात्र, महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही बाब नाकारली आहे. मेळघाटातील ३९ गावांमध्येच फक्त पारंपरिक वीज पोहोचलेली नाही, अशी माहिती महावितरणने दिली आहे. मेळघाटातील ३९ गावे वगळता जिल्ह्यातील उर्वरित गावात वीज पोहोचल्याचा दावा महावितरणकडून होत आहे. अशा स्थितीत ‘अर्थ व सांख्यिकी’च्या माहितीवर विश्वास ठेवावा की महावितरणचा दावा खरा म्हणावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थ, सांख्यिकी संचालनालयाने विद्युतीकरण न केलेल्या गावांबाबत प्रकाशित केलेली माहिती सुसंगत नाही. मेळघाटातील ३९ गावे वगळता संपूर्ण जिल्ह्यात वीज पोहोचली आहे. शहरामध्ये अनेक छोटी-छोटी गावे समाविष्ट आहेत. मात्र, येथील ग्राहकांना शहरातील ग्राहक म्हणून वीजपुरवठा दिला जातो. याशिवाय नांदगाव खंडेश्वर गावात ५ गावे आहेत. मात्र, आमच्या रेकॉर्डमध्ये नांदगाव खंडेश्वर या एकाच गावाची नोंद आहे. त्यामुळे हा आकडा फुगला आहे. - दिलीप मोहोड,कार्यकारी अभियंता, महावितरण.