शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या ३४५० जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:54 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश क्षमतेनुसार ३४५० जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: अभियांत्रिकीच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देप्रवेशास विद्यार्थी मिळेना : माहिती व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश क्षमतेनुसार ३४५० जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: अभियांत्रिकीच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे वास्तव आहे.अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यात विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त २९ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. मात्र, गत तीन ते चार वर्षांपासून अभियांत्रिकी प्रवेशाचा फ्लो कमी झाला आहे. तर दुसरीकडे शैक्षणिक संस्था चालकांनी इमारती बांधून अभियांत्रिकी महाविद्यालये उभारली. आता या अभियांत्रिकी महाविद्यालयात काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशास विद्यार्थी मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. विभागासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता ८०३० आहे. त्यापैकी ४५८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ३४५० जागा अजुनही रिक्त आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक सत्र-२०१८ चा अहवाल जाहीर केला आहे. दोन, चार वर्षांपूर्वी आयटी, कम्पुटर क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या आशेने बहुतांश अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी माहिती व तंत्रज्ञान, कम्पुटर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. मात्र, या क्षेत्रात रोजगाराच्या संधी नसल्याचे बघून या अभ्यासक्रमांत अलिकडे विद्यार्थी प्रवेश घेत नाही, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मागणीपेक्षा अधिक महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे ही परिस्थिती अभियांत्रिकी महाविद्यालयांवर ओढवल्याचे तज्ञ्जांचे मत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता आणि मागणी यात बरीच तफावत असताना विद्यापीठाकडून बृहत आराखडा तयार करताना ही बाब का नमूद केली जात नाही, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशाची हीच स्थिती आहे. काही कालावधीनंतर एखाद्या विषयात बदल होतो. हीच अवस्था आता अभियांत्रिकी प्रवेशाची आहे. मात्र, रोजगारभिमुख आणि कौशल्य विकासावर आधारीत अभ्यासक्रमांचा अंतर्भाव केला जाईल, त्यानंतर या अभ्यासक्रमांकडे पुन्हा विद्यार्थी वळणार, हे मात्र निश्चित.- मुरलीधर चांदेकरकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.