शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या ३४५० जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:54 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश क्षमतेनुसार ३४५० जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: अभियांत्रिकीच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देप्रवेशास विद्यार्थी मिळेना : माहिती व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश क्षमतेनुसार ३४५० जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: अभियांत्रिकीच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे वास्तव आहे.अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यात विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त २९ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. मात्र, गत तीन ते चार वर्षांपासून अभियांत्रिकी प्रवेशाचा फ्लो कमी झाला आहे. तर दुसरीकडे शैक्षणिक संस्था चालकांनी इमारती बांधून अभियांत्रिकी महाविद्यालये उभारली. आता या अभियांत्रिकी महाविद्यालयात काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशास विद्यार्थी मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. विभागासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता ८०३० आहे. त्यापैकी ४५८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ३४५० जागा अजुनही रिक्त आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक सत्र-२०१८ चा अहवाल जाहीर केला आहे. दोन, चार वर्षांपूर्वी आयटी, कम्पुटर क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या आशेने बहुतांश अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी माहिती व तंत्रज्ञान, कम्पुटर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. मात्र, या क्षेत्रात रोजगाराच्या संधी नसल्याचे बघून या अभ्यासक्रमांत अलिकडे विद्यार्थी प्रवेश घेत नाही, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मागणीपेक्षा अधिक महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे ही परिस्थिती अभियांत्रिकी महाविद्यालयांवर ओढवल्याचे तज्ञ्जांचे मत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता आणि मागणी यात बरीच तफावत असताना विद्यापीठाकडून बृहत आराखडा तयार करताना ही बाब का नमूद केली जात नाही, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशाची हीच स्थिती आहे. काही कालावधीनंतर एखाद्या विषयात बदल होतो. हीच अवस्था आता अभियांत्रिकी प्रवेशाची आहे. मात्र, रोजगारभिमुख आणि कौशल्य विकासावर आधारीत अभ्यासक्रमांचा अंतर्भाव केला जाईल, त्यानंतर या अभ्यासक्रमांकडे पुन्हा विद्यार्थी वळणार, हे मात्र निश्चित.- मुरलीधर चांदेकरकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.