शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
4
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
5
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
6
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
7
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
8
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
9
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
10
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
11
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
12
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
13
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
14
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
15
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
16
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
18
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
19
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
20
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

अभियांत्रिकीच्या ३४५० जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:54 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश क्षमतेनुसार ३४५० जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: अभियांत्रिकीच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देप्रवेशास विद्यार्थी मिळेना : माहिती व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश क्षमतेनुसार ३४५० जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: अभियांत्रिकीच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे वास्तव आहे.अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाचही जिल्ह्यात विद्यापीठाकडून मान्यता प्राप्त २९ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. मात्र, गत तीन ते चार वर्षांपासून अभियांत्रिकी प्रवेशाचा फ्लो कमी झाला आहे. तर दुसरीकडे शैक्षणिक संस्था चालकांनी इमारती बांधून अभियांत्रिकी महाविद्यालये उभारली. आता या अभियांत्रिकी महाविद्यालयात काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशास विद्यार्थी मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. विभागासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता ८०३० आहे. त्यापैकी ४५८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ३४५० जागा अजुनही रिक्त आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने शैक्षणिक सत्र-२०१८ चा अहवाल जाहीर केला आहे. दोन, चार वर्षांपूर्वी आयटी, कम्पुटर क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या आशेने बहुतांश अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी माहिती व तंत्रज्ञान, कम्पुटर टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. मात्र, या क्षेत्रात रोजगाराच्या संधी नसल्याचे बघून या अभ्यासक्रमांत अलिकडे विद्यार्थी प्रवेश घेत नाही, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मागणीपेक्षा अधिक महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे ही परिस्थिती अभियांत्रिकी महाविद्यालयांवर ओढवल्याचे तज्ञ्जांचे मत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता आणि मागणी यात बरीच तफावत असताना विद्यापीठाकडून बृहत आराखडा तयार करताना ही बाब का नमूद केली जात नाही, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी प्रवेशाची हीच स्थिती आहे. काही कालावधीनंतर एखाद्या विषयात बदल होतो. हीच अवस्था आता अभियांत्रिकी प्रवेशाची आहे. मात्र, रोजगारभिमुख आणि कौशल्य विकासावर आधारीत अभ्यासक्रमांचा अंतर्भाव केला जाईल, त्यानंतर या अभ्यासक्रमांकडे पुन्हा विद्यार्थी वळणार, हे मात्र निश्चित.- मुरलीधर चांदेकरकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.