शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

जिल्ह्यात ३४ हजार ८५१ अंगठेबहाद्दर

By जितेंद्र दखने | Updated: March 14, 2024 00:19 IST

जिल्हाभरात सर्वेक्षण : २०२७ सालापर्यंत  करणार साक्षर

अमरावती : पश्चिम विदर्भातील एज्युकेशन हब असलेल्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात ३४ हजार ८५१ जण निरक्षर असल्याचे समोर आले आहे. २०२७ सालापर्यंत टप्प्याटप्याने या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शिक्षण विभाग विविध उपक्रम राबविणार आहे.

सर्वांना साक्षर करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून नवभारत साक्षरता उपक्रम हाती घेण्यात आला आहे. निरक्षरांचे सर्वेक्षण, स्वयंसेवक आणि निरक्षरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षकांकडून उल्हास पोर्टलवर निरक्षरांची संख्या नोंदवण्यात आली. प्रत्येक १० व्यक्तींसाठी एक असे दोन हजार स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. अंगणवाडी सेविकांपासून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुण स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. पहिल्यांदा १५ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांना शिकवले जाईल. महिला, मुली, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधकाम कामगार, मजुरांना प्राधान्याने साक्षर केले जाणार आहे. शाळा भरण्यापूर्वी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास त्या निरक्षरांना जिल्हा परिषदांच्या शाळेतदेखील स्वयंसेवक शिक्षणाचे धडे देत आहेत. आपले सरकार सेवा केंद्रावरही त्यांना मोफत अध्यापन केले जाईल. मोबाइलवरही शिक्षणनिरक्षरांमधील अनेकांना अक्षरओळख नाही, पण अँड्रॉइड मोबाइल चांगल्या पद्धतीने हाताळता येतो. त्यामुळे त्यांना मोबाइलवर ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. तालुकानिहाय निरक्षरजिल्ह्यात अचलपूर २३५१, अंजनगाव सुर्जी २७७२, तिवसा २२४१, मोर्शी २३५०, वरूड ३१५०, अमरावती ग्रामीण २२४८, नांदगाव खंडेश्वर १५४९, चांदूर बाजार २६२२, धामणगाव रेल्वे ३३९३, दर्यापूर २२७९, धारणी ३९६३, भातकुली ६७४, चिखलदरा १८०४, महापालिका क्षेत्र १००४, चांदूर रेल्वे २४५१ याप्रमाणे सर्वेक्षणात निरक्षर आढळले आहेत. शिक्षणाधिकारी योजना कार्यालयामार्फत या निरक्षरांची नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पहिली परीक्षा लवकरच त्या-त्या तालुक्यातील महसुली गावातील शाळेत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे.- प्रीतम गणगणे, सहायक योजना अधिकारी निरक्षरतेची कारणे...कुटुंबातील गरिबी, रोजगारासाठी स्थलांतर, पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष, शैक्षणिक वातावरणाचा अभाव, शाळा जवळ नसणे आदी.

टॅग्स :Amravatiअमरावती