शहरं
Join us  
Trending Stories
1
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
2
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
3
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
4
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
5
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
6
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
7
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
8
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
9
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
10
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
11
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
12
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
13
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
14
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
15
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
16
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
17
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
18
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
19
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
20
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?

जिल्ह्यात ३४ हजार ८५१ अंगठेबहाद्दर

By जितेंद्र दखने | Updated: March 14, 2024 00:19 IST

जिल्हाभरात सर्वेक्षण : २०२७ सालापर्यंत  करणार साक्षर

अमरावती : पश्चिम विदर्भातील एज्युकेशन हब असलेल्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात ३४ हजार ८५१ जण निरक्षर असल्याचे समोर आले आहे. २०२७ सालापर्यंत टप्प्याटप्याने या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शिक्षण विभाग विविध उपक्रम राबविणार आहे.

सर्वांना साक्षर करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून नवभारत साक्षरता उपक्रम हाती घेण्यात आला आहे. निरक्षरांचे सर्वेक्षण, स्वयंसेवक आणि निरक्षरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षकांकडून उल्हास पोर्टलवर निरक्षरांची संख्या नोंदवण्यात आली. प्रत्येक १० व्यक्तींसाठी एक असे दोन हजार स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. अंगणवाडी सेविकांपासून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुण स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. पहिल्यांदा १५ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांना शिकवले जाईल. महिला, मुली, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधकाम कामगार, मजुरांना प्राधान्याने साक्षर केले जाणार आहे. शाळा भरण्यापूर्वी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास त्या निरक्षरांना जिल्हा परिषदांच्या शाळेतदेखील स्वयंसेवक शिक्षणाचे धडे देत आहेत. आपले सरकार सेवा केंद्रावरही त्यांना मोफत अध्यापन केले जाईल. मोबाइलवरही शिक्षणनिरक्षरांमधील अनेकांना अक्षरओळख नाही, पण अँड्रॉइड मोबाइल चांगल्या पद्धतीने हाताळता येतो. त्यामुळे त्यांना मोबाइलवर ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. तालुकानिहाय निरक्षरजिल्ह्यात अचलपूर २३५१, अंजनगाव सुर्जी २७७२, तिवसा २२४१, मोर्शी २३५०, वरूड ३१५०, अमरावती ग्रामीण २२४८, नांदगाव खंडेश्वर १५४९, चांदूर बाजार २६२२, धामणगाव रेल्वे ३३९३, दर्यापूर २२७९, धारणी ३९६३, भातकुली ६७४, चिखलदरा १८०४, महापालिका क्षेत्र १००४, चांदूर रेल्वे २४५१ याप्रमाणे सर्वेक्षणात निरक्षर आढळले आहेत. शिक्षणाधिकारी योजना कार्यालयामार्फत या निरक्षरांची नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पहिली परीक्षा लवकरच त्या-त्या तालुक्यातील महसुली गावातील शाळेत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे.- प्रीतम गणगणे, सहायक योजना अधिकारी निरक्षरतेची कारणे...कुटुंबातील गरिबी, रोजगारासाठी स्थलांतर, पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष, शैक्षणिक वातावरणाचा अभाव, शाळा जवळ नसणे आदी.

टॅग्स :Amravatiअमरावती