शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील ३४ सहकारी संस्था अवसायनात

By admin | Updated: November 25, 2015 00:46 IST

तालुक्यात एकूण १५९ संस्था अस्तित्वात होत्या. त्यापैकी ३४ अवसायनात काढण्यात आल्या आहेत.

आदेशानुसार झाले सर्वेक्षण : एकाही संस्थेने मांडले नाही मत, शेकडो ग्राहकांवर कुऱ्हाडअंजनगाव सुर्जी : तालुक्यात एकूण १५९ संस्था अस्तित्वात होत्या. त्यापैकी ३४ अवसायनात काढण्यात आल्या आहेत. या संस्था अवसायनात काढल्याचा १ आॅक्टोबर २०१५ चा आदेश अंतरिम होता. सर्व संस्थांना कायदेशीररीत्या नोटीस पाठवून कळविण्यात आले व त्यांचे काही म्हणणे आहे काय, याबाबत विचारणा करण्यात आली. पण एकाही संस्थेने या हाकेला ओ दिला नाही. म्हणून हा आदेश आता मुदत गेल्यानंतर अंतिम समजला जाईल, असे सहायक निबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्या संस्था कागदोपत्री सुरू होत्या, मात्र प्रत्यक्षात बंदावस्थेत होत्या, तर काही संस्थांना ठावठिकाणा नव्हता. सर्वेक्षणात संस्थेच्या उपविधीच्या संस्थेच्या मूळ पत्त्यावर संस्था आढळून आल्या नाहीत. बंद करण्यात आलेल्या संस्थांमध्ये बेरोजगार संस्था, गृहनिर्माण संस्था, पाणीवापर संस्था, ग्राहक सहकारी संस्था आदींचा समावेश आहे. संस्थेच्या नियमावलीनुसार, मासिक सभा न घेणे, खात रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, सभेला उपस्थित न राहणे, वरिष्ठ कार्यालयाला अहवाल न पाठविणे अशा विविध गंभीर त्रुट्या सर्वेक्षणादरम्यान आढळून आल्यात. सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने सर्वेक्षणाचा परिपूर्ण अहवाल जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अमरावती यांना पाठविला. जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी सदर अहवाल आयुक्त पुणे यांना पाठविला. यामध्ये स्वीपर्स हाऊसिंग सोसायटी, अंबा गृहनिर्माण संस्था, तांत्रिक बहुउद्देशीय नागरी सेवा संस्था, सम्यक मागासवर्गीय नागरी सेवा संस्था, बेरोजगार मातृछाया नागरी सेवा संस्था, इंदिरा महिला औद्योगिक संस्था, नागवेली बेरोजगार सेवा संस्था, ताज्जोद्दीन बाबा कामगार संस्था, मॉ जिजाऊ गृहनिर्माण संस्था, घरकूल प्राथमिक ग्राहक भांडार, कच्चे चामडे व हड्डी औद्योगिक संस्था या सर्व अंजनगाव सुर्जी येथील सहकारी संस्था आता कायम अवसायनात निघाल्या आहेत. ग्रामीण भागातील अभिजित नागरी सेवा संस्था व शिवकृपा महिला औद्योगिक संस्था कसबेगव्हाण, आत्माराम पाटील विद्यालय ग्राहक भांडार व चिंतामणी महिला नागरी सेवा संस्था, गावंडगाव, पांढरी सहकारी पाणीवापर संस्था, सीतामाता सहकारी पाणीवापर संस्था, तुरखेड, बोराळा पाणीवापर सहकारी संस्था, अन्नाभाऊ साठे बुरड कामगार संस्था व वसंतराव नाईक मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था, मुऱ्हा, दादासाहेब रुपवते मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था, विहीगाव, राहुल मागासवर्गी गृहनिर्माण संस्था व मिलिंद मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था, वनोजा, संतकृपा गृहनिर्माण सहकारी संस्था, सातेगाव, संघप्रिय महिला औद्योगिक संस्था, पांढरी, धाडेश्वर पाणीवापर संस्था, धाडी, ग्रामसेवता पाणी वापर संस्था, देवगाव, अशोकनगर गृहनिर्माण संस्था, सातेगाव, प्रज्ञा मागासवर्गीय संस्था व जयपुरीबाबा पीक संरक्षक संस्था निमखेड बाजार, देवेश्वरी पाणी वापर संस्था तुरखेड, महात्मा ज्योतिबा फुले पाणीवापर संस्था, देवगाव इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. अन् अध्यक्षांनी केले पलायनअवसायनात निघालेल्या काही संस्थांचे चालक सहजासहजी निबंधक कार्यालयाची नोटीस घेत नव्हते म्हणून त्यांना, तुमच्या संस्थेला घरकूल मंजूर झाल्याचे तोंडी सांगण्यात आले. त्यावेळी मात्र एका संस्थेचे तीन-तीन अध्यक्ष तयार झाले. मीच अध्यक्ष आहे हा दावा करण्यात आला. पण ही नोटीस आपली संस्था खारीज करण्याची आहे, ही वस्तुस्थिती समजल्यावर सर्वांनी पलायन केले. भागधारकांचे पैसे कुठे गेले?३४ संस्था कायम अवसायनात निघाल्या. ही वस्तुस्थिती असली तरी या सर्व संस्था चालकांनी शेअर्सच्या माध्यमातून भागधारकांकडून किती पैसे गोळा केले व या निधीचे पुढे काय केले? हे पैसे बँकेत ठेवले की स्वत: वापरले? याची कोणतीही माहिती नाही. याचा उलगडा हे वृत्त सार्वजनिक झाल्यावरच होईल. भागधारकांना या संस्था अवसायनात कायम गेल्याची अजूनही माहिती नाही, हे विशेष!एकाच उपनिबंधकाची मान्यताअवसायनात निघालेल्या बहुतांश संस्था एका विशिष्ट उद्देशाने स्थापन झाल्या असून गेल्या काही वर्षांपूर्वी येथे आलेल्या एकाच उपनिबंधकाच्या मान्यतेने स्थापन झाल्या आहेत. ज्या उपनिबंधकाने या अवसायनात गेलेल्या संस्थांना मान्यता दिली. त्या उपनिबंधकाच्या हेतूचीदेखील चौकशी होणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात असे प्रकार रोखले जातील व बोगस संस्थांना पायबंद बसेल. संस्थांवर नेमला जाईल अवसायकसंस्था अंतिमरीत्या अवसायनात गेल्या तरी नैसर्गिक नियमानुसार या सर्वांना जॉर्इंट रजिस्ट्रार अमरावती येथे या आदेशाविरोधात दाद मागता येईल. मात्र अंतिम आदेशानंतर लगेच शासनातर्फे सर्व संस्थांवर अवसायक नेमला जाईल. ज्या संस्थांनी शेअर्स गोळा केले असतील, ज्यांच्याबद्दल तक्रारी असतील, अशा संबंधित संस्थांचे काही देणे-घेणे नसेल ते सर्व व्यवहार उचितरीत्या तपासून त्यानुसार अवसायक कार्यवाही करेल आणि देणे-घेणे नियमित करण्यात येईल, असे अंजनगाव तालुका प्रभारी उपनिबंधक किशोर बलिंगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.