शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

३३४ कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांत बदल्या

By admin | Updated: May 16, 2017 00:11 IST

जिल्हा परिषदेत मागील काही दिवसांपासून वर्ग तीन आणि चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे.

झेडपीत हंगामा : कर्मचाऱ्यांमध्ये कही खुशी कही गमलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत मागील काही दिवसांपासून वर्ग तीन आणि चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मागील तीन दिवसात विविध विभागातील ३३४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाने केल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. आतापर्यंत बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी १, पशुधन पर्यवेक्षक १४ अशा एकूण १५, कृषी विभागामधील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी अशा प्रत्येकी १ याप्रमाणे २ बदल्या करण्यात आल्या आहेत.वित्त विभागात सहायक लेखाअधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक लेखाधिकारी अशा १० बदल्या करण्यात आल्या आहेत. सिंचन मधील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियंता प्रत्येकी २ अशा चार, बांधकाममधील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियंत्यांच्या १३, महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका १५,पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता १, पंचायत मधील विस्तार अधिकारी पंचायत७, ग्रामविकास अधिकारी ७ व ग्रामसेवक ४१ अशा ५५ बदल्या केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी ३, विस्तार अधिकारी सांख्यिकी ३, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ६, कनिष्ठ सहायक १२, परिचर २९ अशा १०५, आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक ६, औषध निर्माण अधिकारी ११, आरोग्य सहायक महिला ९, आरोग्य सेवक महिला ४९, आरोग्यसेवक पुरूष २८ अशा ११४ बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी श्रेणी दोन व तीनमधील प्रत्येकी एक अशा दोन बदल्या करण्यात आल्या आहेत. यासर्व बदल्यांमध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने तीन दिवसात एकूण ३३४ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांन मध्ये कही खुशी कही गमचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले आहेत.मेळघाटात सेवा दिल्यासच आपसी बदली ?सध्या बदली प्रक्रिया सुरू आहे. मात्र आपसी बदली मागणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक व अन्य संवर्गातील काही कर्मचाऱ्यांनी आपसी बदल्यासाठी प्रशासनाकडे रीतसर अर्ज केलेत. त्यानुसार सोमवारी आपसी बदली प्रक्रिये दरम्यान आपसी बदली मागणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी मेळघाटात सेवा दिली असेल तरच बदलीचा नवा फंडा प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे आपसी बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी सीईओकडे धाव घेऊन न्याय मागितला. परंतु प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. असा कुठलाही शासन नियम नसल्याचा दावा आपसी बदल्या मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.