शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

३३४ कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांत बदल्या

By admin | Updated: May 16, 2017 00:11 IST

जिल्हा परिषदेत मागील काही दिवसांपासून वर्ग तीन आणि चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे.

झेडपीत हंगामा : कर्मचाऱ्यांमध्ये कही खुशी कही गमलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत मागील काही दिवसांपासून वर्ग तीन आणि चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मागील तीन दिवसात विविध विभागातील ३३४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाने केल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. आतापर्यंत बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी १, पशुधन पर्यवेक्षक १४ अशा एकूण १५, कृषी विभागामधील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी अशा प्रत्येकी १ याप्रमाणे २ बदल्या करण्यात आल्या आहेत.वित्त विभागात सहायक लेखाअधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक लेखाधिकारी अशा १० बदल्या करण्यात आल्या आहेत. सिंचन मधील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियंता प्रत्येकी २ अशा चार, बांधकाममधील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियंत्यांच्या १३, महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका १५,पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता १, पंचायत मधील विस्तार अधिकारी पंचायत७, ग्रामविकास अधिकारी ७ व ग्रामसेवक ४१ अशा ५५ बदल्या केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी ३, विस्तार अधिकारी सांख्यिकी ३, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ६, कनिष्ठ सहायक १२, परिचर २९ अशा १०५, आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक ६, औषध निर्माण अधिकारी ११, आरोग्य सहायक महिला ९, आरोग्य सेवक महिला ४९, आरोग्यसेवक पुरूष २८ अशा ११४ बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी श्रेणी दोन व तीनमधील प्रत्येकी एक अशा दोन बदल्या करण्यात आल्या आहेत. यासर्व बदल्यांमध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने तीन दिवसात एकूण ३३४ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांन मध्ये कही खुशी कही गमचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले आहेत.मेळघाटात सेवा दिल्यासच आपसी बदली ?सध्या बदली प्रक्रिया सुरू आहे. मात्र आपसी बदली मागणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक व अन्य संवर्गातील काही कर्मचाऱ्यांनी आपसी बदल्यासाठी प्रशासनाकडे रीतसर अर्ज केलेत. त्यानुसार सोमवारी आपसी बदली प्रक्रिये दरम्यान आपसी बदली मागणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी मेळघाटात सेवा दिली असेल तरच बदलीचा नवा फंडा प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे आपसी बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी सीईओकडे धाव घेऊन न्याय मागितला. परंतु प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. असा कुठलाही शासन नियम नसल्याचा दावा आपसी बदल्या मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.