शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

३३४ कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांत बदल्या

By admin | Updated: May 16, 2017 00:11 IST

जिल्हा परिषदेत मागील काही दिवसांपासून वर्ग तीन आणि चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे.

झेडपीत हंगामा : कर्मचाऱ्यांमध्ये कही खुशी कही गमलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत मागील काही दिवसांपासून वर्ग तीन आणि चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मागील तीन दिवसात विविध विभागातील ३३४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाने केल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. आतापर्यंत बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी १, पशुधन पर्यवेक्षक १४ अशा एकूण १५, कृषी विभागामधील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी अशा प्रत्येकी १ याप्रमाणे २ बदल्या करण्यात आल्या आहेत.वित्त विभागात सहायक लेखाअधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक लेखाधिकारी अशा १० बदल्या करण्यात आल्या आहेत. सिंचन मधील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियंता प्रत्येकी २ अशा चार, बांधकाममधील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियंत्यांच्या १३, महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका १५,पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता १, पंचायत मधील विस्तार अधिकारी पंचायत७, ग्रामविकास अधिकारी ७ व ग्रामसेवक ४१ अशा ५५ बदल्या केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी ३, विस्तार अधिकारी सांख्यिकी ३, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ६, कनिष्ठ सहायक १२, परिचर २९ अशा १०५, आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक ६, औषध निर्माण अधिकारी ११, आरोग्य सहायक महिला ९, आरोग्य सेवक महिला ४९, आरोग्यसेवक पुरूष २८ अशा ११४ बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी श्रेणी दोन व तीनमधील प्रत्येकी एक अशा दोन बदल्या करण्यात आल्या आहेत. यासर्व बदल्यांमध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने तीन दिवसात एकूण ३३४ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांन मध्ये कही खुशी कही गमचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले आहेत.मेळघाटात सेवा दिल्यासच आपसी बदली ?सध्या बदली प्रक्रिया सुरू आहे. मात्र आपसी बदली मागणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक व अन्य संवर्गातील काही कर्मचाऱ्यांनी आपसी बदल्यासाठी प्रशासनाकडे रीतसर अर्ज केलेत. त्यानुसार सोमवारी आपसी बदली प्रक्रिये दरम्यान आपसी बदली मागणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी मेळघाटात सेवा दिली असेल तरच बदलीचा नवा फंडा प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे आपसी बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी सीईओकडे धाव घेऊन न्याय मागितला. परंतु प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. असा कुठलाही शासन नियम नसल्याचा दावा आपसी बदल्या मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.