शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

३३ लाख हेक्टर पेरणीक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 00:13 IST

यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३२ लाख ७६ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट आहे.

खरीप हंगाम : गतवर्षीच्या तुलनेत ८२ हजार हेक्टर क्षेत्रवाढलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३२ लाख ७६ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ८२ हजार हेक्टर पेरणी क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे. यामध्ये कपाशीची क्षेत्रवाढ होणार आहे. तूर व सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात घट होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकासाठी चार लाख पाच हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्राकडून दोन लाख ६१ हजार क्विंटल व खासगी कंपनीकडून एक लाख ४४ हजार क्विंटल अशी मागणी कृषी विभागाद्वारा नोंदविण्यात आली आहे. यामध्ये महाबीज मार्फत दोन लाख ३२ हजार क्विंटल खासगी कंपनीकडून २९ हजार क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.नऊ लाख चार हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीसाठी नियोजित आहे. गतवर्षी आठ लक्ष ६१ हजार २४० हेक्टर पेरणी क्षेत्र होते. त्यातुलनेत ४२ हजार ७६५ हेक्टरने वाढ होणार आहे. यासाठी ४६ लाख ४५ हजार बियाण्यांची पाकिटे लागणार आहेत. ही मागणी नोंदविण्यात आली आहे. प्रथम टप्प्यात ३० लाख, दुसऱ्या टप्प्यात १६ लाख ४५ हजार, याप्रमाणे उपलब्ध होणार आहे. खरीप ज्वार, मका, तूर, मूग व उडीद या पिकासाठी एक लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. मागणीनुसार ९ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धता होणार आहे.यंदाच्या हंगामासाठी सहा लाख ६९ हजार मे. टन रासायनिक खतांची उपलब्धता आहे. यापैकी पाच लाख ७९ हजार मे. टन रासायनिक खतांचे आवंटन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडे मार्च २०१७ अखेर एक लाख ११ हजार मे.टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक आहे. मागील तीन वर्षांत चार लाख ८३ हजार मेट्रिक टन खतांचा वापर झाला होता. मागील वर्षी चार लाख ५२ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय. २५ मे ते ८ जूनदरम्यान उन्नत शेती पंधरवडाशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘उन्नत शेती-समृद्ध शेती’ पंधरवडा २५ ते ८ जूनदरम्यान कृषी विभागाद्वारा साजरा करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचे संरक्षण करणे, पिकांचे उत्पादन खर्च कमी करणे, शेतमाल विक्रीचे तंत्र, शेतीपूरक व्यवसायांना चालना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयी शेतकऱ्यांना अवगत केले जाणार आहे.