शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

३३ लाख हेक्टर पेरणीक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 00:13 IST

यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३२ लाख ७६ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट आहे.

खरीप हंगाम : गतवर्षीच्या तुलनेत ८२ हजार हेक्टर क्षेत्रवाढलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३२ लाख ७६ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ८२ हजार हेक्टर पेरणी क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे. यामध्ये कपाशीची क्षेत्रवाढ होणार आहे. तूर व सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात घट होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकासाठी चार लाख पाच हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्राकडून दोन लाख ६१ हजार क्विंटल व खासगी कंपनीकडून एक लाख ४४ हजार क्विंटल अशी मागणी कृषी विभागाद्वारा नोंदविण्यात आली आहे. यामध्ये महाबीज मार्फत दोन लाख ३२ हजार क्विंटल खासगी कंपनीकडून २९ हजार क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.नऊ लाख चार हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीसाठी नियोजित आहे. गतवर्षी आठ लक्ष ६१ हजार २४० हेक्टर पेरणी क्षेत्र होते. त्यातुलनेत ४२ हजार ७६५ हेक्टरने वाढ होणार आहे. यासाठी ४६ लाख ४५ हजार बियाण्यांची पाकिटे लागणार आहेत. ही मागणी नोंदविण्यात आली आहे. प्रथम टप्प्यात ३० लाख, दुसऱ्या टप्प्यात १६ लाख ४५ हजार, याप्रमाणे उपलब्ध होणार आहे. खरीप ज्वार, मका, तूर, मूग व उडीद या पिकासाठी एक लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. मागणीनुसार ९ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धता होणार आहे.यंदाच्या हंगामासाठी सहा लाख ६९ हजार मे. टन रासायनिक खतांची उपलब्धता आहे. यापैकी पाच लाख ७९ हजार मे. टन रासायनिक खतांचे आवंटन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडे मार्च २०१७ अखेर एक लाख ११ हजार मे.टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक आहे. मागील तीन वर्षांत चार लाख ८३ हजार मेट्रिक टन खतांचा वापर झाला होता. मागील वर्षी चार लाख ५२ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय. २५ मे ते ८ जूनदरम्यान उन्नत शेती पंधरवडाशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘उन्नत शेती-समृद्ध शेती’ पंधरवडा २५ ते ८ जूनदरम्यान कृषी विभागाद्वारा साजरा करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचे संरक्षण करणे, पिकांचे उत्पादन खर्च कमी करणे, शेतमाल विक्रीचे तंत्र, शेतीपूरक व्यवसायांना चालना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयी शेतकऱ्यांना अवगत केले जाणार आहे.