शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांत ३१.४० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST

दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत ...

दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ६ मे पर्यंत जलंसपदा विभागाच्या आकडेवारीनुसार पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ५११ प्रकल्पांत सरासरी फक्त ३१.४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे चिंता वाढली आहे. तशी सद्यस्थितीत टंचाई नसली तरीही एक महिना पाणी जपून वापरा, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ३६.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला होता. म्हणून, आतापर्यंत कुठेही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ३५.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर ४७७ लघू प्रकल्पांत २२.८ टक्के पाणीसाठा आहे.

५११ प्रकल्पांचा उपयुक्तसाठा हा ३२८२.६० दलघमी एवढा आहे. त्यापैकी आजचा उपयुक्तसाठा हा १०३१.०५ टक्के आहे. त्याची सरासरी ३१.४० टक्के एवढी आहे.

बॉक्स:

नऊ मोठ्या प्रकल्पाची स्थिती

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सर्वाधिक ४७.७५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात २६.५७ टक्के, अरुणावती २६.२३ टक्के, बेंबळा ४२ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ३३.५४ टक्के, वाण ३८. ३० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ३२.०३ टक्के, पेनटाकळी २२.९९ टक्के, खडकपूर्णा सर्वात कमी ४.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाचीही अशीच स्थिती आहे.