शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांत ३१.४० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST

दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत ...

दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ६ मे पर्यंत जलंसपदा विभागाच्या आकडेवारीनुसार पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ५११ प्रकल्पांत सरासरी फक्त ३१.४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे चिंता वाढली आहे. तशी सद्यस्थितीत टंचाई नसली तरीही एक महिना पाणी जपून वापरा, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ३६.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला होता. म्हणून, आतापर्यंत कुठेही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ३५.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर ४७७ लघू प्रकल्पांत २२.८ टक्के पाणीसाठा आहे.

५११ प्रकल्पांचा उपयुक्तसाठा हा ३२८२.६० दलघमी एवढा आहे. त्यापैकी आजचा उपयुक्तसाठा हा १०३१.०५ टक्के आहे. त्याची सरासरी ३१.४० टक्के एवढी आहे.

बॉक्स:

नऊ मोठ्या प्रकल्पाची स्थिती

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सर्वाधिक ४७.७५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात २६.५७ टक्के, अरुणावती २६.२३ टक्के, बेंबळा ४२ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ३३.५४ टक्के, वाण ३८. ३० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ३२.०३ टक्के, पेनटाकळी २२.९९ टक्के, खडकपूर्णा सर्वात कमी ४.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाचीही अशीच स्थिती आहे.