शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांत ३१.४० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST

दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत ...

दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ६ मे पर्यंत जलंसपदा विभागाच्या आकडेवारीनुसार पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ५११ प्रकल्पांत सरासरी फक्त ३१.४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे चिंता वाढली आहे. तशी सद्यस्थितीत टंचाई नसली तरीही एक महिना पाणी जपून वापरा, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ३६.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला होता. म्हणून, आतापर्यंत कुठेही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ३५.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर ४७७ लघू प्रकल्पांत २२.८ टक्के पाणीसाठा आहे.

५११ प्रकल्पांचा उपयुक्तसाठा हा ३२८२.६० दलघमी एवढा आहे. त्यापैकी आजचा उपयुक्तसाठा हा १०३१.०५ टक्के आहे. त्याची सरासरी ३१.४० टक्के एवढी आहे.

बॉक्स:

नऊ मोठ्या प्रकल्पाची स्थिती

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सर्वाधिक ४७.७५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात २६.५७ टक्के, अरुणावती २६.२३ टक्के, बेंबळा ४२ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ३३.५४ टक्के, वाण ३८. ३० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ३२.०३ टक्के, पेनटाकळी २२.९९ टक्के, खडकपूर्णा सर्वात कमी ४.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाचीही अशीच स्थिती आहे.