शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांत ३१.४० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST

दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत ...

दिवसेंदिवस पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थिती बिकट होत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ६ मे पर्यंत जलंसपदा विभागाच्या आकडेवारीनुसार पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ५११ प्रकल्पांत सरासरी फक्त ३१.४० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे चिंता वाढली आहे. तशी सद्यस्थितीत टंचाई नसली तरीही एक महिना पाणी जपून वापरा, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ३६.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प शंभर टक्के भरला होता. म्हणून, आतापर्यंत कुठेही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. २५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ३५.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर ४७७ लघू प्रकल्पांत २२.८ टक्के पाणीसाठा आहे.

५११ प्रकल्पांचा उपयुक्तसाठा हा ३२८२.६० दलघमी एवढा आहे. त्यापैकी आजचा उपयुक्तसाठा हा १०३१.०५ टक्के आहे. त्याची सरासरी ३१.४० टक्के एवढी आहे.

बॉक्स:

नऊ मोठ्या प्रकल्पाची स्थिती

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात सर्वाधिक ४७.७५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात २६.५७ टक्के, अरुणावती २६.२३ टक्के, बेंबळा ४२ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ३३.५४ टक्के, वाण ३८. ३० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ३२.०३ टक्के, पेनटाकळी २२.९९ टक्के, खडकपूर्णा सर्वात कमी ४.६८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पाचीही अशीच स्थिती आहे.