शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वऱ्हाडात यंदा ३०३ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST

अमरावती : पश्चिम विदर्भात कोरोना संसर्गामुळे यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्यान ३,१५२ संक्रमितांचा मृत्यू झालेला असताना, याच कालावधीत ३०३ शेतकऱ्यांनीही ...

अमरावती : पश्चिम विदर्भात कोरोना संसर्गामुळे यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्यान ३,१५२ संक्रमितांचा मृत्यू झालेला असताना, याच कालावधीत ३०३ शेतकऱ्यांनीही मृत्यूला कवटाळले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून ही स्थिती स्पष्ट झाली आहे.

अमरावती विभागातील शेतकरी आत्महत्याप्रवण पाचही जिल्ह्यासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची नोंद सन २००१ पासून येथील विभागीय आयुक्त कार्तयालयात नियमितपणे घेतली जाते. सन २००१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत या सहा जिल्ह्यांत तब्बल १८,६२५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये ८,४०३ शेतकरी आत्महत्या शासनमदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. याशिवाय ८,४७३ प्रकरणे शासनस्तरावर नामंजूर करण्यात आली आहेत. अद्याप ३०४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

थकीत कर्ज, खासगी सावकारांचा व बँकाचा कर्जासाठी तगादा, नापिकी, आपत्तीमुळे नुकसान, मुला-मुलीचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्याच्या संघर्षावर नैराश्याने मात केल्याचे दिसून येते. जगावे कसे, या विवंचनेत पश्चिम विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शासनाने विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे

बॉक्स

जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्यांची स्थिती

यंदाच्या चार महिन्यात अमरावती जिल्ह्यात ५४, अकोला ३७, यवतमाळ ८३, बुलडाणा ७३, वाशिम १६, तर वर्धा जिल्ह्यात ४० शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी असलेल्या ‘शेतकरी मिशन’चे कामही या दोन वर्षांत थंडबस्त्यात पडले आहे, तर जिल्हास्तरावर प्रकरणे निकाली काढण्यासाठी चार-सहा महिने मीटिंगदेखील होत नसल्याने शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत.