शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
3
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
4
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
5
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
6
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
7
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
8
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
9
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
10
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
11
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
12
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
13
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
14
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
15
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
16
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
17
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
18
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
19
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
20
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."

३०० गावे एसटीविना!

By admin | Updated: January 4, 2015 23:04 IST

महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

ग्रामस्थांच्या नशिबी पायपीटच : विद्यार्थ्यांसह वृध्द प्रवाशांचे प्रचंड हाल अमरावती : महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे. बॉम्बे परिवहन महामंडळाचे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात रूपांतर झाले. तेव्हापासून गाव पातळीपर्यंत एसटी बस पोहोचवण्याचा प्रयत्न महामंडळाने केला. ज्या ठिकाणी रेल्वे सेवा पोहोचू शकत नाही. त्या गावातील नागरिकांना प्रवासासाठी एसटीशिवाय पर्याय नाही. एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या आशेने गाव फाट्यावर एसटीच्या प्रतीक्षेत असतात. ५० वर्षांच्या खडतर प्रवासात गाव तेथे एसटी या ब्रिदवाक्याचे तीनतेरा वाजले. तालुक्यांमध्ये १९८१ गावे आहेत. यातील जवळपास २०० गावे अद्याप सार्वजनिक दळणवळणा पासून दूर आहेत. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची कसरतथेट गावात एसटी पोहोचत नसल्याने आबालवृद्धांना दोन ते तीन किलोमिटरची पायपीट करत फाटा गाठावा लागतो. याचा फटका भावी पिढीला बसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही किमी अंतर पायी जाऊन शाळा गाठावी लागते. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या भागात एसटीची सेवा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली आहेत.जीव धोक्यात घालून प्रवास गावात एसटीची सेवा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा उपयोग करावा लागतो. खासगी प्रवासी वाहतूकदारांमध्ये स्पर्धा होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. परिणामी ग्रामस्थांना धोक्याचा सामना करावा लागतो. बस न पाठविण्याची कारणेजिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत जेथे फाट्यापासून गावाचे अंतर जवळ आहे. नदी किंवा नाले आडवे येतात. तसेच त्या गावांतील रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. काही गावांमधून एसटीला जास्त उत्पन्न मिळत नसल्यामुळे अशा ठिकाणची सेवा बंद करण्यात आलेली आहे.