शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षा परमीटचे ३० पर्यंत नूतनीकरण

By admin | Updated: November 24, 2015 00:30 IST

रिक्षांच्या रद्द झालेल्या परमीटचे नूतनीकरण करण्यास शासनाने मान्यता दिल्याने बहुतांश परवानाधारकांनी या संधीचा लाभ घेतला आहे.

शासनाचे आदेश : मुदतबाह्य आॅटो होणार स्क्रॅप अमरावती : रिक्षांच्या रद्द झालेल्या परमीटचे नूतनीकरण करण्यास शासनाने मान्यता दिल्याने बहुतांश परवानाधारकांनी या संधीचा लाभ घेतला आहे. या संधीपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून नूतनीकरणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाने नव्याने काढलेल्या अध्यादेशानुसार २० नोव्हेंबरपर्यंत रिक्षा परवाना नूतनीकरण करता येणार आहे. परवान्याची मुदत संपूनही ज्यांना नूतनीकरण करता येणार आहे. त्यांच्यावर १६ तारखेपासून कारवाई करण्यास प्रारंभ झाला आहे. कालबाह्य झालेल्या आॅटोवर जेसीबी चालवून समूळ नष्ट करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना नुकतेच दिले आहेत. अशा पद्धतीच्या कारवाईमुळे आमच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड ओढवेल असे आॅटोचालकांचे म्हणणे आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील आॅटो रिक्षाचे परवाने रद्द झालेल्यांना संधी म्हणून १५ हजार रुपयांपर्यंतचे शुल्क भरून परवाना नूतनीकरणास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ३१ आॅक्टोंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतीत बहुतांश परवाना धारक रिक्षाचालक परवान्याचे नूतनीकरण करू शकले नाहीत. दरम्यान ज्यांनी १६ नोव्हेंबरपर्यंत परवान्याचे नूतनीकरण केलेले नाही, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २८ आॅक्टोबर रोजी नूतनीकरण झालेल्या रद्द झालेल्या आॅटोरिक्षा परवाण्याचे नूतनीकरणाबाबत बैठक झाली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. आॅटोरिक्षा नूतनीकरणासाठी मिळालेल्या अत्यल्प प्रतिसाद या बैठकीत समोर दिसून आला. त्यामुळे परिवहन आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यामुळे मोहीम राबवून सध्याच्या आॅटोरिक्षांवरील थकीत कर वसूल करण्यात यावा, असे ठरले. त्यामुळे परवाने रद्द झाले असतील. अशा आॅटोरिक्षा परवानाधारकांनी शासन निर्देशानुसार सर्व प्रकारचे कर भरून ३० नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)