शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

वडाळी-चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात ३० बिबट

By admin | Updated: January 10, 2017 00:07 IST

जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात तब्बल ३० बिबटांचे अस्तित्व असल्याचा दावा जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेने सर्वेक्षणातून केला आहे.

जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेक्षण : अभयारण्याचा प्रस्ताव रखडलावैभव बाबरेकर अमरावतीजैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात तब्बल ३० बिबटांचे अस्तित्व असल्याचा दावा जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेने सर्वेक्षणातून केला आहे. शहरालगतच्या समृद्ध जंगलात वाघासह विविध वन्यप्राण्यांचा अधिवास असतानाही अभयारण्याचा प्रस्ताव शासनाकडे रखडला आहे. शहरालगतचे वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र २१ हजार ४८५ हेक्टरमध्ये पसरले आहे. इतक्या विस्तिर्ण जंगलात वन्यप्राण्यांच्या विविध प्रजाती, पक्षी व वनस्पती आहेत. जैवविविधतेने परिपूर्ण या जंगलात वाघाचे अस्तित्वही सिद्ध झाले आहे. या जंगलाचे संवर्धन व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेच्या उद्देशाने जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्था सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सन २०१५-१६ मध्ये रात्री १० ते पहाटेपर्यंत वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्राचे सर्वेक्षण करून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून वन्यप्राण्यांची मोजणी केली आहे. त्यामध्ये अतिशय धक्कादायक माहिती हाती लागली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोहरा, भानखेडा, मालखेड, रत्नापूर, बोडणा, रजनीशपुरम (इंदला), चिरोडी, पिपंळखुटा, भिवापूर, कारला,वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या घटना नाहीतअमरावती : आमला, उतखेड, जेवड बिट, अंजनगाव बारी, मार्डी, माळेगाव व कुऱ्हा या जंगलात फिरून सर्वेक्षण केले. त्यात ३० बिबट ‘सायटिंग’ झाले. तशी नोंद संस्थेने सर्वेक्षण अहवालात केली असून तो अहवाल वनविभागाला पाठविला आहे. वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी पोषक वातावरण व त्यांना मुबलक खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्यामुळे याजंगलात वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचे संस्था पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ही बाब वन्यप्रेमींसाठी आनंददायी ठरली असून नागरिकांनीही वन्यप्राण्यांची भीती न बाळगता जंगल व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलणे आता गरजेचे झाले आहे. यावन्यप्राण्यांनी गावकऱ्यांची जनावरे फस्त केली आहेत. मात्र, मागील चार ते पाच वर्षांत वन्यप्राणी व मानवी संघर्षाच्या घटना घडल्या नसल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तविले आहे. (प्रतिनिधी)जंगल वाचविण्याचे ध्येयजीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी खासगी कामे करून जंगल वाचविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. संस्थाध्यक्ष सागर मैदानकर, उपाध्यक्ष राम खरबडे, मिलिंद वानखडे, प्राजक्ता बहादेकर, समीर कावरे, योगेश दंडाळे, सागर फुटाणे आदी पदाधिकारी जंगल संर्वधन व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी धडपड करीत आहेत. अभयारण्याचा दर्जा केव्हा ?जिल्ह्यातील मेळघाटचे जंगल हे जैवविविधतेने समृद्ध आहे. अमरावती शहरालगतचे जंगलही आता समृद्ध झाले आहे. त्यामुळे वाघ, बिबटांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. या समृद्ध जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी काही वर्षांपूर्वी वन्यप्रेमींनी शासनदरबारी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अद्याप त्या प्रस्तावावर सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही. तो प्रस्ताव शासनदरबारी रखडला आहे. त्यामुळे या जंगलाला अभयारण्याचा दर्जा केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा वन्यप्रेंमींसह जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनादेखील लागून राहिली आहे. सुरक्षा शक्यजंगलाच्या सुरक्षेसाठी वनविभाग सातत्याने काम करीत आहे. मात्र, यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे, शेतातील रस्ते स्वच्छ ठेवावेत, जेणे करून वन्यप्राणी लवकरच दृष्टीस पडू शकेल, शेतात काम करताना सावध राहावे, घंटा जवळ बाळगून आवाज करावा. उघड्यावर शौचास न बसता शौचालयाचा उपयोग करावा. जंगल मार्गाने दुचाकीने ये-जा प्रवास करण्याचे टाळावे.वनविभागामार्फत झालेल्या सर्वेक्षणात चांदूररेल्वे व वडाळीच्या जंगलात १६ बिबटांची नोंद मे २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात घेण्यात आली. त्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाविषयी मला काही सांगता येणार नाही.- हेमंतकुमार मीना, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग.