शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी-चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात ३० बिबट

By admin | Updated: January 10, 2017 00:07 IST

जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात तब्बल ३० बिबटांचे अस्तित्व असल्याचा दावा जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेने सर्वेक्षणातून केला आहे.

जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेक्षण : अभयारण्याचा प्रस्ताव रखडलावैभव बाबरेकर अमरावतीजैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात तब्बल ३० बिबटांचे अस्तित्व असल्याचा दावा जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेने सर्वेक्षणातून केला आहे. शहरालगतच्या समृद्ध जंगलात वाघासह विविध वन्यप्राण्यांचा अधिवास असतानाही अभयारण्याचा प्रस्ताव शासनाकडे रखडला आहे. शहरालगतचे वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्र २१ हजार ४८५ हेक्टरमध्ये पसरले आहे. इतक्या विस्तिर्ण जंगलात वन्यप्राण्यांच्या विविध प्रजाती, पक्षी व वनस्पती आहेत. जैवविविधतेने परिपूर्ण या जंगलात वाघाचे अस्तित्वही सिद्ध झाले आहे. या जंगलाचे संवर्धन व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेच्या उद्देशाने जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्था सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सन २०१५-१६ मध्ये रात्री १० ते पहाटेपर्यंत वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्राचे सर्वेक्षण करून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून वन्यप्राण्यांची मोजणी केली आहे. त्यामध्ये अतिशय धक्कादायक माहिती हाती लागली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोहरा, भानखेडा, मालखेड, रत्नापूर, बोडणा, रजनीशपुरम (इंदला), चिरोडी, पिपंळखुटा, भिवापूर, कारला,वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या घटना नाहीतअमरावती : आमला, उतखेड, जेवड बिट, अंजनगाव बारी, मार्डी, माळेगाव व कुऱ्हा या जंगलात फिरून सर्वेक्षण केले. त्यात ३० बिबट ‘सायटिंग’ झाले. तशी नोंद संस्थेने सर्वेक्षण अहवालात केली असून तो अहवाल वनविभागाला पाठविला आहे. वडाळी व चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी पोषक वातावरण व त्यांना मुबलक खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्यामुळे याजंगलात वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचे संस्था पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ही बाब वन्यप्रेमींसाठी आनंददायी ठरली असून नागरिकांनीही वन्यप्राण्यांची भीती न बाळगता जंगल व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलणे आता गरजेचे झाले आहे. यावन्यप्राण्यांनी गावकऱ्यांची जनावरे फस्त केली आहेत. मात्र, मागील चार ते पाच वर्षांत वन्यप्राणी व मानवी संघर्षाच्या घटना घडल्या नसल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तविले आहे. (प्रतिनिधी)जंगल वाचविण्याचे ध्येयजीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी खासगी कामे करून जंगल वाचविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. संस्थाध्यक्ष सागर मैदानकर, उपाध्यक्ष राम खरबडे, मिलिंद वानखडे, प्राजक्ता बहादेकर, समीर कावरे, योगेश दंडाळे, सागर फुटाणे आदी पदाधिकारी जंगल संर्वधन व वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी धडपड करीत आहेत. अभयारण्याचा दर्जा केव्हा ?जिल्ह्यातील मेळघाटचे जंगल हे जैवविविधतेने समृद्ध आहे. अमरावती शहरालगतचे जंगलही आता समृद्ध झाले आहे. त्यामुळे वाघ, बिबटांसह अन्य वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. या समृद्ध जंगलाला अभयारण्याचा दर्जा मिळावा, यासाठी काही वर्षांपूर्वी वन्यप्रेमींनी शासनदरबारी प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अद्याप त्या प्रस्तावावर सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही. तो प्रस्ताव शासनदरबारी रखडला आहे. त्यामुळे या जंगलाला अभयारण्याचा दर्जा केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा वन्यप्रेंमींसह जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनादेखील लागून राहिली आहे. सुरक्षा शक्यजंगलाच्या सुरक्षेसाठी वनविभाग सातत्याने काम करीत आहे. मात्र, यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे, शेतातील रस्ते स्वच्छ ठेवावेत, जेणे करून वन्यप्राणी लवकरच दृष्टीस पडू शकेल, शेतात काम करताना सावध राहावे, घंटा जवळ बाळगून आवाज करावा. उघड्यावर शौचास न बसता शौचालयाचा उपयोग करावा. जंगल मार्गाने दुचाकीने ये-जा प्रवास करण्याचे टाळावे.वनविभागामार्फत झालेल्या सर्वेक्षणात चांदूररेल्वे व वडाळीच्या जंगलात १६ बिबटांची नोंद मे २०१६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात घेण्यात आली. त्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाविषयी मला काही सांगता येणार नाही.- हेमंतकुमार मीना, उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग.