शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

शहानुरात ३० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:05 IST

शहराला पाणी पुरविणाऱ्या शहानूर धरणात पावसाळ्याच्या मध्यावर अवघा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दर्यापूर-अंजनगाव शहर व तालुक्यातील खेड्यांना दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.

ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन : दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा इशारा

सुदेश मोरेलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शहराला पाणी पुरविणाऱ्या शहानूर धरणात पावसाळ्याच्या मध्यावर अवघा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दर्यापूर-अंजनगाव शहर व तालुक्यातील खेड्यांना दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने ३ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या पत्रकात शहानूर धरणातून केला जाणाºया पाणीपुरवठ्याचा अपव्यय टाळण्याचे व पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. शहानूर धरणात केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे यापुढे पाणी जपून न वापरल्यास आधीच एक दिवसाआड केला जाणारा पाणीपुरवठा यापुढे दोन दिवसाआड केला जाईल, असा इशारा मजीप्राच्या दर्यापूर उपविभागीय कार्यालयाने दिला आहे.धरणात २ आॅगस्ट रोजी केवळ १४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे व पाणीपातळी ४३३ मीटर आहे. गतवर्षी २ आॅगस्ट रोजी पातळी दोन मीटरने, साठा तीन दशलक्ष घनमीटरने आणि टक्केवारी सातने जास्त होती. यावरून दर्यापूर-अंजनगाव आणि दोन्ही तालुक्यांतील ३३६ गावगाडे नियमित पाणीपुरवठ्याअभावी प्रभावित होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.गेल्या ३० वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता, सन २०१२ पासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पडलेल्या पावसामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. आॅगस्ट महिन्यात ४४२ मीटर पातळी आवश्यक होती. शहानूर धरण भरण्याची सुरूवात आॅगस्टच्या प्रथम सप्ताहापासूनच होते. त्यामुळे अजूनही पावसाच्या सुखद आगमनाची अपेक्षा आहे.- सुमित हिरे, सहायक अभियंता, शहानूर उपविभाग, अंजनगाव सुर्जी.