शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

शहानुरात ३० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:05 IST

शहराला पाणी पुरविणाऱ्या शहानूर धरणात पावसाळ्याच्या मध्यावर अवघा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दर्यापूर-अंजनगाव शहर व तालुक्यातील खेड्यांना दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.

ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन : दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा इशारा

सुदेश मोरेलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : शहराला पाणी पुरविणाऱ्या शहानूर धरणात पावसाळ्याच्या मध्यावर अवघा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दर्यापूर-अंजनगाव शहर व तालुक्यातील खेड्यांना दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने ३ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या पत्रकात शहानूर धरणातून केला जाणाºया पाणीपुरवठ्याचा अपव्यय टाळण्याचे व पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. शहानूर धरणात केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे यापुढे पाणी जपून न वापरल्यास आधीच एक दिवसाआड केला जाणारा पाणीपुरवठा यापुढे दोन दिवसाआड केला जाईल, असा इशारा मजीप्राच्या दर्यापूर उपविभागीय कार्यालयाने दिला आहे.धरणात २ आॅगस्ट रोजी केवळ १४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे व पाणीपातळी ४३३ मीटर आहे. गतवर्षी २ आॅगस्ट रोजी पातळी दोन मीटरने, साठा तीन दशलक्ष घनमीटरने आणि टक्केवारी सातने जास्त होती. यावरून दर्यापूर-अंजनगाव आणि दोन्ही तालुक्यांतील ३३६ गावगाडे नियमित पाणीपुरवठ्याअभावी प्रभावित होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.गेल्या ३० वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता, सन २०१२ पासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पडलेल्या पावसामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. आॅगस्ट महिन्यात ४४२ मीटर पातळी आवश्यक होती. शहानूर धरण भरण्याची सुरूवात आॅगस्टच्या प्रथम सप्ताहापासूनच होते. त्यामुळे अजूनही पावसाच्या सुखद आगमनाची अपेक्षा आहे.- सुमित हिरे, सहायक अभियंता, शहानूर उपविभाग, अंजनगाव सुर्जी.