शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

खरीप हंगामात होणार ३0 कोटींची उलाढाल

By admin | Updated: June 2, 2014 00:52 IST

वर्षभर संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे.

धामणगाव रेल्वे : वर्षभर संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. या हंगामासाठी जून महिन्यात बी-बियाणे, खते, मशागत व शेतमजुरीकरिता तालुक्यात ३0 कोटी रूपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. उधारीवर घेतलेले बी-बियाणे, खते यावर कृषी केंद्र संचालक वर्षाकाठी चार टक्के व्याज दर आकारतात.

धामणगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६२ हजार ३३१ हेक्टर आहे. खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र ५१ हजार ६८७ हेक्टर आहे. या हंगामाच्या जून महिन्यात मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मागील वर्षीपेक्षा कपाशीचे क्षेत्र वाढणार आहे. २0 हजार हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. १0 कोटी रूपयांच्या जवळपास खर्च येणार आहे. इतर पिकांमध्ये मका, मूग, उडीद, ज्वारी, १ हजार हेक्टर असून ५0 लाख रूपयासह या महिन्यात बी-बियाण्याकरिता १७ कोटी २५ लाख रूपयांची उलाढाल एका महिन्यात होते.

यंदा २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. ६ कोटी रूपयांचा खर्च या बियाणे खरेदीवर होणार आहे. ७ हजार ८३0 हेक्टरमध्ये तुरीची लागवड होणार असून ९00 क्विंटल तुरीचे बियाणे लागणार आहे.

दिवसेंदिवस महागाईने उच्चांक गाठला असल्याने ग्रामीण भागात मजुरीचे दरही वाढले आहे. शेतीच्या कामाकरिता मजूर मिळणे कठीण झाले आहे. कपाशीच्या पेर्‍यासाठी सारे पाडणे, टोपण करणे याकरिता प्रती हेक्टरी ५00 रूपयांचा खर्च अधिक होणार आहे. कपाशी बियाणे लागवड करताना मजुरीसाठी १ कोटी रूपये खर्च होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. तर सोयाबीन, तूर या बियाण्याचा पेरा करतांना मजुरीकरिता २ हेक्टरसाठी १ हजार २00 रूपयांच्या अधिक खर्च येते. २ कोटी ७५ लाख रूपये खर्च होतो. मजुरी व मशागतीकरिता ४ कोटींच्यावर खर्च शेतकर्‍यांचा होतो.

तालुक्यातील शेतकर्‍यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकेचे पीक कर्ज घेतले तरी या रकमेत बि-बियाणे, खते, मजुरी व मशागत खर्च होत नसल्याने कृषी केंद्र संचालकांकडून एका वर्षांकरिता ४ टक्के व्याजाने बियाणे खरेदी करून शेतीत लागवड करण्यात येते व उत्पादनानंतर ही बी-बियाण्याची रक्कम दिली जात असल्याची माहिती पुढे आली आहेत. केवळ १0 टक्के शेतकरी यंदा सावकारांच्या दारी पोहचल्याचे चित्र आहे.

तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस पाहिजे त्या प्रमाणे झाला तर येत्या १८ जुलैपर्यंत तालुक्यात दरवर्षीच्या सरासरी प्रमाणे पाऊस झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता मावळण्याची चिन्हे आहेत.