शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

खरीप हंगामात होणार ३0 कोटींची उलाढाल

By admin | Updated: June 2, 2014 00:52 IST

वर्षभर संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे.

धामणगाव रेल्वे : वर्षभर संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. या हंगामासाठी जून महिन्यात बी-बियाणे, खते, मशागत व शेतमजुरीकरिता तालुक्यात ३0 कोटी रूपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. उधारीवर घेतलेले बी-बियाणे, खते यावर कृषी केंद्र संचालक वर्षाकाठी चार टक्के व्याज दर आकारतात.

धामणगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६२ हजार ३३१ हेक्टर आहे. खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र ५१ हजार ६८७ हेक्टर आहे. या हंगामाच्या जून महिन्यात मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मागील वर्षीपेक्षा कपाशीचे क्षेत्र वाढणार आहे. २0 हजार हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. १0 कोटी रूपयांच्या जवळपास खर्च येणार आहे. इतर पिकांमध्ये मका, मूग, उडीद, ज्वारी, १ हजार हेक्टर असून ५0 लाख रूपयासह या महिन्यात बी-बियाण्याकरिता १७ कोटी २५ लाख रूपयांची उलाढाल एका महिन्यात होते.

यंदा २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. ६ कोटी रूपयांचा खर्च या बियाणे खरेदीवर होणार आहे. ७ हजार ८३0 हेक्टरमध्ये तुरीची लागवड होणार असून ९00 क्विंटल तुरीचे बियाणे लागणार आहे.

दिवसेंदिवस महागाईने उच्चांक गाठला असल्याने ग्रामीण भागात मजुरीचे दरही वाढले आहे. शेतीच्या कामाकरिता मजूर मिळणे कठीण झाले आहे. कपाशीच्या पेर्‍यासाठी सारे पाडणे, टोपण करणे याकरिता प्रती हेक्टरी ५00 रूपयांचा खर्च अधिक होणार आहे. कपाशी बियाणे लागवड करताना मजुरीसाठी १ कोटी रूपये खर्च होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. तर सोयाबीन, तूर या बियाण्याचा पेरा करतांना मजुरीकरिता २ हेक्टरसाठी १ हजार २00 रूपयांच्या अधिक खर्च येते. २ कोटी ७५ लाख रूपये खर्च होतो. मजुरी व मशागतीकरिता ४ कोटींच्यावर खर्च शेतकर्‍यांचा होतो.

तालुक्यातील शेतकर्‍यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकेचे पीक कर्ज घेतले तरी या रकमेत बि-बियाणे, खते, मजुरी व मशागत खर्च होत नसल्याने कृषी केंद्र संचालकांकडून एका वर्षांकरिता ४ टक्के व्याजाने बियाणे खरेदी करून शेतीत लागवड करण्यात येते व उत्पादनानंतर ही बी-बियाण्याची रक्कम दिली जात असल्याची माहिती पुढे आली आहेत. केवळ १0 टक्के शेतकरी यंदा सावकारांच्या दारी पोहचल्याचे चित्र आहे.

तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस पाहिजे त्या प्रमाणे झाला तर येत्या १८ जुलैपर्यंत तालुक्यात दरवर्षीच्या सरासरी प्रमाणे पाऊस झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता मावळण्याची चिन्हे आहेत.