शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात होणार ३0 कोटींची उलाढाल

By admin | Updated: June 2, 2014 00:52 IST

वर्षभर संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे.

धामणगाव रेल्वे : वर्षभर संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. या हंगामासाठी जून महिन्यात बी-बियाणे, खते, मशागत व शेतमजुरीकरिता तालुक्यात ३0 कोटी रूपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. उधारीवर घेतलेले बी-बियाणे, खते यावर कृषी केंद्र संचालक वर्षाकाठी चार टक्के व्याज दर आकारतात.

धामणगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६२ हजार ३३१ हेक्टर आहे. खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र ५१ हजार ६८७ हेक्टर आहे. या हंगामाच्या जून महिन्यात मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मागील वर्षीपेक्षा कपाशीचे क्षेत्र वाढणार आहे. २0 हजार हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. १0 कोटी रूपयांच्या जवळपास खर्च येणार आहे. इतर पिकांमध्ये मका, मूग, उडीद, ज्वारी, १ हजार हेक्टर असून ५0 लाख रूपयासह या महिन्यात बी-बियाण्याकरिता १७ कोटी २५ लाख रूपयांची उलाढाल एका महिन्यात होते.

यंदा २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. ६ कोटी रूपयांचा खर्च या बियाणे खरेदीवर होणार आहे. ७ हजार ८३0 हेक्टरमध्ये तुरीची लागवड होणार असून ९00 क्विंटल तुरीचे बियाणे लागणार आहे.

दिवसेंदिवस महागाईने उच्चांक गाठला असल्याने ग्रामीण भागात मजुरीचे दरही वाढले आहे. शेतीच्या कामाकरिता मजूर मिळणे कठीण झाले आहे. कपाशीच्या पेर्‍यासाठी सारे पाडणे, टोपण करणे याकरिता प्रती हेक्टरी ५00 रूपयांचा खर्च अधिक होणार आहे. कपाशी बियाणे लागवड करताना मजुरीसाठी १ कोटी रूपये खर्च होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. तर सोयाबीन, तूर या बियाण्याचा पेरा करतांना मजुरीकरिता २ हेक्टरसाठी १ हजार २00 रूपयांच्या अधिक खर्च येते. २ कोटी ७५ लाख रूपये खर्च होतो. मजुरी व मशागतीकरिता ४ कोटींच्यावर खर्च शेतकर्‍यांचा होतो.

तालुक्यातील शेतकर्‍यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकेचे पीक कर्ज घेतले तरी या रकमेत बि-बियाणे, खते, मजुरी व मशागत खर्च होत नसल्याने कृषी केंद्र संचालकांकडून एका वर्षांकरिता ४ टक्के व्याजाने बियाणे खरेदी करून शेतीत लागवड करण्यात येते व उत्पादनानंतर ही बी-बियाण्याची रक्कम दिली जात असल्याची माहिती पुढे आली आहेत. केवळ १0 टक्के शेतकरी यंदा सावकारांच्या दारी पोहचल्याचे चित्र आहे.

तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस पाहिजे त्या प्रमाणे झाला तर येत्या १८ जुलैपर्यंत तालुक्यात दरवर्षीच्या सरासरी प्रमाणे पाऊस झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता मावळण्याची चिन्हे आहेत.