शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात होणार ३0 कोटींची उलाढाल

By admin | Updated: June 2, 2014 00:52 IST

वर्षभर संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे.

धामणगाव रेल्वे : वर्षभर संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. या हंगामासाठी जून महिन्यात बी-बियाणे, खते, मशागत व शेतमजुरीकरिता तालुक्यात ३0 कोटी रूपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. उधारीवर घेतलेले बी-बियाणे, खते यावर कृषी केंद्र संचालक वर्षाकाठी चार टक्के व्याज दर आकारतात.

धामणगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६२ हजार ३३१ हेक्टर आहे. खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र ५१ हजार ६८७ हेक्टर आहे. या हंगामाच्या जून महिन्यात मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मागील वर्षीपेक्षा कपाशीचे क्षेत्र वाढणार आहे. २0 हजार हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. १0 कोटी रूपयांच्या जवळपास खर्च येणार आहे. इतर पिकांमध्ये मका, मूग, उडीद, ज्वारी, १ हजार हेक्टर असून ५0 लाख रूपयासह या महिन्यात बी-बियाण्याकरिता १७ कोटी २५ लाख रूपयांची उलाढाल एका महिन्यात होते.

यंदा २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. ६ कोटी रूपयांचा खर्च या बियाणे खरेदीवर होणार आहे. ७ हजार ८३0 हेक्टरमध्ये तुरीची लागवड होणार असून ९00 क्विंटल तुरीचे बियाणे लागणार आहे.

दिवसेंदिवस महागाईने उच्चांक गाठला असल्याने ग्रामीण भागात मजुरीचे दरही वाढले आहे. शेतीच्या कामाकरिता मजूर मिळणे कठीण झाले आहे. कपाशीच्या पेर्‍यासाठी सारे पाडणे, टोपण करणे याकरिता प्रती हेक्टरी ५00 रूपयांचा खर्च अधिक होणार आहे. कपाशी बियाणे लागवड करताना मजुरीसाठी १ कोटी रूपये खर्च होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. तर सोयाबीन, तूर या बियाण्याचा पेरा करतांना मजुरीकरिता २ हेक्टरसाठी १ हजार २00 रूपयांच्या अधिक खर्च येते. २ कोटी ७५ लाख रूपये खर्च होतो. मजुरी व मशागतीकरिता ४ कोटींच्यावर खर्च शेतकर्‍यांचा होतो.

तालुक्यातील शेतकर्‍यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकेचे पीक कर्ज घेतले तरी या रकमेत बि-बियाणे, खते, मजुरी व मशागत खर्च होत नसल्याने कृषी केंद्र संचालकांकडून एका वर्षांकरिता ४ टक्के व्याजाने बियाणे खरेदी करून शेतीत लागवड करण्यात येते व उत्पादनानंतर ही बी-बियाण्याची रक्कम दिली जात असल्याची माहिती पुढे आली आहेत. केवळ १0 टक्के शेतकरी यंदा सावकारांच्या दारी पोहचल्याचे चित्र आहे.

तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस पाहिजे त्या प्रमाणे झाला तर येत्या १८ जुलैपर्यंत तालुक्यात दरवर्षीच्या सरासरी प्रमाणे पाऊस झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता मावळण्याची चिन्हे आहेत.