शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

२९७ जणांचे तोंड उघडणे बंद; खर्ऱ्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST

मोहन राऊत धामणगाव रेल्वे : सुपारी, तंबाखू , चुना, थंडाई तसेच इतर पदार्थांपासून तयार केलेला गुटखा म्हणजे खर्रा ...

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : सुपारी, तंबाखू , चुना, थंडाई तसेच इतर पदार्थांपासून तयार केलेला गुटखा म्हणजे खर्रा तरुण पिढीला चटक लावून गेला आहे. याच्या सेवनामुळे पंचवीस ते चाळीस वर्ष वयोगटातील युवक तोंडाच्या कर्करोगाच्या आजाराने त्रस्त असून, तालुक्यातील २९७ जणांना तोंडच उघडता येत नसल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

राज्य शासनाने १९ जुलै २०१२ रोजी गुटखाबंदी केली. केरळ, मध्य प्रदेश, बिहारनंतर संपूर्ण राज्यात गुटखाबंदी करणारे महाराष्ट्र हे चौथे ठरले. एक महिन्यात ३० कोटींचा महसूल बुडाला तरी चालेल. तथापि, राज्यातील तरुण पिढी गुटख्याला बळी जाऊ नये म्हणून गुटखाबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, गुटखाबंदीनंतर खर्रा खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धामणगाव तालुक्यात आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, निंबोली परिसरात ६० युवकांचे या खर्ऱ्यामुळे तोंड उघडत नाही. मंगरूळ दस्तगीर परिसरात ७० युवकांना तोंड उघडता येत नसल्याने जेवण करता येत नाही. तळेगाव दशासर भागात ५५ युवक व्यवस्थितपणे काही खाऊ शकत नाही. अंजनसिंगी परिसरातील सर्वांत भयावह स्थिती आहे. तेथे ११४ जणांचे तोंड खर्ऱ्यामुळे बंद झाले आहे.

सहा हजार खातात तंबाखू अन सुपारी

तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल सहा हजार लोक तंबाखू व सुपारी दिवसातून १२ ते १३ वेळा चघळत असल्याचे सर्वेक्षणात पाहायला मिळते. तंबाखूचे सेवन अधिक प्रमाणात होत असल्याने निकोटिन हा घटक शरीरावर सर्वाधिक वाईट परिणाम करीत आहे. तोंडाची चव जाणे, भूक मंदावणे, पचनशक्ती कमी होणे, अंडाशयावर परिणाम होऊन शुक्राणूची संख्या कमी होणे, नपुंसकत्व येणे अशा अनेक तक्रारींमध्ये वाढ झाली. कर्करोगालाही खर्ऱ्याने आमंत्रण मिळत आहे.

शासकीय कार्यालयात नावापुरती तंबाखू बंदी

शासकीय कार्यालयांत तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास बंदी असली तरी खर्रा चवीने शासकीय कार्यालयात वापरला जातो. खासगी कार्यालयाच्या तुलनेत शासकीय कार्यालयांमध्ये खर्ऱ्याचे सेवन अधिक प्रमाणात होत असून, कामाचा व्याप व ताण सांभाळताना शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी दिवसातून दोन ते तीन खर्रा पचविताना दिसतात.

कोट

आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणावर नजर टाकली असता, २९७ जणांचे खर्ऱ्यामुळे तोंड उघडणे बंद झाले आहे. सहा हजार लोक दररोज तंबाखू खात असल्याचे सर्वेक्षणात पुढे आले आहे.

- हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे

पान ३ ची लिड