शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत २९ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 20:45 IST

एकूण ५०९ प्रकल्पांत प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दलघमी इतका आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ९४९.८३ दलघमी एवढा आहे. त्याची टक्केवारी २९.४९ एवढी आहे.

- संदीप मानकर

अमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे नऊ प्रकल्प, मध्यम २४ व लघु ४७६ प्रकल्प असे एकूण ५०९ प्रकल्पांत केवळ २९.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उन्हाळ्याच्या दीड महिन्यापर्यंत ते पाणी जपून वापरावे लागणार आहे, असे जलसंपदा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिका-यांनी सांगितले. मोठ्या नऊ प्रकल्पांमध्ये सरासरी ४६.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी अनेक जिल्ह्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्याची सर्वाधिक झळ बुलडाणा जिल्ह्याला पोहचली होती.

एकूण ५०९ प्रकल्पांत प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दलघमी इतका आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ९४९.८३ दलघमी एवढा आहे. त्याची टक्केवारी २९.४९ एवढी आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा उर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात सद्यस्थितीत ५३.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ३७.२७ टक्के, अरुणावती १३.४४ टक्के, बेंबळा प्रकल्पात ५९.६९ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प ४८.१५ टक्के, वान ५१.१५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प ५३.५८ टक्के, पेनटाकळी ५१.०१ टक्के, खडकपुर्णा ३४.२१ टक्के पाणीसाठा आहे. यंदा बुलडाणा जिल्ह्याची स्थिती चांगली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने २३ एप्रिलपर्यंतच्या अहवालात दिली.

२४ मध्यम प्रकल्पांची स्थितीअमरावती जिल्ह्यतील शहानूर या मध्यम प्रकल्पांत ६२ टक्के, तर चंद्रभागा प्रकल्पात ६४.७८ टक्के, पूर्णा ६४.४९ टक्के, सपन ६३.८९ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यातील अधरपुस ६२.४७ टक्के, सायखेडा ५२.२४ टक्के, गोकी २१.७५ टक्के, वाघाडी ३६.५७टक्के, बोरगाव २६.१७ टक्के, नवरगाव ४४.६३ टक्के, अकोला जिल्ह्याती निर्गुणा २४.५१ टक्के, मोर्णा ४५.७८ टक्के, उमा १४.७३ टक्के, घुंगशी बॅरेज ५२ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ४२.४५ टक्के, सोनल २७.९६ टक्के, एकबुर्जी ३६.३४ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा ६३.१९ टक्के, पलढग १०.७९ टक्के, मस ४१.१६ टक्के, कोराडी ६४.७५ टक्के, मन ५१.१५ टक्के, तोरणा २०.२८ टक्के, उतावळी ४२.९ टक्के  पाणीसाठा शिल्लक आहे.