शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

दोन महिन्यांत २८९ जणांना दृष्टिदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:09 IST

अमरावती : मोतीबिंदू शस्त्रक्रिया न झाल्यास रुग्णांना काचबिंदू होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला नेत्र शस्त्रक्रियेचा लाभ ...

अमरावती : मोतीबिंदू शस्त्रक्रिया न झाल्यास रुग्णांना काचबिंदू होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला नेत्र शस्त्रक्रियेचा लाभ मिळवून द्यावा. मरणोत्तर नेत्रदानासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येण्यासाठी ही चळवळ जिल्ह्यात सर्वदूर पोहचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी दिले.

कर्मयोगी दृष्टिदाता डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टिक्षीणता कार्यक्रमात दृष्टिदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. नम्रता सोनोने, राजेंद्र फसाटे आदी उपस्थित होते. काळी बुरशी आजाराचा प्रादुर्भाव पाहता, कोविडपश्चात काळजीबाबत संक्रमितांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीतर्फे जिल्हा कारागृहातील कैद्यांची नेत्र तपासणी, विनामूल्य चष्मे वितरण करण्यात आलेे. तालुकास्तरावरही नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना विनामूल्य चष्मे दिले, अशी माहिती जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. नम्रता सोनोने यांनी सांगितले.

बॉक्स

मरणोत्तर नेत्रदानासाठी अधिकाधिक संकल्प आवश्यक

दृष्टिदान सप्ताहात ५३ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया व एका रुग्णावर काचबिंदू शस्त्रक्रिया होऊन अशा ५४ रुग्णांना दृष्टिलाभ झाला. एप्रिलपासून आतापर्यंत २८९ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. ही कामे निरंतर ठेवण्याबरोबरच मरणोत्तर नेत्रदानासाठी अधिकाधिक व्यक्तींनी संकल्प करणे आवश्यक आहे. त्यासाठी निरनिराळे उपक्रम आखावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बाॅक्स

नेत्रदात्यांचे सॉफ्टवेअर तयार करा

दृष्टिदान दिनानिमित्त सेल्फी पॉईंटचा उपक्रम नेत्र विभागाने राबवला. त्यात ५१ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला. त्याचप्रमाणे, ‘ एहसास करे नेत्रहीन का दर्द’ हा हरीना फाऊंडेशनचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. असे उपक्रम सातत्याने राबवावेत व नेत्रदात्यांचे सॉफ्टवेअर तयार करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.