शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

खर्च २७ कोटी; मुबलक वीज केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

धारणी तालुक्यातील दाबका येथे ३३ केव्ही उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला आकोट ते हिवरखेड मार्गे ३३ केव्ही वीजपुरवठा सुरू आहे. मात्र, एक वर्षांपासून ३३ केव्ही क्षमतेची डबल लाइन आल्यानंतरसुद्धा वीजपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे या उपकेंद्राला जुटपाणी येथून आलेल्या मध्य प्रदेशातील १३२ केव्ही वीजपुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा लक्षवेध : आदिवासी पाडे अंधारातच, सौर ऊर्जेवरील यंत्रणेचा बागुलबुवा

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यातील दाबका येथील ३३ केव्ही उपकेंद्राच्या माध्यमातून तीन वर्षांपासून मध्यप्रदेशातील १३२ केव्ही वाहिनीवरून मेळघाटातील वीजपुरवठा करण्यात येत आहे. या विद्युत व्यवस्थेसाठी २७ कोटी रुपये खर्ची पडलेत, असा दावा केला जातो. मात्र, अद्यापही मेळघाटातील पाड्यांमध्ये अंधार कायम आहे. मग ही कोट्यवधीची रक्कम खर्चून फायदा झाला कुणाला, असा प्रश्न आदिवासी उपस्थित करीत आहेत. ११ केव्हीचा विद्युत पुरवठा आणि त्याच्या दुरुस्ती व देखभाल खर्चाच्या नावाने लाखो रुपये दरवर्षी काढले जातात. मात्र, हा पैसा नेमका कुठे जातो, याचा थांगपत्ता लागत नाही.धारणी तालुक्यातील दाबका येथे ३३ केव्ही उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला आकोट ते हिवरखेड मार्गे ३३ केव्ही वीजपुरवठा सुरू आहे. मात्र, एक वर्षांपासून ३३ केव्ही क्षमतेची डबल लाइन आल्यानंतरसुद्धा वीजपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे या उपकेंद्राला जुटपाणी येथून आलेल्या मध्य प्रदेशातील १३२ केव्ही वीजपुरवठा करण्यात येत आहे. यानंतरही दाबका उपकेंद्रात नुकताच सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. आता त्याची आवश्यकता कशाला, हे एक कोडेच आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून वीजपुरवठा येत असतानासुद्धा सौरऊर्जा प्रकल्प उभारणी संशय निर्माण करणारी आहे. एवढा सारा खटाटोप करण्यात आला तरी पाड्यांमधील अंधार कायम आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.मूलभूत प्रश्न कायममेळघाटात कुपोषणाप्रमाणेच येथील आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष जात नाही. सरकारने अतिदुर्गम भागासाठी विशेष योजना आणि आर्थिक निधीची तरतूद केली. तो निधी खर्च केला जात नाही. अजूनही मेळघाटातील गाव-पाड्यांवर वीज नाही. खासगी कंपन्यांच्या पवन ऊर्जायंत्रे लागली असली तरी त्यांची वीज अन्यत्र वाहून नेली जाते. राज्यपाल, मुख्यमंत्री असे झाडून सारे मेळघाटात येतात. तरीही आदिवासी पाड्यांंवर वीज पोहोचलेली नाही. विजेचे खांब वनजमिनीत उभारताना वनकायदा आडवा येतो. अतिदुर्गम भागासाठी विशेष योजना असूनही वनकायद्याचा बागुलबुवा करीत आदिवासींना विजेपासून वंचित ठेवले जाते, अशी ओरड आहे.मोबाइललाही रेंज नाहीरिलायन्स आणि टाटाने मोठे मोबाईल टॉवर मेळघाटात उभारले आहेत. तरीही येथे रेंज मिळत नाही. जवळील मध्य प्रदेशात रेंज मिळते; पण येथे रेंज नाही. आदिवासींचा संवाद तुटतो. वीज नसल्याने शेतीचा कृषिपंप शोभेची वस्तू ठरला आहे. आदिवासी शेतात पाणी फिरवू शकत नाहीत. मोबाईलवर बोलणे करायचे झाल्यास गाव सोडून उंचवटा शोधावा लागतो. त्यामुळे २७ कोटींच्या खर्चाची अंमलबजावणी झाली तरी कुठे, याचा शोध घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मेळघाटातील अतिदुर्गम गावांत अद्यापही वीज मुबलक प्रमाणात पोहोचलेली नाही.

टॅग्स :electricityवीज