लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीने कहर केला आहे. रविवारी पुन्हा ३९९ पॉझिटिव्ह आले, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत २५ हजार २९४ संक्रमितांची नोंद झाली, तर मृतांची संख्या ४३५ झाली आहे. १० फेब्रुवारीपासून सातत्याने तीन शतकी रूग्णसंख्येने अमरावतीकरांमध्ये भीती व्यक्त होत आहे. नवीन वर्षात जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना संक्रमितांच्या संख्येत बेफाम वाढ होत आहे. फेब्रुवारीत यात अधिक भर पडली आहे. विशेषत: कोरोनाने ज्येष्ठ नागरिकांचे बळी घेतल्याची आकडेवारी आहे. अमरावती शहरात संक्रमितांची संख्या वाढीस लागली असून, महापालिका प्रशासनाने गृह विलगीकरण रुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु, दरदिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा हैराण झाली आहे.
कॉलन्यांमध्ये संसर्गाची भीतीशहरातील कॉलनी, अपार्टमेंट यात कोरोना पॉझिटिव्ह जादा आढळून येत आहेत. त्याच्या तुलनेत मागास नागरी वस्त्यांमध्ये कोरोनाग्रस्त आढळून येण्याची संख्या कमी आहे.
त्रिसूत्रीचे पालन विसरलेकोरोना लस येताच, नागरिक त्रिसूत्रीचे पालन करणे विसरले आहेत. केवळ ५ ते १० टक्केच नागरीक मास्कचा वापर करतात. शारीरिक अंतराचे पालन कुठेही दिसून येत नाही. बाजारपेठेतील गर्दी बघता, कोरोनाचा स्फोट होण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू झाली आहे. नियमित हात धुणे तर आता बंदच झाले आहे. कोरोना वाढीस बहुधा नागरिक जबाबदार असल्याचे एकंदर चित्र आहे.
१३ ठिकाणी उपचार सुविधाकोरोना संक्रमित रुग्णांना १३ ठिकाणी उपचाराची सुविधा आरोग्य यंत्रणेने केली आहे. यात शहर, ग्रामीण अशा दोन्हीही भागातील दवाखान्यात रुग्णांचा उपचार होणार आहे.