शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

२५० कोटींच्या मृग बहराचे नुकसान होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST

फोटो पी ३० जरूड पान २ ची लिड प्रशांत काळबेंडे जरूड : एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे तौक्ते ...

फोटो पी ३० जरूड

पान २ ची लिड

प्रशांत काळबेंडे

जरूड : एकीकडे कोरोनाचा कहर, तर दुसरीकडे तौक्ते वादळामुळे कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे ताणावर टाकलेल्या मृग बहराच्या संत्रा झाडांचा ताण तुटल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मृग बहराचे साधारणत: २५० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अवकाळी पावसामुळे मशागतीची कामे अपूर्ण असल्याने पेरणीच्या कामाला व्यत्यय आला आहे, तर वरूड तालुक्यात संत्रा मृग बहाराची पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मृग बहर फुटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरूड तालुक्यातील एकूण २२ हजार हेक्टर संत्राक्षेत्रापैकी सहा हजार हेक्टर क्षेत्रात अंबिया बहर घेतला जातो. मृग बहर येण्यासाठी ६० ते ७५ दिवसांचा ताण आवश्यक असतो. मात्र, अवकाळी पावसाने तो ताण तुटल्याने संत्रा उत्पादकांच्या आशा धूसर झाल्या आहेत.

कोरोनामुळे नागरिक त्रस्त असताना तौक्ते वादळाने झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेत मशागतीची कामे अपूर्णच आहे, तर संत्रा मृग बहर फुटीची शक्यता धूसर झाली आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. वादळासह आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

लॉकडाऊन मुळावर

एकीकडे संत्रा उत्पादकांवर अस्मानी संकट कोसळले असताना, खरीप हंगामातील बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूरसुद्धा आर्थिक अडचणीत सापडला आहे. कोरोनाचे धास्तीने शेतमजूरही शेतावर येण्यास तयार नाही. शेतीची कामे जरी सुरू झाली असली आर्थिक अडचणीमुळे शेतीकरिता लागणारे बी-बियाणे उधार देण्यास तयार होत नाही, तर बँक कर्ज देत नाही, अशा अवस्थेत शेतकरी सापडला आहे. पैशांअभावी शेतकरी पंगू झाला असल्याने शेकडो हेक्टर शेतजमीन पडीक राहील, असा अंदाजसुद्धा वर्तविला जात आहे.

काय आहे मृग बहर?

लिंबूवर्गीय फळझाडांना बहर येण्यासाठी झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य (कर्ब/नत्र) वाढीकरिता खर्च न होता अन्नद्रव्यांचा संचय होणे जरूरी असते. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच, बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. बहर धरणे म्हणजे, झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे. निसर्गतः संत्रा-मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहर येतो. त्यापैकी (पावसाळ्यात) जून-जुलै महिन्यांमध्ये येणाऱ्या बहरास मृग बहर आणि ऑक्‍टोबर महिन्यात (हस्त नक्षत्रात) येणाऱ्या बहरास हस्त बहर, तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये म्हणजे (थंडी संपतेवेळी) येणाऱ्या बहरास आंबिया बहर म्हणतात.

कोट

तौक्ते वादळामुळे झालेल्या वादळी पावसामुळे माझ्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. मृग बहर फोडण्यासाठी आमचे लाखो रुपये खर्च झाले. परंतु, अचानक झालेल्या पावसामुळे झाडाचा ताण तुटला गेल्याने मृग बहर फुटण्याची शक्यता नाही.

- प्रकाश देशमुख, संत्रा उत्पादक शेतकरी, जरूड

--------------

तालुक्यात साधारणत: २२ हजार हेक्टर शेतीत संत्राउत्पादन घेतले जाते. परंतु, तौक्ते वादळाच्या पावसामुळे सुमारे १४ हजार हेक्टर जमिनीवरील संत्र्याच्या मृग बहराचे नुकसान झाले आहे. सदर अहवाल आपण वरिष्ठ पातळीवर पाठविला आहे.

- राजीव सावळे, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, वरूड