शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळ विकासासाठी हवे २५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:28 IST

बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे.

ठळक मुद्देआचारसंहितापूर्वीच निविदांची लगबग : अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे.शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बेलोरा विमानतळावर पायाभूत सुविधांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. डीपीआरला शासनाची मान्यता मिळताच विकासकामांचे अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि निधी मंजूर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या सर्व बाबी पूर्ण करण्याचे मौखिक आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वरिष्ठांनी दिले आहेत. तथापि, विमानतळाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्यास पुढे काहीच करता येणार नाही, असे बोलले जात आहे.दिल्ली येथील राइट्स कंपनीने विमानतळाचे मातीपरीक्षण पूर्ण केले. विद्युत सर्वेक्षणदेखील झाले. विमानतळावर प्रस्तावित विजेच्या कामांसंदर्भात पाहणी केली. शासनाने विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिगंसंदर्भात राइट्सवर दोन कोटी खर्च केले. टोपोग्राफिकल सर्व्हे, धावपट्टीचे निरीक्षण, एटीएस टॉवरची पाहणी करण्यात आली. नाईट लँडिंग, रन-वे लांबी वाढविण्याबाबत नव्याने सर्वेक्षण झाले. विमानांच्या नाइट लँडिंगसंदर्भात विमानतळ परिसरातच ११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे. रन-वेवर येणाऱ्या समस्यांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डीपीआरमध्ये इत्थंभूत बाबींचा अंतर्भाव असेल.येत्या मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी बेलोरा विमानतळावर विविध विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवरचा प्लॅन तयारबेलोरा विमानतळाहून विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार विमानतळ विकास कंपनीने विकासकामे हाती घेतली आहेत. माती परीक्षणानंतर विद्युत सर्वेक्षण पूर्ण झाले. दरम्यान, राइट्स कंपनीकडून टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवर उभारणीसाठी नकाशा तयार करण्यात आला आहे. धावपट्टीची लांबी वाढविण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे.अमरावतीहून विमानसेवा सुरू करणे हे फार गरजेचे आहे. विकासकामे पूर्णत्वासाठी २५० कोटींची गरज आहे. मंगळवारी अर्थमंत्र्यांची भेट घेण्यात आली. अर्थसंकल्पात निधी दिला जाईल, असे त्यांनी आश्वासित केले आहे.- सुनील देशमुखआमदार, अमरावती