शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

बेलोरा विमानतळ विकासासाठी हवे २५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:28 IST

बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे.

ठळक मुद्देआचारसंहितापूर्वीच निविदांची लगबग : अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे.शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बेलोरा विमानतळावर पायाभूत सुविधांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. डीपीआरला शासनाची मान्यता मिळताच विकासकामांचे अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि निधी मंजूर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या सर्व बाबी पूर्ण करण्याचे मौखिक आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वरिष्ठांनी दिले आहेत. तथापि, विमानतळाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्यास पुढे काहीच करता येणार नाही, असे बोलले जात आहे.दिल्ली येथील राइट्स कंपनीने विमानतळाचे मातीपरीक्षण पूर्ण केले. विद्युत सर्वेक्षणदेखील झाले. विमानतळावर प्रस्तावित विजेच्या कामांसंदर्भात पाहणी केली. शासनाने विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिगंसंदर्भात राइट्सवर दोन कोटी खर्च केले. टोपोग्राफिकल सर्व्हे, धावपट्टीचे निरीक्षण, एटीएस टॉवरची पाहणी करण्यात आली. नाईट लँडिंग, रन-वे लांबी वाढविण्याबाबत नव्याने सर्वेक्षण झाले. विमानांच्या नाइट लँडिंगसंदर्भात विमानतळ परिसरातच ११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे. रन-वेवर येणाऱ्या समस्यांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डीपीआरमध्ये इत्थंभूत बाबींचा अंतर्भाव असेल.येत्या मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी बेलोरा विमानतळावर विविध विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवरचा प्लॅन तयारबेलोरा विमानतळाहून विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार विमानतळ विकास कंपनीने विकासकामे हाती घेतली आहेत. माती परीक्षणानंतर विद्युत सर्वेक्षण पूर्ण झाले. दरम्यान, राइट्स कंपनीकडून टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवर उभारणीसाठी नकाशा तयार करण्यात आला आहे. धावपट्टीची लांबी वाढविण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे.अमरावतीहून विमानसेवा सुरू करणे हे फार गरजेचे आहे. विकासकामे पूर्णत्वासाठी २५० कोटींची गरज आहे. मंगळवारी अर्थमंत्र्यांची भेट घेण्यात आली. अर्थसंकल्पात निधी दिला जाईल, असे त्यांनी आश्वासित केले आहे.- सुनील देशमुखआमदार, अमरावती