शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

बेलोरा विमानतळ विकासासाठी हवे २५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:28 IST

बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे.

ठळक मुद्देआचारसंहितापूर्वीच निविदांची लगबग : अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे.शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बेलोरा विमानतळावर पायाभूत सुविधांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. डीपीआरला शासनाची मान्यता मिळताच विकासकामांचे अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि निधी मंजूर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या सर्व बाबी पूर्ण करण्याचे मौखिक आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वरिष्ठांनी दिले आहेत. तथापि, विमानतळाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्यास पुढे काहीच करता येणार नाही, असे बोलले जात आहे.दिल्ली येथील राइट्स कंपनीने विमानतळाचे मातीपरीक्षण पूर्ण केले. विद्युत सर्वेक्षणदेखील झाले. विमानतळावर प्रस्तावित विजेच्या कामांसंदर्भात पाहणी केली. शासनाने विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिगंसंदर्भात राइट्सवर दोन कोटी खर्च केले. टोपोग्राफिकल सर्व्हे, धावपट्टीचे निरीक्षण, एटीएस टॉवरची पाहणी करण्यात आली. नाईट लँडिंग, रन-वे लांबी वाढविण्याबाबत नव्याने सर्वेक्षण झाले. विमानांच्या नाइट लँडिंगसंदर्भात विमानतळ परिसरातच ११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे. रन-वेवर येणाऱ्या समस्यांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डीपीआरमध्ये इत्थंभूत बाबींचा अंतर्भाव असेल.येत्या मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी बेलोरा विमानतळावर विविध विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवरचा प्लॅन तयारबेलोरा विमानतळाहून विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार विमानतळ विकास कंपनीने विकासकामे हाती घेतली आहेत. माती परीक्षणानंतर विद्युत सर्वेक्षण पूर्ण झाले. दरम्यान, राइट्स कंपनीकडून टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवर उभारणीसाठी नकाशा तयार करण्यात आला आहे. धावपट्टीची लांबी वाढविण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे.अमरावतीहून विमानसेवा सुरू करणे हे फार गरजेचे आहे. विकासकामे पूर्णत्वासाठी २५० कोटींची गरज आहे. मंगळवारी अर्थमंत्र्यांची भेट घेण्यात आली. अर्थसंकल्पात निधी दिला जाईल, असे त्यांनी आश्वासित केले आहे.- सुनील देशमुखआमदार, अमरावती