शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
3
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
4
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
7
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
8
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
9
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
10
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
11
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
12
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
13
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
14
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
15
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
16
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
17
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
18
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
19
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
20
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 

बेलोरा विमानतळ विकासासाठी हवे २५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:28 IST

बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे.

ठळक मुद्देआचारसंहितापूर्वीच निविदांची लगबग : अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विविध कामांसंदर्भात विकास आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, २५० कोटी निधीची गरज आहे. याकरिता राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे, अन्यथा येथून विमानाचे ‘टेक आॅफ’ हे स्वप्नच ठरेल, असे चित्र आहे.शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बेलोरा विमानतळावर पायाभूत सुविधांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. डीपीआरला शासनाची मान्यता मिळताच विकासकामांचे अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आणि निधी मंजूर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या सर्व बाबी पूर्ण करण्याचे मौखिक आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या वरिष्ठांनी दिले आहेत. तथापि, विमानतळाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद नसल्यास पुढे काहीच करता येणार नाही, असे बोलले जात आहे.दिल्ली येथील राइट्स कंपनीने विमानतळाचे मातीपरीक्षण पूर्ण केले. विद्युत सर्वेक्षणदेखील झाले. विमानतळावर प्रस्तावित विजेच्या कामांसंदर्भात पाहणी केली. शासनाने विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिगंसंदर्भात राइट्सवर दोन कोटी खर्च केले. टोपोग्राफिकल सर्व्हे, धावपट्टीचे निरीक्षण, एटीएस टॉवरची पाहणी करण्यात आली. नाईट लँडिंग, रन-वे लांबी वाढविण्याबाबत नव्याने सर्वेक्षण झाले. विमानांच्या नाइट लँडिंगसंदर्भात विमानतळ परिसरातच ११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारले जाणार आहे. रन-वेवर येणाऱ्या समस्यांबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, डीपीआरमध्ये इत्थंभूत बाबींचा अंतर्भाव असेल.येत्या मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी बेलोरा विमानतळावर विविध विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवरचा प्लॅन तयारबेलोरा विमानतळाहून विमानसेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार विमानतळ विकास कंपनीने विकासकामे हाती घेतली आहेत. माती परीक्षणानंतर विद्युत सर्वेक्षण पूर्ण झाले. दरम्यान, राइट्स कंपनीकडून टर्मिनस बिल्डिंग, एटीएस टॉवर उभारणीसाठी नकाशा तयार करण्यात आला आहे. धावपट्टीची लांबी वाढविण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे.अमरावतीहून विमानसेवा सुरू करणे हे फार गरजेचे आहे. विकासकामे पूर्णत्वासाठी २५० कोटींची गरज आहे. मंगळवारी अर्थमंत्र्यांची भेट घेण्यात आली. अर्थसंकल्पात निधी दिला जाईल, असे त्यांनी आश्वासित केले आहे.- सुनील देशमुखआमदार, अमरावती