शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या पाणीपुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरची वाढ

By admin | Updated: May 13, 2015 00:33 IST

शहरात साधारणत: ९५ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, उन्हाळ्याच्या दृष्टीने आता दररोज १२० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे.

वैभव बाबरेकर अमरावतीअमरावती : शहरात साधारणत: ९५ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, उन्हाळ्याच्या दृष्टीने आता दररोज १२० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची मागणी वाढल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरने वाढ करण्यात आली आहे. मोर्शीजवळील सिंभोरा धरणावरून अमरावतीच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईन लाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. त्याकरिता सिभोंरा धरणावर २४ तास पाच पाण्याचे पंप सुरुच असतात. साधारणत: हिवाळा व पावसाळ्यात नागरिक पाण्याचा वापर कमी करतात. मात्र, उन्हाळ्यात नागरिकांना अधिक पाण्याची गरज भासते. उन्हाळ्यात उन्हाच्या दाहकतेने पाणी पिण्याचे प्रमाणही वाढते. तसेच थंड हवेसाठी घराघरात कुलरसुध्दा लागतात. त्यामुळे सर्वाधिक पाण्याचा वापर उन्हाळ्यात होत आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी पुरवठ्यात २५ दशलक्ष लिटरने वाढ केली आहे. जलशुध्दीकरण केंद्राची मर्यादा ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावयाचे असतानाही मर्यादेपेक्षा अधिक १२० दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा शहराला केला जात आहे. उन्हाळ्यात नागरिक पाण्याचा अपव्यय अधिक प्रमाणात करतात. त्यातच पाणी गळतीचे प्रमाणही ३० टक्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठ्यात वाढ केली आहे. मजीप्राकडे ८० हजार ग्राहकशहरात ८० हजार ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. त्यामध्ये घरगुती नळ, सावर्जनिक नळ व कमर्शियल जोडणीधारक आहेत. हिवाळा व पावसाळ्यात नागरिकांना ८० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्यात पाणी मागणी वाढत असल्यामुळे ८० हजार ग्राहकांनाच १२० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासत आहे. ११ हजार ग्राहकांना अधिकृत पाणीपुरवठामजीप्राच्या सुवर्ण जंयती महोत्सवी वर्षा अतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी खासगी नळजोडणी योजना कार्यान्वित करणार आहे. त्याकरिता ११ हजार ग्राहकांना हक्काचे पाणी मिळणार आहे. पाणीपुरवठ्यात ३० टक्के गळती असून सर्वाधिक गळती मागासवस्तीत आहे. त्यातच सावर्जनिक नळावर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा निधी महापालिकेकडे जमा झाला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात निधी वळती करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे. या योजनेत प्रत्येक नळ जोडणीधारकांसाठी शासन ४ हजार रुपये खर्चसुध्दा करणार आहेत.