शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जिल्ह्यातील २५ फिडर झाले भारनियमनमुक्त

By admin | Updated: July 1, 2014 23:13 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच त्रस्त असताना वीज वितरण कंपनीच्या संदर्भातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मंगळवारी महावितरणचे मुख्य

अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच त्रस्त असताना वीज वितरण कंपनीच्या संदर्भातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मंगळवारी महावितरणचे मुख्य अभियंता ताकसांडे यांच्या उपस्थितीत जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या दालनात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील ३१ पैकी २५ सिंगल फेज फिडर भारनियमन मुक्त करण्यात आल्याची माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. पावसाने दडी मारल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून ओलिताची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणी असतानाही भारनियमनामुळे ओलिताची कामे करता येत नाही. अशातच विजेची संबंधित अनेक समस्यांना सध्या शेतकरी व नागरिक अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. भारनियमन व विजेच्या समस्येबाबत जि.प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करुन विजेच्या समस्या व भारनियमनावर तोडगा काढण्याची मागणी रेटून धरली होती. याची दखल घेत अमरावती जिल्ह्यातील ३१ पैकी २५ सिंगल फेज फिडर भारनियमनमुक्त झाले असून याच फिडरला जोडण्यात आले थ्री फेज वीज पुरवठा करणाऱ्या फिडरवर आता दिवसा आठ तास आणि रात्री १० याप्रमाणे वीज पुरवठा होणार असून आठवड्यातील तीन आणि चार दिवस याप्रमाणे वीज पुरवठा केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे सिंगल फेज फिडरवर २४ तास वीज पुरवठा होणार आहे. जि.प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी हा प्रश्न लावून धरल्यामुळे संपूर्ण राज्यात सिंगल फेज फिडर भारनियमन मुक्त करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यावेळी या बैठकीत चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी डीबी ट्रान्सफार्मर तसेच विजेच्या समस्या मांडून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. याशिवाय जि.प. सदस्य सदाशिव फडके यांनी मेळघाटातील भारनियमन व कमी दाबाचा वीज पुरवठा यामुळे पाणी पुरवठा व सिंचनाची कामे पूर्णत: कोलमडून पडल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. सतीश हाडोळे यांनी सिंगल फेज फिडरवरुन थ्री फेजचा विज पुरवठा होत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे अंजनगाव तालुक्यातील ही समस्या दूर करण्याची मागणी केली. दरम्यान या संदर्भात महावितरणतर्फे येत्या चार दिवसात आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता ताकसांडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल, कार्यकारी अभियनता मोहोड व शेतकरी उपस्थिती होती.