शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

जिल्ह्यातील २५ फिडर झाले भारनियमनमुक्त

By admin | Updated: July 1, 2014 23:13 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच त्रस्त असताना वीज वितरण कंपनीच्या संदर्भातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मंगळवारी महावितरणचे मुख्य

अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच त्रस्त असताना वीज वितरण कंपनीच्या संदर्भातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मंगळवारी महावितरणचे मुख्य अभियंता ताकसांडे यांच्या उपस्थितीत जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या दालनात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील ३१ पैकी २५ सिंगल फेज फिडर भारनियमन मुक्त करण्यात आल्याची माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. पावसाने दडी मारल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून ओलिताची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणी असतानाही भारनियमनामुळे ओलिताची कामे करता येत नाही. अशातच विजेची संबंधित अनेक समस्यांना सध्या शेतकरी व नागरिक अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. भारनियमन व विजेच्या समस्येबाबत जि.प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करुन विजेच्या समस्या व भारनियमनावर तोडगा काढण्याची मागणी रेटून धरली होती. याची दखल घेत अमरावती जिल्ह्यातील ३१ पैकी २५ सिंगल फेज फिडर भारनियमनमुक्त झाले असून याच फिडरला जोडण्यात आले थ्री फेज वीज पुरवठा करणाऱ्या फिडरवर आता दिवसा आठ तास आणि रात्री १० याप्रमाणे वीज पुरवठा होणार असून आठवड्यातील तीन आणि चार दिवस याप्रमाणे वीज पुरवठा केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे सिंगल फेज फिडरवर २४ तास वीज पुरवठा होणार आहे. जि.प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी हा प्रश्न लावून धरल्यामुळे संपूर्ण राज्यात सिंगल फेज फिडर भारनियमन मुक्त करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यावेळी या बैठकीत चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी डीबी ट्रान्सफार्मर तसेच विजेच्या समस्या मांडून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. याशिवाय जि.प. सदस्य सदाशिव फडके यांनी मेळघाटातील भारनियमन व कमी दाबाचा वीज पुरवठा यामुळे पाणी पुरवठा व सिंचनाची कामे पूर्णत: कोलमडून पडल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. सतीश हाडोळे यांनी सिंगल फेज फिडरवरुन थ्री फेजचा विज पुरवठा होत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे अंजनगाव तालुक्यातील ही समस्या दूर करण्याची मागणी केली. दरम्यान या संदर्भात महावितरणतर्फे येत्या चार दिवसात आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता ताकसांडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल, कार्यकारी अभियनता मोहोड व शेतकरी उपस्थिती होती.