शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २५ फिडर झाले भारनियमनमुक्त

By admin | Updated: July 1, 2014 23:13 IST

जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच त्रस्त असताना वीज वितरण कंपनीच्या संदर्भातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मंगळवारी महावितरणचे मुख्य

अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच त्रस्त असताना वीज वितरण कंपनीच्या संदर्भातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मंगळवारी महावितरणचे मुख्य अभियंता ताकसांडे यांच्या उपस्थितीत जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांच्या दालनात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील ३१ पैकी २५ सिंगल फेज फिडर भारनियमन मुक्त करण्यात आल्याची माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. पावसाने दडी मारल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून ओलिताची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना पाणी असतानाही भारनियमनामुळे ओलिताची कामे करता येत नाही. अशातच विजेची संबंधित अनेक समस्यांना सध्या शेतकरी व नागरिक अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. भारनियमन व विजेच्या समस्येबाबत जि.प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करुन विजेच्या समस्या व भारनियमनावर तोडगा काढण्याची मागणी रेटून धरली होती. याची दखल घेत अमरावती जिल्ह्यातील ३१ पैकी २५ सिंगल फेज फिडर भारनियमनमुक्त झाले असून याच फिडरला जोडण्यात आले थ्री फेज वीज पुरवठा करणाऱ्या फिडरवर आता दिवसा आठ तास आणि रात्री १० याप्रमाणे वीज पुरवठा होणार असून आठवड्यातील तीन आणि चार दिवस याप्रमाणे वीज पुरवठा केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे सिंगल फेज फिडरवर २४ तास वीज पुरवठा होणार आहे. जि.प. अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांनी हा प्रश्न लावून धरल्यामुळे संपूर्ण राज्यात सिंगल फेज फिडर भारनियमन मुक्त करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यावेळी या बैठकीत चांदूरबाजार तालुक्यातील शेतकऱ्यांनी डीबी ट्रान्सफार्मर तसेच विजेच्या समस्या मांडून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. याशिवाय जि.प. सदस्य सदाशिव फडके यांनी मेळघाटातील भारनियमन व कमी दाबाचा वीज पुरवठा यामुळे पाणी पुरवठा व सिंचनाची कामे पूर्णत: कोलमडून पडल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. सतीश हाडोळे यांनी सिंगल फेज फिडरवरुन थ्री फेजचा विज पुरवठा होत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे अंजनगाव तालुक्यातील ही समस्या दूर करण्याची मागणी केली. दरम्यान या संदर्भात महावितरणतर्फे येत्या चार दिवसात आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता ताकसांडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल, कार्यकारी अभियनता मोहोड व शेतकरी उपस्थिती होती.