शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठा

By admin | Updated: June 29, 2014 23:42 IST

ग्रामीण भागातील गावे वाड्या वस्त्यांना कृषी वाहिन्यांच्या नव्या निकषानुसार २४ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. अकृषिक वीज हानी ४५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर अखंडित वीजपुरवठा केला

अमरावती : ग्रामीण भागातील गावे वाड्या वस्त्यांना कृषी वाहिन्यांच्या नव्या निकषानुसार २४ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. अकृषिक वीज हानी ४५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर अखंडित वीजपुरवठा केला जाणार असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यभरातील विविध गावे, वाड्या-वस्त्यांना कृषी वाहिनीच्या विलिकरणातून स्पेशल डिझाईन वितरण रोहीत्र तसेच सिंगल फेजिंगच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. या कृषी वाहिन्यांवरुन शेतीपंपांना दिवसा आठ तास आणि रात्री १० तास असा फेरबदलाने वीज पुरवठा करण्यात येत आहे. या वाहिन्यांवरील कृषिपंप तसेच गावे, वाड्या-वस्त्यांच्या अकृषिक वसुलीच्या एकत्रित हानीनुसार सहा तासापर्यंत भारनियमन केले जात होते. ग्रामीण भागात वीज हानीच्या अ ते फ गटानुसार भारनियमन करण्यासाठी कृषीऐवजी केवळ अकृषिक वसुली हानीचा निकष लावण्यात येणार आहे. या गावांमध्ये अकृषिक हानी ४५ तासांपेक्षा कमी असेल तर २४ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. अकृषिक वीजहानी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर नियमानुसार त्या गटात वेळापत्रकानुसार भारनियमन केले जाणार आहे. तसेच कृषिपंपांना सद्यस्थितीत होणारा वीज पुरवठ्याचा कालावधी यापुढे मात्र कायम राहणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने यावेळी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)