शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पीक डोलणार, चेहरा खुलणार; २२८ गावे होणार ‘जलयुक्त’

By जितेंद्र दखने | Updated: April 27, 2023 18:49 IST

जिल्हास्तरीय समितीची हिरवी झेंडी : गावनिहाय गरजेनुसार कामे घेण्याच्या सूचना

जितेंद्र दखने, अमरावती : शासनाचे महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन मध्ये प्रस्तावित केलेल्या जिल्ह्यातील २२८ गावे जलयुक्त शिवाय योजनेतून पाणीदार होणार आहेत. नुकतीच संबंधित गावांना जिल्हास्तरीय समितीने हिरवी झेंडी दिली. त्यामुळे वरिष्ठस्तरावरून अंतिम मान्यता मिळताच गावनिहाय गरजेनुसार कामेही ठरविली जाणार आहेत.

जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन राबविण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करून हे काम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जलयुक्त शिवार अभियान टप्पा-२ राबविण्यासाठी तालुक्यातील सर्व विभागांच्या समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावामध्ये मृदा आणि जलसंधारणची कामे करण्यात येणार आहे. शिवारफेरी, जलसाक्षरता, लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी तालुकानिहाय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

तालुकास्तरावर कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता (पाणीपुरवठा व जलसंपदा) उपविभागीय जलसंधारण अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण आदींची तालुका समिती राहणार आहे. ही समिती स्थापन करून जलयुक्त शिवार टप्पा-२ अभियानाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक गाव आराखडा तयार केला जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत २२८ निवड केलेल्या गावाचा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार योजना राबविली जाणार आहे.

तालुकानिहाय प्रस्तावित गावांची संख्या

मोर्शी १७, वरूड १७, धारणी १७, चिखलदरा १७, चांदूर बाजार १७, अचलपूर १७, दर्यापूर १२, अंजनगाव सुजी १७, भातकुली १२, नांदगाव खंडेश्वर १७, चांदूर रेल्वे १७, धामणगाव रेल्वे १७, तिवसा १७, अमरावती १७ या प्रमाणे २२८ गावे जिल्हास्तरीय समितीने प्रस्तावित केलेली आहेत.जलयुक्त शिवाय योजनेच्या टप्पा-२ मध्ये २२८ गावे प्रस्तावित केलेली आहे. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. याला मान्यता मिळताच वरिष्ठाच्या मार्गदर्शनाने समन्वयातून विविध कामे केली जाणार आहेत. - दिलीप निपाणे, कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभाग.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amravatiअमरावती