शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पीक डोलणार, चेहरा खुलणार; २२८ गावे होणार ‘जलयुक्त’

By जितेंद्र दखने | Updated: April 27, 2023 18:49 IST

जिल्हास्तरीय समितीची हिरवी झेंडी : गावनिहाय गरजेनुसार कामे घेण्याच्या सूचना

जितेंद्र दखने, अमरावती : शासनाचे महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन मध्ये प्रस्तावित केलेल्या जिल्ह्यातील २२८ गावे जलयुक्त शिवाय योजनेतून पाणीदार होणार आहेत. नुकतीच संबंधित गावांना जिल्हास्तरीय समितीने हिरवी झेंडी दिली. त्यामुळे वरिष्ठस्तरावरून अंतिम मान्यता मिळताच गावनिहाय गरजेनुसार कामेही ठरविली जाणार आहेत.

जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन राबविण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करून हे काम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जलयुक्त शिवार अभियान टप्पा-२ राबविण्यासाठी तालुक्यातील सर्व विभागांच्या समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावामध्ये मृदा आणि जलसंधारणची कामे करण्यात येणार आहे. शिवारफेरी, जलसाक्षरता, लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी तालुकानिहाय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

तालुकास्तरावर कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता (पाणीपुरवठा व जलसंपदा) उपविभागीय जलसंधारण अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण आदींची तालुका समिती राहणार आहे. ही समिती स्थापन करून जलयुक्त शिवार टप्पा-२ अभियानाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक गाव आराखडा तयार केला जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत २२८ निवड केलेल्या गावाचा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठविण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार योजना राबविली जाणार आहे.

तालुकानिहाय प्रस्तावित गावांची संख्या

मोर्शी १७, वरूड १७, धारणी १७, चिखलदरा १७, चांदूर बाजार १७, अचलपूर १७, दर्यापूर १२, अंजनगाव सुजी १७, भातकुली १२, नांदगाव खंडेश्वर १७, चांदूर रेल्वे १७, धामणगाव रेल्वे १७, तिवसा १७, अमरावती १७ या प्रमाणे २२८ गावे जिल्हास्तरीय समितीने प्रस्तावित केलेली आहेत.जलयुक्त शिवाय योजनेच्या टप्पा-२ मध्ये २२८ गावे प्रस्तावित केलेली आहे. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. याला मान्यता मिळताच वरिष्ठाच्या मार्गदर्शनाने समन्वयातून विविध कामे केली जाणार आहेत. - दिलीप निपाणे, कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभाग.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amravatiअमरावती