शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

२२ हजार शेतकऱ्यांना कापूस खरेदीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवातीपासूनच अतिशय संथ गती होती. कधी जीनची नसलेली उपलब्धता, ग्रेडरची कमी संख्या, शासनाची कापूस खरेदी करण्याची अनास्था यामुळे कापूस खरेदी कोरोनाआधीसुद्धा अतिशय कमी प्रमाणात झाली. कोरोनाच्या आधी अमरावती विभागात २ लाख ५ हजार ८७ शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाने खरेदी केला.

ठळक मुद्देभावांतर योजना लागू करण्याची मागणी : नोंदणी रखडल्याने सुलतानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/जरूड : ‘वऱ्हाड अन् सोन्याची कुऱ्हाड’ म्हणून नावलौकिक असणाºया पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आजमितीस ऑनलाईन नोंदणी केलेल्या २२ हजार २०२ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी अद्याप झालेली नाही. या कापसाच्या वाती करायच्या का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवातीपासूनच अतिशय संथ गती होती. कधी जीनची नसलेली उपलब्धता, ग्रेडरची कमी संख्या, शासनाची कापूस खरेदी करण्याची अनास्था यामुळे कापूस खरेदी कोरोनाआधीसुद्धा अतिशय कमी प्रमाणात झाली. कोरोनाच्या आधी अमरावती विभागात २ लाख ५ हजार ८७ शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाने खरेदी केला. कोरोनाचे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता सांगण्यात आले. १ लाख २८ हजार २७८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. पैकी ८६ हजार ३८० शेतकऱ्यांची कापूस खरेदी होणे शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात २२ हजार २०२, अकोला जिल्ह्यात १९ हजार १७, वाशीम जिल्ह्यात ३ हजार ३५२, यवतमाळ जिल्ह्यामध्ये १५ हजार ४५३, बुलडाणा जिल्ह्यात २६ हजार ३५६ शेतकऱ्यांचा कापूस घरात पडलेला आहे.अमरावती विभागात ९८ जिनिंग प्रेसिंग आहेत. परंतु ग्रेडरची संख्या फक्त ७९ आहे. त्यामुळे आठवड्यातील ५ दिवस फक्त ७९ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू असते. प्रत्येक केंद्रावर रोज ५० शेतकऱ्यांना बोलावले जातात. सर्व केंद्रांनी या गतीने काम केल्यास ३ हजार १५० शेतकऱ्यांचा कापूस मोजला जातो. ८६ हजार शेतकऱ्यांचा कापूस मोजण्यास किमान १ महिना लागणार आहे. सर्व केंद्र अव्याहतपणे सुरु राहिले तरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कापूस खरेदी आटोक्यात येणे या गतीने शक्य नाही. याशिवाय अनेक शेतकऱ्यांची कापसाची ऑनलाईन विक्रीकरिता नोंदणी व्हायची आहे. त्यांना ऑनलाईन नोंदणीकरिता अजून ५ दिवस देण्यात यावे, अशी मागणी आहे.कशाचे नगदी पीक?बाजारातील सद्यस्थिती अतिशय भीषण आहे. खासगी व्यापारी कापूस विकत घ्यायला तयार नाही. खासगी व्यापारी चांगल्या कापसाला ४००० ते ४१०० रुपये भाव देतात. शासकीय खरेदी केंद्राने नाकारलेला कापूस फक्त ३००० रूपये प्रतिक्विंटलनेखरेदी केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांना कापूस विकला तरी शेतकऱ्याला किमान १५०० रूपये प्रतीक्विंटल तोटा होतो. त्यामुळे नगदी पैसे देणारे कापसाचे पीक पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवाशी आले आहे.

टॅग्स :agricultureशेती