शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
2
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
3
IndiGo Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
4
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
5
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
6
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
7
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
8
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
9
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
10
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
11
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
12
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
13
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
14
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
15
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
16
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
17
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
19
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
20
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?

२२ हजार शेतकऱ्यांना कापूस खरेदीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवातीपासूनच अतिशय संथ गती होती. कधी जीनची नसलेली उपलब्धता, ग्रेडरची कमी संख्या, शासनाची कापूस खरेदी करण्याची अनास्था यामुळे कापूस खरेदी कोरोनाआधीसुद्धा अतिशय कमी प्रमाणात झाली. कोरोनाच्या आधी अमरावती विभागात २ लाख ५ हजार ८७ शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाने खरेदी केला.

ठळक मुद्देभावांतर योजना लागू करण्याची मागणी : नोंदणी रखडल्याने सुलतानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/जरूड : ‘वऱ्हाड अन् सोन्याची कुऱ्हाड’ म्हणून नावलौकिक असणाºया पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आजमितीस ऑनलाईन नोंदणी केलेल्या २२ हजार २०२ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी अद्याप झालेली नाही. या कापसाच्या वाती करायच्या का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवातीपासूनच अतिशय संथ गती होती. कधी जीनची नसलेली उपलब्धता, ग्रेडरची कमी संख्या, शासनाची कापूस खरेदी करण्याची अनास्था यामुळे कापूस खरेदी कोरोनाआधीसुद्धा अतिशय कमी प्रमाणात झाली. कोरोनाच्या आधी अमरावती विभागात २ लाख ५ हजार ८७ शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाने खरेदी केला. कोरोनाचे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता सांगण्यात आले. १ लाख २८ हजार २७८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. पैकी ८६ हजार ३८० शेतकऱ्यांची कापूस खरेदी होणे शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात २२ हजार २०२, अकोला जिल्ह्यात १९ हजार १७, वाशीम जिल्ह्यात ३ हजार ३५२, यवतमाळ जिल्ह्यामध्ये १५ हजार ४५३, बुलडाणा जिल्ह्यात २६ हजार ३५६ शेतकऱ्यांचा कापूस घरात पडलेला आहे.अमरावती विभागात ९८ जिनिंग प्रेसिंग आहेत. परंतु ग्रेडरची संख्या फक्त ७९ आहे. त्यामुळे आठवड्यातील ५ दिवस फक्त ७९ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू असते. प्रत्येक केंद्रावर रोज ५० शेतकऱ्यांना बोलावले जातात. सर्व केंद्रांनी या गतीने काम केल्यास ३ हजार १५० शेतकऱ्यांचा कापूस मोजला जातो. ८६ हजार शेतकऱ्यांचा कापूस मोजण्यास किमान १ महिना लागणार आहे. सर्व केंद्र अव्याहतपणे सुरु राहिले तरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कापूस खरेदी आटोक्यात येणे या गतीने शक्य नाही. याशिवाय अनेक शेतकऱ्यांची कापसाची ऑनलाईन विक्रीकरिता नोंदणी व्हायची आहे. त्यांना ऑनलाईन नोंदणीकरिता अजून ५ दिवस देण्यात यावे, अशी मागणी आहे.कशाचे नगदी पीक?बाजारातील सद्यस्थिती अतिशय भीषण आहे. खासगी व्यापारी कापूस विकत घ्यायला तयार नाही. खासगी व्यापारी चांगल्या कापसाला ४००० ते ४१०० रुपये भाव देतात. शासकीय खरेदी केंद्राने नाकारलेला कापूस फक्त ३००० रूपये प्रतिक्विंटलनेखरेदी केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांना कापूस विकला तरी शेतकऱ्याला किमान १५०० रूपये प्रतीक्विंटल तोटा होतो. त्यामुळे नगदी पैसे देणारे कापसाचे पीक पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवाशी आले आहे.

टॅग्स :agricultureशेती