शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार शेतकऱ्यांना कापूस खरेदीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवातीपासूनच अतिशय संथ गती होती. कधी जीनची नसलेली उपलब्धता, ग्रेडरची कमी संख्या, शासनाची कापूस खरेदी करण्याची अनास्था यामुळे कापूस खरेदी कोरोनाआधीसुद्धा अतिशय कमी प्रमाणात झाली. कोरोनाच्या आधी अमरावती विभागात २ लाख ५ हजार ८७ शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाने खरेदी केला.

ठळक मुद्देभावांतर योजना लागू करण्याची मागणी : नोंदणी रखडल्याने सुलतानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/जरूड : ‘वऱ्हाड अन् सोन्याची कुऱ्हाड’ म्हणून नावलौकिक असणाºया पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आजमितीस ऑनलाईन नोंदणी केलेल्या २२ हजार २०२ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी अद्याप झालेली नाही. या कापसाच्या वाती करायच्या का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवातीपासूनच अतिशय संथ गती होती. कधी जीनची नसलेली उपलब्धता, ग्रेडरची कमी संख्या, शासनाची कापूस खरेदी करण्याची अनास्था यामुळे कापूस खरेदी कोरोनाआधीसुद्धा अतिशय कमी प्रमाणात झाली. कोरोनाच्या आधी अमरावती विभागात २ लाख ५ हजार ८७ शेतकऱ्यांचा कापूस पणन महासंघाने खरेदी केला. कोरोनाचे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता सांगण्यात आले. १ लाख २८ हजार २७८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. पैकी ८६ हजार ३८० शेतकऱ्यांची कापूस खरेदी होणे शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यात २२ हजार २०२, अकोला जिल्ह्यात १९ हजार १७, वाशीम जिल्ह्यात ३ हजार ३५२, यवतमाळ जिल्ह्यामध्ये १५ हजार ४५३, बुलडाणा जिल्ह्यात २६ हजार ३५६ शेतकऱ्यांचा कापूस घरात पडलेला आहे.अमरावती विभागात ९८ जिनिंग प्रेसिंग आहेत. परंतु ग्रेडरची संख्या फक्त ७९ आहे. त्यामुळे आठवड्यातील ५ दिवस फक्त ७९ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू असते. प्रत्येक केंद्रावर रोज ५० शेतकऱ्यांना बोलावले जातात. सर्व केंद्रांनी या गतीने काम केल्यास ३ हजार १५० शेतकऱ्यांचा कापूस मोजला जातो. ८६ हजार शेतकऱ्यांचा कापूस मोजण्यास किमान १ महिना लागणार आहे. सर्व केंद्र अव्याहतपणे सुरु राहिले तरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कापूस खरेदी आटोक्यात येणे या गतीने शक्य नाही. याशिवाय अनेक शेतकऱ्यांची कापसाची ऑनलाईन विक्रीकरिता नोंदणी व्हायची आहे. त्यांना ऑनलाईन नोंदणीकरिता अजून ५ दिवस देण्यात यावे, अशी मागणी आहे.कशाचे नगदी पीक?बाजारातील सद्यस्थिती अतिशय भीषण आहे. खासगी व्यापारी कापूस विकत घ्यायला तयार नाही. खासगी व्यापारी चांगल्या कापसाला ४००० ते ४१०० रुपये भाव देतात. शासकीय खरेदी केंद्राने नाकारलेला कापूस फक्त ३००० रूपये प्रतिक्विंटलनेखरेदी केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांना कापूस विकला तरी शेतकऱ्याला किमान १५०० रूपये प्रतीक्विंटल तोटा होतो. त्यामुळे नगदी पैसे देणारे कापसाचे पीक पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवाशी आले आहे.

टॅग्स :agricultureशेती