शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

पशू नोंदणीसाठी २२ जुलैची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:06 IST

महापालिकेतर्फे चतुष्पाद पशुंची नोंदणी केली जात असून पशूधारकांनी त्यांच्याकडील पशूंची २२ जुलैपर्यंत अधिकृत नोंदणी करून परवाना प्राप्त करावा,....

महापालिका सख्त : परवाना बंधनकारक, पशुशल्य विभागाकडे जबाबदारीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतर्फे चतुष्पाद पशुंची नोंदणी केली जात असून पशूधारकांनी त्यांच्याकडील पशूंची २२ जुलैपर्यंत अधिकृत नोंदणी करून परवाना प्राप्त करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केले आहे. महापालिका क्षेत्रात जनावरे पाळण्यासाठी आयुक्तांची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे.२२ जुलैपर्यंत जे पशूधारक त्यांचेकडील पशूंची महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाकडे नोंदणी करणार नाहीत त्यांचेवर कारवाईची दंडुका उगारण्यात येईल. ती कारवाई नेमकी कशा प्रकारची असेल त्यावर महापालिका स्तरावर मंथन सुरू आहे. आमसभेत भटक्या श्वान आणि वराहांवर रणकंदन झाल्याच्या पार्श्वभूमिवर पशूपालकांना त्यांचेकडील पशूंची नोंदणी महापालिकेत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यासाठी एक महन्यिाचा कालावधी देण्यात आला होता.ती मुदत २२ जुलैला संपुष्टात येत आहे.आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय किंवा परवानगीतील अटींची भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शहराच्या कोणत्याही भागात कोणतेही डुक्कर, घोडे, गुरेढोरे, बकऱ्या, मेंढ्या, गाढवे अशी चतुष्पाद जनावरे आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय पाळता येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्वये जनावरे पाळणे आणि मारून टाकणे यासंदर्भात नियम तयार करण्यात आले आहेत. नियम २२ नुसार जनावरे पाळण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे व त्या अनुषंगाने असणाऱ्या कायदेशीर तरतुदीस अधीन राहून आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार कोणत्याही जनावरास मलमूत्र, शेण, तबेल्यातील केरकचरा किंवा अन्य घाण पदार्थ खाऊ घालता कामा नये, उपद्रव होईल किंवा धोका पोहचेल, अशा रितीने स्वत:च्या जागेत कोणतेही जनावर किंवा पक्षी पाळता येणार नाही. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यात आले आहे.आयुक्तांना जनावरांच्या संख्येची मर्यादा अंतर्भूत करता येणार आहे. कोणत्याही जागेत जनावरे पाळणे उपद्रवकारक आहे. वा स्वच्छतेच्या कारणावरून नुतनीकरण व परवानगी नाकारण्याचे अधिकार आयुक्तांना असतील. आयुक्तांचे मत त्यासंदर्भात अंतिम राहतील. भटक्या वराहांवर अंकुशकोणतेही वराह भटकताना आढळल्यास त्यास ताबडतोब मारून टाकता येईल आणि आयुक्तांच्या निर्देशाननुसार त्या वराहांच्या प्रेताची विल्हेवाट लावली जाईल. अशा रितीने मारलेल्या वराहांबाबत कुठलीही भरपाई मिळणार नाही. याशिवाय जी जनावरे पाळण्यासाठी आयुक्तांनी परवानगी दिली आहे अशा जनावरांना ‘बिल्ला’ लावल्या जाणार आहेवार्षिक शुल्क निश्चित महापालिका क्षेत्रात प्रत्येकी ५ बैल, वळू, म्हैस, घोडा आणि गाय बाळगणाऱ्या पशूपालकांकडून २५० रुपये परवाना शुल्क घेतले जात आहे. त्यापेक्षा अधिक जनावरे बाळगल्यास प्रतिजनावर ५० रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहे. प्रत्यकी १० शेळी, मेंढी आणि वराह बाळगणाऱ्यांकडून २५० रुपये, त्यापेक्षा अधिक जनावरे बाळेल्यास प्रतिजनावर २५ रुपये अतिरिक्त आणि २ पाळीव श्वान बाळगणाऱ्यांकडून २५० रुपये आणि अतिरिक्त श्वान पाळल्यास प्रतिश्वान १२५ रुपये आकारले जाणार आहेत. या परवानाचा कालावधी १ एप्रिल ते ३१ मार्च असा राहील.