शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

वनकर्मचारी, अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत २२ हल्ले

By admin | Updated: October 14, 2015 00:18 IST

राज्यातील २७ वनविभागांसह जिल्ह्यातील वनक्षेत्र चराई जमाबंदी असताना आजपर्यंत झालेल्या वादात जिल्ह्यातील २२ वनकर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत प्राणघातक हल्ले झाल्याची...

वनसंपदा धोक्यात : चराईमुळे होते वनौषधी नष्टमोहन राऊत अमरावतीराज्यातील २७ वनविभागांसह जिल्ह्यातील वनक्षेत्र चराई जमाबंदी असताना आजपर्यंत झालेल्या वादात जिल्ह्यातील २२ वनकर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस रेकॉर्डमधून बाहेर आली आहे़ आम्हाला न्याय हवा, अशी मागणी वनकर्मचाऱ्यांनी केली आहे़जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्र वगळता अमरावती वनविभागात ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे़ वडाळी, मोर्शी, चांदूररेल्वे, परतवाडा व वरूड हे तालुके या क्षेत्रात आहेत़ मौल्यवान सागवान, खेर, साजड, अंजन, सालई, अन्नपूर्णा तसेच वनौषधी म्हणून बीबा, चारोळी, व अनेक वनऔषधी आहेत़ २०० प्रकारच्या पक्षाच्या प्रजाती असून वड, पिंपळ , उंबर, यावर हे पक्षी वास्तव्य करतात़ परंतू आज या पक्षांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे़चारईत वनऔषधी होतेय नष्टमागील अनेक वर्षा पासून या वनक्षेत्रात चराई चे प्रकार वाढले आहेत़ चराई होत असल्यामुळे नवीन वनस्पती उगवनीचे प्रमाण पुर्णत: थांबले आहेत़ या जंगलातील वनसंपदा धोक्यात आली आहे़ मारर्व्हेल, गोंडवेल, मोतीतुरा अशा प्रकारच्या गवताच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत़ या जाती वाचविण्यासाठी प्रशासनाने आता वरिष्ठ स्तरावर पावले उचलणे गरजेचे आहे़ अन्यथा दुर्मिळ वनौषधी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.वनकर्मचारी व अधिकारी अडचणीत या जंगलाचे सरंक्षण करीत असतांना मेंढपाळ व वनकर्मचाऱ्यात अनेकदा संघर्षाचे प्रकार घडले आहे़ यात वनकर्मचारी व अधिकारी यांच्यावर अधीक हल्ले झाले असल्याची माहिती पोलीस दप्तरी आहेत़या प्रशासकीय यंत्रणेलाच धारेवर धरण्याचा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे़जमा बंदी क्षेत्राचे कसे होणार रक्षणराज्य शासनाने ४८ वनविभागात चराई जमाबंदी चे आदेश ६ मे २००८ रोजी दिलेत अमरावती जिल्ह्यातील पश्चिम मेळघाट, पूर्व मेळघाट व अमरावती वनविभागाचा समावेश आहे़ या भागातील चराई थांबणे गरजेचे आहे़ संबधीत भागाचे रक्षण करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना जीव मुठीत घेवून रक्षण करण्याची पाळी आली आहे़आम्हाला कधी मिळणार न्याय?मागील अनेक पिढ्यांपासून मेंढ्या पाळणे आमचा व्यवसाय आहे़ त्यामुळे संसाराचा गाडा चालतोय आम्ही कोणत्याही वनक्षेत्रात मेंढ्या चारण्याचे काम करीत नसतांना आमच्यावर अनेक खोटे आरोप केल्या जाते़ खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होतो़ आम्ही जायचे तरी कुठे, आम्हाला कधी न्याय मिळणार असा सवाल अनेक मेंढपाळांनी निर्माण केला आहे़