शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचारी, अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत २२ हल्ले

By admin | Updated: October 14, 2015 00:18 IST

राज्यातील २७ वनविभागांसह जिल्ह्यातील वनक्षेत्र चराई जमाबंदी असताना आजपर्यंत झालेल्या वादात जिल्ह्यातील २२ वनकर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत प्राणघातक हल्ले झाल्याची...

वनसंपदा धोक्यात : चराईमुळे होते वनौषधी नष्टमोहन राऊत अमरावतीराज्यातील २७ वनविभागांसह जिल्ह्यातील वनक्षेत्र चराई जमाबंदी असताना आजपर्यंत झालेल्या वादात जिल्ह्यातील २२ वनकर्मचारी व अधिकाऱ्यांवर सहा वर्षांत प्राणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस रेकॉर्डमधून बाहेर आली आहे़ आम्हाला न्याय हवा, अशी मागणी वनकर्मचाऱ्यांनी केली आहे़जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्र वगळता अमरावती वनविभागात ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे़ वडाळी, मोर्शी, चांदूररेल्वे, परतवाडा व वरूड हे तालुके या क्षेत्रात आहेत़ मौल्यवान सागवान, खेर, साजड, अंजन, सालई, अन्नपूर्णा तसेच वनौषधी म्हणून बीबा, चारोळी, व अनेक वनऔषधी आहेत़ २०० प्रकारच्या पक्षाच्या प्रजाती असून वड, पिंपळ , उंबर, यावर हे पक्षी वास्तव्य करतात़ परंतू आज या पक्षांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे़चारईत वनऔषधी होतेय नष्टमागील अनेक वर्षा पासून या वनक्षेत्रात चराई चे प्रकार वाढले आहेत़ चराई होत असल्यामुळे नवीन वनस्पती उगवनीचे प्रमाण पुर्णत: थांबले आहेत़ या जंगलातील वनसंपदा धोक्यात आली आहे़ मारर्व्हेल, गोंडवेल, मोतीतुरा अशा प्रकारच्या गवताच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत़ या जाती वाचविण्यासाठी प्रशासनाने आता वरिष्ठ स्तरावर पावले उचलणे गरजेचे आहे़ अन्यथा दुर्मिळ वनौषधी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही.वनकर्मचारी व अधिकारी अडचणीत या जंगलाचे सरंक्षण करीत असतांना मेंढपाळ व वनकर्मचाऱ्यात अनेकदा संघर्षाचे प्रकार घडले आहे़ यात वनकर्मचारी व अधिकारी यांच्यावर अधीक हल्ले झाले असल्याची माहिती पोलीस दप्तरी आहेत़या प्रशासकीय यंत्रणेलाच धारेवर धरण्याचा प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहे़जमा बंदी क्षेत्राचे कसे होणार रक्षणराज्य शासनाने ४८ वनविभागात चराई जमाबंदी चे आदेश ६ मे २००८ रोजी दिलेत अमरावती जिल्ह्यातील पश्चिम मेळघाट, पूर्व मेळघाट व अमरावती वनविभागाचा समावेश आहे़ या भागातील चराई थांबणे गरजेचे आहे़ संबधीत भागाचे रक्षण करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना जीव मुठीत घेवून रक्षण करण्याची पाळी आली आहे़आम्हाला कधी मिळणार न्याय?मागील अनेक पिढ्यांपासून मेंढ्या पाळणे आमचा व्यवसाय आहे़ त्यामुळे संसाराचा गाडा चालतोय आम्ही कोणत्याही वनक्षेत्रात मेंढ्या चारण्याचे काम करीत नसतांना आमच्यावर अनेक खोटे आरोप केल्या जाते़ खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न होतो़ आम्ही जायचे तरी कुठे, आम्हाला कधी न्याय मिळणार असा सवाल अनेक मेंढपाळांनी निर्माण केला आहे़