शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

२,१४५ कोटी पीककर्जाचे ‘लक्ष्य’

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

जिल्ह्यासाठी सन २०१६-१७ करिता ३ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

२ लाख ९७ हजार शेतकरी खातेदार : जून २०१६ पर्यंत वाटपाचे शासनाचे निर्देश, सहा कर्ज मेळावे घेण्याच्या सूचनागजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यासाठी सन २०१६-१७ करिता ३ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी २ लाख ९६ हजार ९९९ शेतकऱ्यांना १ हजार ७५९ कोटी ४५ लाख रुपये पीककर्ज वाटपाची प्राथमिकता ठेवण्यात आली आहे. याच आराखड्यात रबी हंगामासाठी ३८६ कोटी २२ लाख २४ हजार रूपये पीककर्ज वाटपाची तरतूद करण्यात आली आहे, असे एकूण २ हजार १४५ कोटी ६८ लाखांचे पीककर्ज दोन्ही हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे. सततची नापिकी, दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहेत. मागील वर्षीच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असले तरी यंदाच्या खरिपाच्या हंगामात बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. शासनाने जिल्ह्यात २३ मार्च रोजी दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. दाही दिशेने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी वेळीच पीककर्ज दिल्यास खरीप हंगामाची तयारी करूशकणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १९ मार्च रोजी जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्याची बैठक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तर बॅँकांचे अधिकारी व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळा ८ व ९ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळीच अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासन गंभीर आहे. मागील वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ हजार ६९५ कोटी ४४ लाखांच्या खरीप पीककर्जाचे व ३६७ कोटी ७५ लाखांच्या रबी पीककर्जाचे उद्दिष्ट होते. यापैकी ३१ मार्च २०१५ अखेर खरिपाला १ हजार ३७१ कोटी ५० लाख व रबीला ६५ कोटी ९६ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. वाटपाची टक्केवारी ६९ टक्के आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने २ लाख ९६ हजार ९९९ शेतकऱ्यांना खरिपासाठी १७५९ कोटी ४५ लाख ७६ हजारांचे व रबीसाठी ३८६ कोटी २२ लाख २४ हजारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बॅँकांनी एप्रिल २०१६ पासून खरीप पीककर्ज वाटपाची सुरूवात करावी. हा लक्ष्यांक ३० जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.पीककर्जवाटपासाठी ३० जून ‘डेडलाईन’ बॅँकांनी एप्रिल २०१६ च्या पहिल्या आठवड्यापासून पीककर्ज वाटपास सुरुवात करावी. त्यासाठी बॅँकांना जून २०१६ पर्यंत प्रत्येक महिन्याला दोन याप्रमाणे सहा पीककर्ज मेळावे घेऊन पीककर्ज वाटपाची प्र्रक्रिया ३० जूनपर्यंत पूर्ण करावी. महसूल विभागाच्यावतीने महाराजस्व अभियानात मेळावे घेऊन पीककर्ज वाटप करावे, या कामात हलगर्जीपणा केल्यास प्रत्येक शाखा व्यवस्थापकास व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ठणकावून सांगितले आहे. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी शेतकरी बॅँकेत येतो तेव्हा बॅँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटावे. शेतीसंबंधी योजना समजावून सांगाव्यात व त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, शेतकऱ्यांसाठी बँकाच्या प्रत्येक शाखेने मेळावे घ्यावेत व प्रसंगी महसूल विभागाची मदत घ्यावी, तसेच महाराजस्व अभियानात स्टॉल लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.