शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

२,१४५ कोटी पीककर्जाचे ‘लक्ष्य’

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

जिल्ह्यासाठी सन २०१६-१७ करिता ३ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

२ लाख ९७ हजार शेतकरी खातेदार : जून २०१६ पर्यंत वाटपाचे शासनाचे निर्देश, सहा कर्ज मेळावे घेण्याच्या सूचनागजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यासाठी सन २०१६-१७ करिता ३ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी २ लाख ९६ हजार ९९९ शेतकऱ्यांना १ हजार ७५९ कोटी ४५ लाख रुपये पीककर्ज वाटपाची प्राथमिकता ठेवण्यात आली आहे. याच आराखड्यात रबी हंगामासाठी ३८६ कोटी २२ लाख २४ हजार रूपये पीककर्ज वाटपाची तरतूद करण्यात आली आहे, असे एकूण २ हजार १४५ कोटी ६८ लाखांचे पीककर्ज दोन्ही हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे. सततची नापिकी, दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहेत. मागील वर्षीच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असले तरी यंदाच्या खरिपाच्या हंगामात बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. शासनाने जिल्ह्यात २३ मार्च रोजी दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. दाही दिशेने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी वेळीच पीककर्ज दिल्यास खरीप हंगामाची तयारी करूशकणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १९ मार्च रोजी जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्याची बैठक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तर बॅँकांचे अधिकारी व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळा ८ व ९ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळीच अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासन गंभीर आहे. मागील वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ हजार ६९५ कोटी ४४ लाखांच्या खरीप पीककर्जाचे व ३६७ कोटी ७५ लाखांच्या रबी पीककर्जाचे उद्दिष्ट होते. यापैकी ३१ मार्च २०१५ अखेर खरिपाला १ हजार ३७१ कोटी ५० लाख व रबीला ६५ कोटी ९६ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. वाटपाची टक्केवारी ६९ टक्के आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने २ लाख ९६ हजार ९९९ शेतकऱ्यांना खरिपासाठी १७५९ कोटी ४५ लाख ७६ हजारांचे व रबीसाठी ३८६ कोटी २२ लाख २४ हजारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बॅँकांनी एप्रिल २०१६ पासून खरीप पीककर्ज वाटपाची सुरूवात करावी. हा लक्ष्यांक ३० जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.पीककर्जवाटपासाठी ३० जून ‘डेडलाईन’ बॅँकांनी एप्रिल २०१६ च्या पहिल्या आठवड्यापासून पीककर्ज वाटपास सुरुवात करावी. त्यासाठी बॅँकांना जून २०१६ पर्यंत प्रत्येक महिन्याला दोन याप्रमाणे सहा पीककर्ज मेळावे घेऊन पीककर्ज वाटपाची प्र्रक्रिया ३० जूनपर्यंत पूर्ण करावी. महसूल विभागाच्यावतीने महाराजस्व अभियानात मेळावे घेऊन पीककर्ज वाटप करावे, या कामात हलगर्जीपणा केल्यास प्रत्येक शाखा व्यवस्थापकास व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ठणकावून सांगितले आहे. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी शेतकरी बॅँकेत येतो तेव्हा बॅँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटावे. शेतीसंबंधी योजना समजावून सांगाव्यात व त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, शेतकऱ्यांसाठी बँकाच्या प्रत्येक शाखेने मेळावे घ्यावेत व प्रसंगी महसूल विभागाची मदत घ्यावी, तसेच महाराजस्व अभियानात स्टॉल लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.