शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

खरीपासाठी २,१४५ कोटी पीक कर्ज

By admin | Updated: March 22, 2016 00:25 IST

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज वाटप व्हावे यासाठी वार्षिक प्रारुप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला आहे.

वार्षिक पतपुरवठा आराखडा : जून २०१६ पर्यंत पूर्ण कर्ज वाटपाचे निर्देश अमरावती : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज वाटप व्हावे यासाठी वार्षिक प्रारुप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी २ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना २ हजार १४५ कोटी रुपयांचे पिककर्ज वाटपाची प्राथमिकता ठेवण्यात आली आहे. बॅँकाद्वारा जून २०१६ पर्यंत संपूर्ण पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या पतपुरवठा आराखड्यात एकूण ३ हजार ४७८ कोटी ८२ लाखपैकी ३ हजार २९६ कोटी रुपये प्राथमिकता प्राप्त क्षेत्रासाठी ठेवण्यात आले आहे. यापैकी पिक कर्जासाठी २६ हजार १४५ कोटी ६८ लाख रुपए ठेवण्यात आले आहे. ही ६५ टक्केवारी आहे. कृषी मुदती कर्जासाठी ५३९ कोटी ३३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. ही १६ टक्केवारी आहे. बिगर शेतीकर्जासाठी २३४.३० कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. ही ७ टक्केवारी आहे. शैक्षणिक कर्जासाठी ४८ कोटी २४ लाख ठेवण्यात आले अहे. ही २ टक्केवारी आहे. गृहकर्जासाठी २४९ कोटी ९३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. ही टक्केवारी व इतर प्राथमिकता क्षेत्रासाठी ७९ कोटी २२ रुपये या आराखड्यात ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा अग्रणी बॅँक अधिकारी सुनील रामटेके यांनी दिली. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी शेतकरी बँकेत येतो. तेव्हा त्यांच्याशी बोला, त्यांना सन्मानाची वागणूक द्या. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक बॅँकेच्या शाखेने मेळावे घ्यावेत.या मेळाव्यात शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती द्यावी.महाराजस्व अभिानात बॅँकांनी स्टॉल लावावे व कर्जाविषयी माहिती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. सहा पीककर्ज मेळावे घेण्याचे निर्देश शेतकरी दुष्काळ अवकाळीच्या नुकसानीमुळे चिंतेत आहे. त्यांना तातडीने कर्ज पुरवठा केल्यास खरीप हंगामासाठी उपयुक्त होईल. यासाठी एप्रिल २०१६ च्या पहिल्या आठवड्यापासून कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात करावी व प्रत्येक महिन्यात दोन या प्रमाणे सहा कर्ज मेळावे द्यावेत व जून पर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.