शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

खरीपासाठी २,१४५ कोटी पीक कर्ज

By admin | Updated: March 22, 2016 00:25 IST

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज वाटप व्हावे यासाठी वार्षिक प्रारुप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला आहे.

वार्षिक पतपुरवठा आराखडा : जून २०१६ पर्यंत पूर्ण कर्ज वाटपाचे निर्देश अमरावती : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक कर्ज वाटप व्हावे यासाठी वार्षिक प्रारुप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी २ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना २ हजार १४५ कोटी रुपयांचे पिककर्ज वाटपाची प्राथमिकता ठेवण्यात आली आहे. बॅँकाद्वारा जून २०१६ पर्यंत संपूर्ण पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. या पतपुरवठा आराखड्यात एकूण ३ हजार ४७८ कोटी ८२ लाखपैकी ३ हजार २९६ कोटी रुपये प्राथमिकता प्राप्त क्षेत्रासाठी ठेवण्यात आले आहे. यापैकी पिक कर्जासाठी २६ हजार १४५ कोटी ६८ लाख रुपए ठेवण्यात आले आहे. ही ६५ टक्केवारी आहे. कृषी मुदती कर्जासाठी ५३९ कोटी ३३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. ही १६ टक्केवारी आहे. बिगर शेतीकर्जासाठी २३४.३० कोटी रुपये ठेवण्यात आले आहे. ही ७ टक्केवारी आहे. शैक्षणिक कर्जासाठी ४८ कोटी २४ लाख ठेवण्यात आले अहे. ही २ टक्केवारी आहे. गृहकर्जासाठी २४९ कोटी ९३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. ही टक्केवारी व इतर प्राथमिकता क्षेत्रासाठी ७९ कोटी २२ रुपये या आराखड्यात ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा अग्रणी बॅँक अधिकारी सुनील रामटेके यांनी दिली. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी शेतकरी बँकेत येतो. तेव्हा त्यांच्याशी बोला, त्यांना सन्मानाची वागणूक द्या. शेतकऱ्यांसाठी प्रत्येक बॅँकेच्या शाखेने मेळावे घ्यावेत.या मेळाव्यात शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती द्यावी.महाराजस्व अभिानात बॅँकांनी स्टॉल लावावे व कर्जाविषयी माहिती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. सहा पीककर्ज मेळावे घेण्याचे निर्देश शेतकरी दुष्काळ अवकाळीच्या नुकसानीमुळे चिंतेत आहे. त्यांना तातडीने कर्ज पुरवठा केल्यास खरीप हंगामासाठी उपयुक्त होईल. यासाठी एप्रिल २०१६ च्या पहिल्या आठवड्यापासून कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात करावी व प्रत्येक महिन्यात दोन या प्रमाणे सहा कर्ज मेळावे द्यावेत व जून पर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.