शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

स्मार्ट ग्राम योजनेसाठी २०९ ग्रापंची तपासणी

By admin | Updated: February 18, 2017 00:10 IST

लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेत जिल्ह्य़ातील सर्व ८३९ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

आचारसंहितेनंतर निकाल होणार जाहीर : योजनेत ८३९ ग्रा.पं.चा सहभागअमरावती : लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेत जिल्ह्य़ातील सर्व ८३९ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २५ टक्के म्हणजेच जवळपास २०९ ग्रामपंचायतींचे मूल्यमापन समितीने तपासणी करून पंचायत समितीकडे अहवाल सादर केला आहे.या अहवालाच्या आधारे तालुकास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींचा निकाल निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जास्तीत जास्त लोकसहभागातून गावकऱ्यांबरोबरच संबंधित पंचायतींना स्वयंपूर्ण करण्यासाठी इको व्हिलेज योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने स्मार्ट ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेत संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील गावांची सार्वजनिक स्वच्छता, गावाचा पाणीपुरवठा योजना, पाणी व्यवस्थापन, पंचायतींची विविध करांची वसुली, अंगणवाड्या, शाळांची सजावट, ग्रामसभा, ग्रामसभेतील विविध विकासात्मक ठराव, गावातील विकासाच्या योजना अशी वेगवेगळी उपक्रमे राबवायची आहेत. याशिवाय वृक्षारोपण, वृक्षसंगोपन या उपक्रमाचाही समावेश आहे. इको व्हिलेजच्या धर्तीवर ही योजना असली तरी इको व्हिलेज केवळ वृक्षारोपणातील मर्यादित आहे. तथापी या स्मार्ट ग्रामयोजनेत लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.गावांना मिळणार दहा लाखांचे बक्षीसग्रामीण खेडे स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यात पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतीला शासनातर्फे १० लाखांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. त्यासाठी निर्धारित केलेल्या १०० गुणांचे मूल्याकंन करण्यात आले. सुरूवातीला ग्रामपंचायत स्वत: गुणांचे मूल्यांकन त्यानंतर दुसऱ्या तालुक्यातील नेमलेली समिती मूल्यांकन करेल. जास्तीत जास्त गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत या पारितोषिकास पात्र ठरवून तिची जिल्हास्तरावर निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. गावांच्या विकासासाठी शासनाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असला तरी ही योजना प्रभावी व नियोजनबद्ध राबविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)स्मार्ट ग्राम योजनेच्या तपासणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण करण्यात आली आहे. त्यासंदर्भात पंचायत समितीकडे प्राप्त अहवाल जिल्हा परिषदेने मागविले आहेत. त्यानुसार योजनेचे अहवाल येत आहेत. त्यानंतर नियमानुसार योग्य कारवाई केली जाईल.- जे. एन.आभाळे, डेप्युटी सीईओ पंचायत विभाग