शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

स्मार्ट ग्राम योजनेसाठी २०९ ग्रापंची तपासणी

By admin | Updated: February 18, 2017 00:10 IST

लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेत जिल्ह्य़ातील सर्व ८३९ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

आचारसंहितेनंतर निकाल होणार जाहीर : योजनेत ८३९ ग्रा.पं.चा सहभागअमरावती : लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेत जिल्ह्य़ातील सर्व ८३९ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २५ टक्के म्हणजेच जवळपास २०९ ग्रामपंचायतींचे मूल्यमापन समितीने तपासणी करून पंचायत समितीकडे अहवाल सादर केला आहे.या अहवालाच्या आधारे तालुकास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींचा निकाल निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जास्तीत जास्त लोकसहभागातून गावकऱ्यांबरोबरच संबंधित पंचायतींना स्वयंपूर्ण करण्यासाठी इको व्हिलेज योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने स्मार्ट ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेत संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील गावांची सार्वजनिक स्वच्छता, गावाचा पाणीपुरवठा योजना, पाणी व्यवस्थापन, पंचायतींची विविध करांची वसुली, अंगणवाड्या, शाळांची सजावट, ग्रामसभा, ग्रामसभेतील विविध विकासात्मक ठराव, गावातील विकासाच्या योजना अशी वेगवेगळी उपक्रमे राबवायची आहेत. याशिवाय वृक्षारोपण, वृक्षसंगोपन या उपक्रमाचाही समावेश आहे. इको व्हिलेजच्या धर्तीवर ही योजना असली तरी इको व्हिलेज केवळ वृक्षारोपणातील मर्यादित आहे. तथापी या स्मार्ट ग्रामयोजनेत लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.गावांना मिळणार दहा लाखांचे बक्षीसग्रामीण खेडे स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यात पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतीला शासनातर्फे १० लाखांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. त्यासाठी निर्धारित केलेल्या १०० गुणांचे मूल्याकंन करण्यात आले. सुरूवातीला ग्रामपंचायत स्वत: गुणांचे मूल्यांकन त्यानंतर दुसऱ्या तालुक्यातील नेमलेली समिती मूल्यांकन करेल. जास्तीत जास्त गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत या पारितोषिकास पात्र ठरवून तिची जिल्हास्तरावर निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. गावांच्या विकासासाठी शासनाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असला तरी ही योजना प्रभावी व नियोजनबद्ध राबविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)स्मार्ट ग्राम योजनेच्या तपासणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण करण्यात आली आहे. त्यासंदर्भात पंचायत समितीकडे प्राप्त अहवाल जिल्हा परिषदेने मागविले आहेत. त्यानुसार योजनेचे अहवाल येत आहेत. त्यानंतर नियमानुसार योग्य कारवाई केली जाईल.- जे. एन.आभाळे, डेप्युटी सीईओ पंचायत विभाग