शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यात २० हजार कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:35 IST

अमरावती : जिल्ह्यात नोंद झालेल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताला सोमवारी १० महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत जिल्ह्यात १९ हजार ९३७ ...

अमरावती : जिल्ह्यात नोंद झालेल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताला सोमवारी १० महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत जिल्ह्यात १९ हजार ९३७ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. रोज सरासरी ६६ संक्रमितांची नोंद होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

येथील हाथीपुऱ्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती. हा रुग्ण ‘होमडेथ’ होता. कोरोना संशयित असल्याने आरोग्य विभागाने या रुग्णासह त्याच्या कुटुंबातील हायरिस्कमधील व्यक्तींचे नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठविले होते. यामध्ये चार नमुने पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात पहिले १०० रुग्णांची नोंद व्हायला ४० दिवस लागले. मात्र, त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढायला लागला. त्यानंतरच्या १३ दिवसात २९ मे रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या २०० वर पोहोचली. १९ जूनला ४०० रुग्णांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे.

यानंतर ११ जुलौ रोजी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८०० वर पोहोचला. केवळ २२ दिवसात रुग्णसंख्या दुप्पट झाली. यानंतर फक्त १३ दिवसात म्हणजेच २४ जुलै रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या १६०० वर पोहोचली. यानंतर १८ दिवसात १८ ऑगस्टला ३०० व ४ सप्टेंबरला ६,००० कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली. यापुढे २४ दिवसात म्हणजेच २५ सप्टेंबरला कोरोनाचे १२ हजार क्राॅस झाले. १५ ऑक्टोबरला १३,५०० क्राॅस, १ नोव्हेंबरला १५ हजार ३५७, १५ नोव्हेंबरला १६ हजार ९१७, १ डिसेंबरला १७ हजार ९२२ व आता ४ जानेवारीला १९ हजार ९३७ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे.

बॉक्स

रोज एक हजारावर चाचण्या

जिल्ह्यात सध्या ५५३ ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने प्रक्रियेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची याशिवाय उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी व एजंट यांची कोरोना चाचणी अनिवार्य आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात नमुने संकलित केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रोज एक ते दीड हजार नमुन्याची तपासणी विद्यापीठ लॅबद्वारे केली जात आहे.

बॉक्स

कोरोनाची जिल्ह्यात सद्यस्थिती

जिल्ह्यात सोमवारी ३६ पॉझिटिव्ह अहवालाची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९३७ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान बरे वाटल्याने सोमवारी ०००० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ०००० झालेली आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९६.३३ टक्के असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.