शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

१० महिन्यात २० हजार कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:35 IST

अमरावती : जिल्ह्यात नोंद झालेल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताला सोमवारी १० महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत जिल्ह्यात १९ हजार ९३७ ...

अमरावती : जिल्ह्यात नोंद झालेल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताला सोमवारी १० महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत जिल्ह्यात १९ हजार ९३७ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. रोज सरासरी ६६ संक्रमितांची नोंद होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

येथील हाथीपुऱ्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती. हा रुग्ण ‘होमडेथ’ होता. कोरोना संशयित असल्याने आरोग्य विभागाने या रुग्णासह त्याच्या कुटुंबातील हायरिस्कमधील व्यक्तींचे नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठविले होते. यामध्ये चार नमुने पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात पहिले १०० रुग्णांची नोंद व्हायला ४० दिवस लागले. मात्र, त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढायला लागला. त्यानंतरच्या १३ दिवसात २९ मे रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या २०० वर पोहोचली. १९ जूनला ४०० रुग्णांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे.

यानंतर ११ जुलौ रोजी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८०० वर पोहोचला. केवळ २२ दिवसात रुग्णसंख्या दुप्पट झाली. यानंतर फक्त १३ दिवसात म्हणजेच २४ जुलै रोजी कोरोनाग्रस्तांची संख्या १६०० वर पोहोचली. यानंतर १८ दिवसात १८ ऑगस्टला ३०० व ४ सप्टेंबरला ६,००० कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली. यापुढे २४ दिवसात म्हणजेच २५ सप्टेंबरला कोरोनाचे १२ हजार क्राॅस झाले. १५ ऑक्टोबरला १३,५०० क्राॅस, १ नोव्हेंबरला १५ हजार ३५७, १५ नोव्हेंबरला १६ हजार ९१७, १ डिसेंबरला १७ हजार ९२२ व आता ४ जानेवारीला १९ हजार ९३७ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे.

बॉक्स

रोज एक हजारावर चाचण्या

जिल्ह्यात सध्या ५५३ ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने प्रक्रियेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची याशिवाय उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी व एजंट यांची कोरोना चाचणी अनिवार्य आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात नमुने संकलित केले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रोज एक ते दीड हजार नमुन्याची तपासणी विद्यापीठ लॅबद्वारे केली जात आहे.

बॉक्स

कोरोनाची जिल्ह्यात सद्यस्थिती

जिल्ह्यात सोमवारी ३६ पॉझिटिव्ह अहवालाची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९३७ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान बरे वाटल्याने सोमवारी ०००० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ०००० झालेली आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९६.३३ टक्के असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.