शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

२०० शेतकरी बांधावर विकताहेत भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:13 IST

फोटो पी २१ धामणगाव रेल्वे पान २ चे सेकंड लिड मोहन राऊत धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल ...

फोटो पी २१ धामणगाव रेल्वे

पान २ चे सेकंड लिड

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल भाजीपाला मार्केटमध्ये न नेता तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचेल, यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेत तालुक्यातील तब्बल दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी आपल्या शेतीच्या बांधावरच भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे.

दहा वर्षांपासून शेतकऱ्यांची अवस्था निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे दिवसेंदिवस बिघडत आहे. दरवेळी उत्पन्न कमी आणि खर्च अधिक ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकवलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागतो. व्यापारी भाजीपाला असो की संत्री, मोसंबी, शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी करून बाजारात अधिक भावाने ग्राहकाला विक्री करतो. त्यामुळे आता राज्य शासनाने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी शासनाने ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतमाल व भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करता येतो.

धामणगाव रेल्वे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संत सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत तालुक्यात प्रत्येकी ११ शेतकऱ्यांचे शंभर गट तयार करण्यात येत असून, या शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरच विक्री केंद्र उभारावे लागणार आहेत. ताजा भाजीपाला बांधावर मिळत असल्याने ग्राहकांनी या भाजीपाल्याला पहिली पसंती दाखवली आहे. देवगाव, जुना धामणगाव या भागात उभारलेल्या विक्री केंद्रावर ग्राहक स्वत:हून भाजीपाला खरेदी करीत आहेत.

कोट

शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. धामणगाव तालुक्यात ११०० शेतकरी या योजनेत जोडले गेले आहेत.

सागर इंगोले

तालुका कृषी अधिकारी, धामणगाव रेल्वे

कोट २

आम्ही सुरू केलेल्या विक्री केंद्रावर ग्राहक स्वत: येऊन ताजा भाजीपाला खरेदी करीत आहेत. या केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नीलेश तिंतुरकर, देवगाव

---------