शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार हेक्टर बाधित

By admin | Updated: March 2, 2016 00:48 IST

जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे १९ हजार ६०५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

गारपिटीचा तडाखा : तीन दिवसांतील नुकसान, बाधित क्षेत्र वाढणार अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे १९ हजार ६०५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी रात्रीपर्यंत सुरू असलेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यात १० हजार ५७७ हेक्टरमधील पिके नेस्तनाबूत झाली आहेत. रबीचा हंगाम संपताना आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे उद्ध्वस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रबी हंगामावर होती. सद्यस्थितीत जिल्ह्यात दीड लाख हेक्टरमधील रबीची पिकेसुस्थितीत असताना वादळी पाऊस व गारपिटीने ६ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रातील गहू, २ हजार ७४४ हेक्टरमधील हरभरा, १ हजार ५६७ हेक्टरमधील भाजीपाला, ८ हजार ९३ हेक्टरमधील फळपिके व १४० हेक्टरमधील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असलेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात ९ तालुक्यांमधील शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाच्या मदतीकडे डोळे लागले आहेत. ंअंतिम अहवालाची प्रतीक्षाअमरावती : यामध्ये अमरावती तालुक्यात १ हजार ५२७ हेक्टर, वरुड ३४ हेक्टर, चांदूरबाजार ३ हजार ८४४ हेक्टर, अचलपूर २ हजार १४३ हेक्टर, भातकुली १०७ हेक्टर, धामणगाव २ हजार ४७३ हेक्टर, चांदूररेलवे २८४ हेक्टर, तिवसा ८४ हेक्टर व चिखलदरा तालुक्यात ८० हेक्टर शेतीपिक व फळपिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे २३९ गावांमधील ६ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ४ हजार २३२ हेक्टरमधील गहू, १ हजार ६४७ हेक्टरमधील हरभरा, ५ हेक्टरमधील कपाशी, ४६२ हेक्टरमधील भाजीपाला, ३ हजार ९०१ हेक्टरमधील फळपिके व ४५ हेक्टरमधील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तीन दिवसांत चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक ११ हजार ४५२ हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक सर्वेक्षणाअंती १९ हजार ६०५ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अहवाल असला तरी अंतिम अहवालात गारपिटीच्या नुकसानीची क्षेत्रवाढ होणार आहे. (प्रतिनिधी)