शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मेळघाटातील ब्रिटिशकालीन २० पूल अत्यंत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:54 IST

Amravati News शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील मुख्य मार्गावरील ब्रिटिशकालीन ११८ पुलांपैकी २० पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरले आहेत.

ठळक मुद्देभूतखोरा पूल दुरुस्तीचे व्याघ्र प्रकल्पाला पत्रहरिसाल सेमाडोह दिया येथे नवीन पुलांची निर्मिती

नरेंद्र जावरे

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील मुख्य मार्गावरील ब्रिटिशकालीन ११८ पुलांपैकी २० पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरले आहेत. परतवाडा - इंदूर मार्गावरील सेमाडोहचा भुतखोरा पूल खचल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पूल दुरुस्तीसाठी व्याघ्र प्रकल्पाला गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या परवानगीचे पत्र दिले. चार नवीन पुलांच्या निर्मितीसह १६ पुलांची दुरुस्ती आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

मेळघाटात गुरुवारी पहाटे ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. सिपना, चंद्रभागा, शहानूर, खुर्शी आदी नद्यांना पूर आला. परिणामी अनेक ठिकाणी दरड कोसळल्या, रस्ते खरडून गेले. त्यातच मुख्य मार्गावरील पुलांनासुद्धा क्षती पोहोचली आहे. पूल दुरुस्तीसाठी सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षकांना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दुरुस्तीच्या परवानगी संदर्भात पत्र देण्यात आले आहे. मेळघाटातील विकासात्मक कामासाठी आता व्याघ्र प्रकल्पाची परवानगी गरजेची झाली आहे. सेमाडोह येथील भुतखोरा पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवास करताना दक्षता घेण्याचे फलक लावले आहेत. पुलावरून पाणी वाहत असल्यास ही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

पूल न झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

परतवाडा ते धारणी इंदूर मार्गावरील सेमाडोह (भुतखोरा) हरिसाल येथील ४० वर्षे जुन्या पुलाचे बिम, गडर उघडे पडल्याने धोका निर्माण झाला आहे. धारणी ते दिया मार्गावरील दोन पुलांसह एकूण चार नवीन पुलांची निर्मिती तातडीने करायची आहे. हे पूल न झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मेळघाटातील ११८ ब्रिटिशकालीन पुलांपैकी चार नवीन पुलांची निर्मिती व १६ पुलांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. हे सेमाडोह हरिसाल दिया येथील महत्त्वपूर्ण प्रस्तावित केलेले पूल आहेत. भूतखोरा पुलासंदर्भात व्याघ्र प्रकल्पाला गुरुवारी दुरुस्तीच्या परवानगीचे पत्र पाठविले आहे.

- चंद्रकांत मेहत्रे,

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर

पुलाच्या दुरुस्ती संदर्भात व्याघ्र प्रकल्पाच्या अधिनियमानुसार परवानगी आवश्यक आहे. पत्र मिळाल्यावर वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येईल. त्यानुसार योग्य निर्णय कळविला जाईल.

- कमलेश पाटील,

सहायक वनसंरक्षक,

सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा