शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मेळघाटातील ब्रिटिशकालीन २० पूल अत्यंत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:54 IST

Amravati News शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील मुख्य मार्गावरील ब्रिटिशकालीन ११८ पुलांपैकी २० पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरले आहेत.

ठळक मुद्देभूतखोरा पूल दुरुस्तीचे व्याघ्र प्रकल्पाला पत्रहरिसाल सेमाडोह दिया येथे नवीन पुलांची निर्मिती

नरेंद्र जावरे

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील मुख्य मार्गावरील ब्रिटिशकालीन ११८ पुलांपैकी २० पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरले आहेत. परतवाडा - इंदूर मार्गावरील सेमाडोहचा भुतखोरा पूल खचल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पूल दुरुस्तीसाठी व्याघ्र प्रकल्पाला गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या परवानगीचे पत्र दिले. चार नवीन पुलांच्या निर्मितीसह १६ पुलांची दुरुस्ती आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

मेळघाटात गुरुवारी पहाटे ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. सिपना, चंद्रभागा, शहानूर, खुर्शी आदी नद्यांना पूर आला. परिणामी अनेक ठिकाणी दरड कोसळल्या, रस्ते खरडून गेले. त्यातच मुख्य मार्गावरील पुलांनासुद्धा क्षती पोहोचली आहे. पूल दुरुस्तीसाठी सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षकांना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दुरुस्तीच्या परवानगी संदर्भात पत्र देण्यात आले आहे. मेळघाटातील विकासात्मक कामासाठी आता व्याघ्र प्रकल्पाची परवानगी गरजेची झाली आहे. सेमाडोह येथील भुतखोरा पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवास करताना दक्षता घेण्याचे फलक लावले आहेत. पुलावरून पाणी वाहत असल्यास ही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

पूल न झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

परतवाडा ते धारणी इंदूर मार्गावरील सेमाडोह (भुतखोरा) हरिसाल येथील ४० वर्षे जुन्या पुलाचे बिम, गडर उघडे पडल्याने धोका निर्माण झाला आहे. धारणी ते दिया मार्गावरील दोन पुलांसह एकूण चार नवीन पुलांची निर्मिती तातडीने करायची आहे. हे पूल न झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मेळघाटातील ११८ ब्रिटिशकालीन पुलांपैकी चार नवीन पुलांची निर्मिती व १६ पुलांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. हे सेमाडोह हरिसाल दिया येथील महत्त्वपूर्ण प्रस्तावित केलेले पूल आहेत. भूतखोरा पुलासंदर्भात व्याघ्र प्रकल्पाला गुरुवारी दुरुस्तीच्या परवानगीचे पत्र पाठविले आहे.

- चंद्रकांत मेहत्रे,

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर

पुलाच्या दुरुस्ती संदर्भात व्याघ्र प्रकल्पाच्या अधिनियमानुसार परवानगी आवश्यक आहे. पत्र मिळाल्यावर वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येईल. त्यानुसार योग्य निर्णय कळविला जाईल.

- कमलेश पाटील,

सहायक वनसंरक्षक,

सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा