शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

१९३ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Updated: June 22, 2017 00:20 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या ७५७ पैकी १९३ उमेदवारांनी निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या ३० दिवसांच्या आत खर्च सादर केला नसल्याने ....

जिल्हा प्रशासनाच्या नोटीस : विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर नाहीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या ७५७ पैकी १९३ उमेदवारांनी निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या ३० दिवसांच्या आत खर्च सादर केला नसल्याने प्रशासनाने त्यांना नोटीस बजावल्या असून यासर्व उमेदवारांना आॅगस्टपूर्वी अनर्ह ठरविण्याची कारवाई केली जाणार आहे.यावर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक २१ फेब्रुवारीला व मतमोजणी २३ तारखेला झाली. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत म्हणजेच २५ मार्च २०१७ पूर्वी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक होते. यावेळी जि.प.साठी ४१७ व पंचायत समितीसाठी ५३३ असे एकूण ९५० उमेदवार रिंगणात होते. यापैकी जिल्हा परिषदेच्या ३४० व पंचायत समितीच्या ४१७ उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत सादर केला. मात्र, जिल्हा परिषदेच्या ७७ व पंचायत समितीचे ११६ अशा एकूण १९३ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही. त्यामुळे आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने नोटीस बजावल्या आहेत. यासर्व उमेदवारांवर त्यांना अनर्ह घोषित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.उमेदवारी खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांमध्ये अंजनगाव बारी गटात ५, शिरजगाव कसबा व कापूसतळणी येथे प्रत्येकी ४, हिवरखेड गटात ६, आसेगाव, राजुरवाडी, शिराळा, पुसदा, वलगाव, पिंपळोद, येवदा व लोणी गटात प्रत्येकी तीन, हातरू, करजगाव, पुसला, नांदगाव पेठ, हरिसाल, राणीगाव, फुबगाव, वाढोणा रामनाथ येथे प्रत्येकी २, तर मंगरूळ चव्हाळा, घुईखेड, आसरा, भंडारज, दिया, पथ्रोट, शिरजगाव बंड, कुऱ्हा, नेरपिंगळाई, अंबाडा व वऱ्हा येथे प्रत्येकी एका उमेदवाराने निवडणूक खर्च सादर केलेला नाही. यासर्व उमेदवारांवर आता आवश्यक प्रक्रियेव्दारे अनर्हतेची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व सदस्यांचे पद धोक्यात आले आहे. या आदेशांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता काय पाऊल उचलले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंसच्या ११२ उमेदवारांना बजावल्या नोटीसजिल्ह्यात निवडणूक झालेल्या ११२ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही. यामध्ये राजुरवाडी गणात ७,वलगाव ५,येवदा, रेवसा, चंद्रपूर, खरपी, अंबाडा,व खेड गणात प्रत्येकी ४, हतरु, कुऱ्हा, शिराळा, कठोरा, अंजनगाव बारी, कविठा बु.व कापुसतळणी गणात प्रत्येकी ३ जनुना, लोणी, निमखेद बाजार, खानमपूर पांढरी, मासोद, पुसदा, चुर्णी, तेलखार, टेंब्रुसोडा, देऊरवाडा व तळवेल येथे प्रत्येकी २ तसेच काटकुंभ, चिखली, खटकाली, शिरजगाव कस्बा, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, थुगावपिंप्री,खानापूर, नेरपिंगळाई, पुसला, सातनूर, टेंभुरखेडा, लोणी, मांगरूळी, वाठोडा, यावली, माहुली धामणगाव, पथ्रोट, परसापूर रासेगाव, असदपूर, भंडारज, कोकर्डा, वडनेर गंगाई खल्लार, शिंगणापूर, गायवाडी, पिंपळोद, साऊर, आसरा, धानोरा फसी, फुबगाव आदी गणात प्रत्येकी एका उमेदवाराने निवडणूक खर्च सादर केलेला नाही.