शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

विदर्भातील वाघांच्या संरक्षणासाठी १९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 14:39 IST

सन २००६ पासून वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या अधिवासात बदल होत आहे. त्यामुळे राज्याचा वनविभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी संयुक्तपणे राज्याच्या वाघांचे सूक्ष्म संशोधन चालविले आहे. यात पुढील १० वर्षांचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने विदर्भातील पाच व्याघ्र प्रकल्पांच्या नियोजनासाठी १९ कोटींचा निधी वितरित केला आहे. वाघांचे संरक्षण, भक्ष्य, अधिवास, लिंग प्रमाण या बाबींच्या अनुषंगाने पुढील १० वर्षांकरिता नियोजन करण्यात येणार आहे.मेळघाट, पेंच, नवेगाव- नागझिरा, बोर, ताडोबा-अंधारी या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन व्याघ्र संरक्षणाचा अंदाज बांधला जाणार आहे. सन २००६ पासून वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या अधिवासात बदल होत आहे. त्यामुळे राज्याचा वनविभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी संयुक्तपणे राज्याच्या वाघांचे सूक्ष्म संशोधन चालविले आहे. यात पुढील १० वर्षांचे टार्गेट निश्चित करण्यात आले आहे. एकाच विभागात वाघांची वाढती संख्या ही बाब नैसर्गिक आणि वन्यजिवांच्या दृष्टिने मोठी समस्या ठरणारी आहे. परिणामी वन्यप्राणी आणि मानव यांच्यात संघर्षाची ठिगणी पडत आहे. एकाच अधिवासात वाघांची संख्या असल्यामुळे त्यांचे संवर्धन, संरक्षण आणि भक्ष्याबाबतची मोठी समस्या व्याघ्र प्रकल्पांसमोर उभी ठाकली आहे. वाघांच्या स्थलांतरणाचा प्रस्ताव असून, त्या दिशेने व्याघ्र प्रकल्पांनी पाऊल उचलले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी होणाऱ्या अभ्यासाचा पुढील टप्पा वाघिण आणि तिच्या बछड्यांना दीड वर्षांनंतर ध्वनिलहरी (कॉलर आयडी) संच बसविले जाणार आहे. त्यामुळे वाघ कुठे जातात, नवा अधिवास कोठे शोधतात, हे सहजतेने कळेल. तशी तयारी वन विभागाने चालविली आहे. वाघांचा अभ्यास करताना अधिवासाचे चार श्रेणीत वर्गीकरण करण्यात येणार आहे. यात संघर्ष होत नसलेला विभाग, मोकळी जागा (बफर झोन), मानवाचा अत्यल्प वावर, वन्यजिवांचे क्षेत्र ज्यात संघर्षाची शक्यता असेल आणि शेती क्षेत्र ज्यात मानव आणि वाघ यांच्यात संघर्षाची शक्यता अशी विभागणी केली जाणार आहे.

वाघांसह अन्य वन्यजिवांचे संरक्षणाला प्राधान्यविदर्भातील पाच व्याघ्र प्रकल्पांत वाघांच्या संरक्षणासह अन्य वन्यजिवांचे अधिवास, संरक्षणाचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. यात रानगवा, अस्वल, रानकुत्री, हरिण, चौसिंगा, रानडुक्कर आदींच्या संवर्धनावर भर असणार आहे. तथापि, फोकस वाघांवरच ठेवण्यात येणार आहे.एकाच पट्ट्यात वाघांची वाढती संख्या ही मोठी समस्या आहे. त्यामुळे वाघांचे इतरत्र स्थलांतरण होणे ही काळाची गरज आहे. परिणामी वन्यजिवांचे अधिवास सक्षम होतील.- नितीन काकोडकर, मुख्य प्रवर्तक, वन्यजीव विभाग.

टॅग्स :Tigerवाघ