शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

१८७ गावांत पाणी टंचाई

By admin | Updated: April 5, 2017 00:09 IST

यंदा एप्रिल ते जून या कालावधीत १८७ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत.

दाहकता वाढली : विविध योजनांवर ३ कोटींचा खर्च अपेक्षित अमरावती : यंदा एप्रिल ते जून या कालावधीत १८७ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत. यावर दोन कोटी ९५ लाख ९९ हजारांचा खर्च होणार आहे.या कालावधीमध्ये ८३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यावर २७ लाख ३९ हजारांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १४, भातकुली ४, तिवसा ११, मोर्शी १४, वरूड ४, चांदूररेल्वे २५, धामणगाव ४, धारणी २ व चिखलदरा तालुक्यात ६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. चिखलदरा तालुक्यातील ७ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यावर १० लाख ५० हजारांचा खर्च येणार आहे. ३० नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. यावर ८५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. अमरावती तालुक्यात ४, भातकुली ४, तिवसा ६, वरूड १, चांदूररेल्वे ८, अचलपूर तालुक्यातील ७ योजनांचा समावेश आहे. १३ तात्पुरत्या पूरक नळ योजना तयार करण्यात येणार आहे. यावर १३ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. अमरावती, तिवसा व वरूड तालुक्यात प्रत्येकी १ व अचलपूर तालुक्यात ७ योजनांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)विंधन विहिरी, कूपनलिकांवर एक कोटींचा खर्चयंदा पाणीटंचाई निवारणार्थ ८२, नवीन विंधन विहिरी व कूपनलिका तयार करण्यात येणार आहे. यावर एक कोटी १ लाख ५० हजारांचा खर्च होणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३० कूपनलिका अचलपूर तालुक्यात तयार करण्यात येणार आहे. अमरावती १७, भातकुली ३, धामणगाव रेल्वे ४, चिखलदरा २ व धारणी तालुक्यात २३ विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे.