शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे १८३ शेतकऱ्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:12 IST

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी ही मोठ्या जोखमीची बाब आहे. फवारणी करताना काळजी न घेतल्यास जीव धोक्यात येत असल्याची उदाहरणे ...

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी ही मोठ्या जोखमीची बाब आहे. फवारणी करताना काळजी न घेतल्यास जीव धोक्यात येत असल्याची उदाहरणे आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १८३ शेतकरी-शेतमजुरांना कीटकनाशकाची विषबाधा झाली व यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे फवारणी करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. याबाबतच्या टिप्स कृषी विभागाने दिल्या आहेत.

जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान विषबाधा झालेल्या १८३ पैकी १८१ जण उपचारानंतर बरे झाले. दोन मृतांचा व्हिसेरा अहवाल अप्राप्त असल्यामुळे अद्याप त्यांची नोंद कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत्यू अशी नोंद घेण्यात आलेली नसल्याचे कृषी विभागाने सांगितले.

शेतात कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करतात. ते विषारी असल्यामुळे फवारणी करणाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे गरज असल्यासच कीटकनाशकाची फवारणी करावी व शिफारस केलेलेच कीटकनाशक वापरावे. याशिवाय कीटकनाशके इतर रसायने किंवा खतांमध्ये शिफारशीशिवाय मिसळू नयेत. जखम असलेल्या व्यक्तींनी फवारणी करू नये. याशिवाय फवारणी करताना विडी, सिगरेट, गुटका किंवा तंबाखूचे सेवन करू नये. हवेच्या दिशेनेच फवारणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

पाईंटर

फवारणीमुळे विषबाधा जिल्हास्थिती

वर्षभरात दाखल रुग्ण : १८३

उपचारानंतर बरे : १८१

एकूण मृत्यू : ०२

बॉक्स

जैविक निविष्ठांचा वापर करूनही नियंत्रण

प्रत्येक वेळी कीटकनाशक फवारणीची आवश्यकता नाही. कीड व रोग कमी प्रमाणात असल्यास फेरोमेन सापळे, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, यासारख्या जैविक निविष्ठांचाही वापर करून कीड व रोगांवर नियंत्रण मिळवता येते. पिकांचे नियमित सर्वेक्षण करून कीड व रोगांनी आर्थिक नुकसानपातळी ओलांडल्यासच कीटकनाशकाची फवारणी करावी लागते.

बॉक्स

ही आहेत लक्षणे

डोळे जळजळणे

चेहऱ्याची, पूर्ण शरीराची आग होणे

चक्कर येणे, उलट्या होणे

डोकेदुखी

बॉक्स

लाल रंगाचे पतंगाचे आकाराचे चिन्ह, जहाल विष

कीटकनाशकाच्या डब्यावर लाल रंगाचे पतंगाच्या आकाराचे चिन्ह असल्यास सर्वात विषारी असे दर्शविते. यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो. हिरव्या चिन्हाची कीटकनाशके सर्वात कमी विषारी असतात. फवारणीनंतर कीटकनाशकांच्या डब्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी व कीटकनाशकांच्या वापराची नोंद घ्यावी, असे कृषी विभागाने सांगितले.

बॉक्स

ही काळजी आवश्यक

फवारणीदरम्यान त्वचा, डोळे व श्वसनेंद्रियाद्वारे विषबाधा होऊ शकते. त्याचे अंगावरील कपडे त्वरित बदलावे. बाधित व्यक्तींचे अंग साबणाने स्वच्छ धुवावे. त्याला त्वरित वांती करायला लावावी. श्वासोच्छवास योग्य रीतीने होत आहे का, याची तपासणी करावी. बाधित व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे. त्याला काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये.

कोट

आवश्यकता असल्यासच कीटकनाशकांची फवारणी करावी. याशिवाय जैविक निविष्ठांचे पर्याय आवश्यक आहे. याद्वारे कीड/रोगांवर नियंत्रण मिळविता येते. फवारणी करायची झाल्यास शेतकरी/ शेतमजुरांनी पुरेशी काळजी घ्यावी.

- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी