शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे १८३ शेतकऱ्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:12 IST

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी ही मोठ्या जोखमीची बाब आहे. फवारणी करताना काळजी न घेतल्यास जीव धोक्यात येत असल्याची उदाहरणे ...

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी ही मोठ्या जोखमीची बाब आहे. फवारणी करताना काळजी न घेतल्यास जीव धोक्यात येत असल्याची उदाहरणे आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १८३ शेतकरी-शेतमजुरांना कीटकनाशकाची विषबाधा झाली व यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे फवारणी करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. याबाबतच्या टिप्स कृषी विभागाने दिल्या आहेत.

जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान विषबाधा झालेल्या १८३ पैकी १८१ जण उपचारानंतर बरे झाले. दोन मृतांचा व्हिसेरा अहवाल अप्राप्त असल्यामुळे अद्याप त्यांची नोंद कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत्यू अशी नोंद घेण्यात आलेली नसल्याचे कृषी विभागाने सांगितले.

शेतात कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करतात. ते विषारी असल्यामुळे फवारणी करणाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे गरज असल्यासच कीटकनाशकाची फवारणी करावी व शिफारस केलेलेच कीटकनाशक वापरावे. याशिवाय कीटकनाशके इतर रसायने किंवा खतांमध्ये शिफारशीशिवाय मिसळू नयेत. जखम असलेल्या व्यक्तींनी फवारणी करू नये. याशिवाय फवारणी करताना विडी, सिगरेट, गुटका किंवा तंबाखूचे सेवन करू नये. हवेच्या दिशेनेच फवारणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

पाईंटर

फवारणीमुळे विषबाधा जिल्हास्थिती

वर्षभरात दाखल रुग्ण : १८३

उपचारानंतर बरे : १८१

एकूण मृत्यू : ०२

बॉक्स

जैविक निविष्ठांचा वापर करूनही नियंत्रण

प्रत्येक वेळी कीटकनाशक फवारणीची आवश्यकता नाही. कीड व रोग कमी प्रमाणात असल्यास फेरोमेन सापळे, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, यासारख्या जैविक निविष्ठांचाही वापर करून कीड व रोगांवर नियंत्रण मिळवता येते. पिकांचे नियमित सर्वेक्षण करून कीड व रोगांनी आर्थिक नुकसानपातळी ओलांडल्यासच कीटकनाशकाची फवारणी करावी लागते.

बॉक्स

ही आहेत लक्षणे

डोळे जळजळणे

चेहऱ्याची, पूर्ण शरीराची आग होणे

चक्कर येणे, उलट्या होणे

डोकेदुखी

बॉक्स

लाल रंगाचे पतंगाचे आकाराचे चिन्ह, जहाल विष

कीटकनाशकाच्या डब्यावर लाल रंगाचे पतंगाच्या आकाराचे चिन्ह असल्यास सर्वात विषारी असे दर्शविते. यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो. हिरव्या चिन्हाची कीटकनाशके सर्वात कमी विषारी असतात. फवारणीनंतर कीटकनाशकांच्या डब्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी व कीटकनाशकांच्या वापराची नोंद घ्यावी, असे कृषी विभागाने सांगितले.

बॉक्स

ही काळजी आवश्यक

फवारणीदरम्यान त्वचा, डोळे व श्वसनेंद्रियाद्वारे विषबाधा होऊ शकते. त्याचे अंगावरील कपडे त्वरित बदलावे. बाधित व्यक्तींचे अंग साबणाने स्वच्छ धुवावे. त्याला त्वरित वांती करायला लावावी. श्वासोच्छवास योग्य रीतीने होत आहे का, याची तपासणी करावी. बाधित व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे. त्याला काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये.

कोट

आवश्यकता असल्यासच कीटकनाशकांची फवारणी करावी. याशिवाय जैविक निविष्ठांचे पर्याय आवश्यक आहे. याद्वारे कीड/रोगांवर नियंत्रण मिळविता येते. फवारणी करायची झाल्यास शेतकरी/ शेतमजुरांनी पुरेशी काळजी घ्यावी.

- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी