शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे १८३ शेतकऱ्यांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:12 IST

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी ही मोठ्या जोखमीची बाब आहे. फवारणी करताना काळजी न घेतल्यास जीव धोक्यात येत असल्याची उदाहरणे ...

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी ही मोठ्या जोखमीची बाब आहे. फवारणी करताना काळजी न घेतल्यास जीव धोक्यात येत असल्याची उदाहरणे आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १८३ शेतकरी-शेतमजुरांना कीटकनाशकाची विषबाधा झाली व यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे फवारणी करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. याबाबतच्या टिप्स कृषी विभागाने दिल्या आहेत.

जिल्ह्यात १ एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान विषबाधा झालेल्या १८३ पैकी १८१ जण उपचारानंतर बरे झाले. दोन मृतांचा व्हिसेरा अहवाल अप्राप्त असल्यामुळे अद्याप त्यांची नोंद कीटकनाशकाच्या फवारणीमुळे मृत्यू अशी नोंद घेण्यात आलेली नसल्याचे कृषी विभागाने सांगितले.

शेतात कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करतात. ते विषारी असल्यामुळे फवारणी करणाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे गरज असल्यासच कीटकनाशकाची फवारणी करावी व शिफारस केलेलेच कीटकनाशक वापरावे. याशिवाय कीटकनाशके इतर रसायने किंवा खतांमध्ये शिफारशीशिवाय मिसळू नयेत. जखम असलेल्या व्यक्तींनी फवारणी करू नये. याशिवाय फवारणी करताना विडी, सिगरेट, गुटका किंवा तंबाखूचे सेवन करू नये. हवेच्या दिशेनेच फवारणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

पाईंटर

फवारणीमुळे विषबाधा जिल्हास्थिती

वर्षभरात दाखल रुग्ण : १८३

उपचारानंतर बरे : १८१

एकूण मृत्यू : ०२

बॉक्स

जैविक निविष्ठांचा वापर करूनही नियंत्रण

प्रत्येक वेळी कीटकनाशक फवारणीची आवश्यकता नाही. कीड व रोग कमी प्रमाणात असल्यास फेरोमेन सापळे, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, यासारख्या जैविक निविष्ठांचाही वापर करून कीड व रोगांवर नियंत्रण मिळवता येते. पिकांचे नियमित सर्वेक्षण करून कीड व रोगांनी आर्थिक नुकसानपातळी ओलांडल्यासच कीटकनाशकाची फवारणी करावी लागते.

बॉक्स

ही आहेत लक्षणे

डोळे जळजळणे

चेहऱ्याची, पूर्ण शरीराची आग होणे

चक्कर येणे, उलट्या होणे

डोकेदुखी

बॉक्स

लाल रंगाचे पतंगाचे आकाराचे चिन्ह, जहाल विष

कीटकनाशकाच्या डब्यावर लाल रंगाचे पतंगाच्या आकाराचे चिन्ह असल्यास सर्वात विषारी असे दर्शविते. यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो. हिरव्या चिन्हाची कीटकनाशके सर्वात कमी विषारी असतात. फवारणीनंतर कीटकनाशकांच्या डब्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी व कीटकनाशकांच्या वापराची नोंद घ्यावी, असे कृषी विभागाने सांगितले.

बॉक्स

ही काळजी आवश्यक

फवारणीदरम्यान त्वचा, डोळे व श्वसनेंद्रियाद्वारे विषबाधा होऊ शकते. त्याचे अंगावरील कपडे त्वरित बदलावे. बाधित व्यक्तींचे अंग साबणाने स्वच्छ धुवावे. त्याला त्वरित वांती करायला लावावी. श्वासोच्छवास योग्य रीतीने होत आहे का, याची तपासणी करावी. बाधित व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे. त्याला काहीही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये.

कोट

आवश्यकता असल्यासच कीटकनाशकांची फवारणी करावी. याशिवाय जैविक निविष्ठांचे पर्याय आवश्यक आहे. याद्वारे कीड/रोगांवर नियंत्रण मिळविता येते. फवारणी करायची झाल्यास शेतकरी/ शेतमजुरांनी पुरेशी काळजी घ्यावी.

- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी